शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

खुद्द मंत्रीच सहा दिवस बिनखात्याचे, जनतेला काय अपेक्षा असणार? विरोधकांचा सरकारला खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2024 07:42 IST

विरोधी पक्ष संख्येत कमी असला तरी सरकारला मजबुतीने धारेवर धरेल

नागपूर : अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. अधिवेशन संपूनही हे सरकार मंत्र्यांना खातेवाटप करू शकले नाही. ज्या सरकारचे मंत्री अधिवेशनातील सहा दिवस विनाखात्याने वावरले, त्या सरकारकडून जनतेला काही मिळण्याची अपेक्षा काय? असा खोचक टोला विरोधकांनी महायुती सरकारला लगावला. 

अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी माध्यमांना संबोधित केले. राज्यात परभणीच्या घटनेतून असंतोष आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे भडका उडाला. बीडमध्ये सरपंचाच्या मृत्यूला कारणीभूत असलेले वाल्मीक कराड एका मंत्र्याचा निकटवर्तीय आहे.

मुंबईतील काँग्रेस कार्यालयावर हल्ला, कल्याणमध्ये मराठी माणसावरील हल्ला, वर्षभरात ४५ हजार महिलांवर झालेल्या अत्याचार, राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडली असताना, हे सरकार मंत्रिमंडळातील नेत्यांचा व पोलिसांचा बचाव करीत, जनतेवर अन्याय करीत आहे. कायद्याचे भक्षकच सरकारमध्ये असतील तर काय अपेक्षा करणार? असा सवाल विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. सरकारने सोयाबीन, कापूस, धान उत्पादक शेतकऱ्यांना काहीच दिले नाही. मागच्या सरकारच्या काळातील खोट्या योजना व आश्वासनापुरतेच खोटे अधिवेशन झाले. हे सरकार येणाऱ्या काळात जनतेला न्याय देईल, अशी अपेक्षाच नाही. विरोधी पक्ष संख्येत कमी असला तरी सरकारला मजबुतीने धारेवर धरेल, असा दावा दानवे यांनी केला.

या अधिवेशनाचे काहीच फलित नाही 

नव्या सरकारला जनतेने भरभरून मतदान केल्याने, जनतेच्या अपेक्षांची पहिल्याच अधिवेशनात पूर्ती होईल, अशी अपेक्षा होती. 

शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीची घोषणा सरकार करेल, असे वाटले होते. मात्र, हे सरकार शेतकरी, युवक, गरिबांचे नाही. 

जनतेच्या आशा-आकांक्षा या अधिवेशनातून पूर्ण होऊ शकल्या नाही. 

या अधिवेशनाचे काहीच फलित निघाले नाही, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

शरद पवार गटाचे नेते अनुपस्थित

एकीकडे स्वबळावर लढण्याची भाषा 'मविआ'तील घटकपक्ष उद्धवसेनेचे नेते करीत आहे. 

अधिवेशन संपले तरी मविआने विरोधी पक्षनेता ठरविलेला नाही, अशात विरोधकांच्या पत्रपरिषदेत शरद पवार गटाचे नेते उपस्थित नसल्याने महाविकास आघाडीतही एकमत नसल्याची चर्चा होती.

यासंदर्भात पटोले यांना विचारल्यावर ते म्हणाले, जयंत पाटील यांचे विमान असल्याने ते निघून गेले. 

महायुतीत एकमेकांविरोधात किती रोष आहे, हे त्यांना विचारा, असे सांगून प्रश्नाला बगल दिली. 

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेAmbadas Danweyअंबादास दानवेcongressकाँग्रेसnagpurनागपूर