शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

खुद्द मंत्रीच सहा दिवस बिनखात्याचे, जनतेला काय अपेक्षा असणार? विरोधकांचा सरकारला खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2024 07:42 IST

विरोधी पक्ष संख्येत कमी असला तरी सरकारला मजबुतीने धारेवर धरेल

नागपूर : अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. अधिवेशन संपूनही हे सरकार मंत्र्यांना खातेवाटप करू शकले नाही. ज्या सरकारचे मंत्री अधिवेशनातील सहा दिवस विनाखात्याने वावरले, त्या सरकारकडून जनतेला काही मिळण्याची अपेक्षा काय? असा खोचक टोला विरोधकांनी महायुती सरकारला लगावला. 

अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी माध्यमांना संबोधित केले. राज्यात परभणीच्या घटनेतून असंतोष आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे भडका उडाला. बीडमध्ये सरपंचाच्या मृत्यूला कारणीभूत असलेले वाल्मीक कराड एका मंत्र्याचा निकटवर्तीय आहे.

मुंबईतील काँग्रेस कार्यालयावर हल्ला, कल्याणमध्ये मराठी माणसावरील हल्ला, वर्षभरात ४५ हजार महिलांवर झालेल्या अत्याचार, राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडली असताना, हे सरकार मंत्रिमंडळातील नेत्यांचा व पोलिसांचा बचाव करीत, जनतेवर अन्याय करीत आहे. कायद्याचे भक्षकच सरकारमध्ये असतील तर काय अपेक्षा करणार? असा सवाल विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. सरकारने सोयाबीन, कापूस, धान उत्पादक शेतकऱ्यांना काहीच दिले नाही. मागच्या सरकारच्या काळातील खोट्या योजना व आश्वासनापुरतेच खोटे अधिवेशन झाले. हे सरकार येणाऱ्या काळात जनतेला न्याय देईल, अशी अपेक्षाच नाही. विरोधी पक्ष संख्येत कमी असला तरी सरकारला मजबुतीने धारेवर धरेल, असा दावा दानवे यांनी केला.

या अधिवेशनाचे काहीच फलित नाही 

नव्या सरकारला जनतेने भरभरून मतदान केल्याने, जनतेच्या अपेक्षांची पहिल्याच अधिवेशनात पूर्ती होईल, अशी अपेक्षा होती. 

शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीची घोषणा सरकार करेल, असे वाटले होते. मात्र, हे सरकार शेतकरी, युवक, गरिबांचे नाही. 

जनतेच्या आशा-आकांक्षा या अधिवेशनातून पूर्ण होऊ शकल्या नाही. 

या अधिवेशनाचे काहीच फलित निघाले नाही, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

शरद पवार गटाचे नेते अनुपस्थित

एकीकडे स्वबळावर लढण्याची भाषा 'मविआ'तील घटकपक्ष उद्धवसेनेचे नेते करीत आहे. 

अधिवेशन संपले तरी मविआने विरोधी पक्षनेता ठरविलेला नाही, अशात विरोधकांच्या पत्रपरिषदेत शरद पवार गटाचे नेते उपस्थित नसल्याने महाविकास आघाडीतही एकमत नसल्याची चर्चा होती.

यासंदर्भात पटोले यांना विचारल्यावर ते म्हणाले, जयंत पाटील यांचे विमान असल्याने ते निघून गेले. 

महायुतीत एकमेकांविरोधात किती रोष आहे, हे त्यांना विचारा, असे सांगून प्रश्नाला बगल दिली. 

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेAmbadas Danweyअंबादास दानवेcongressकाँग्रेसnagpurनागपूर