शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

खुद्द मंत्रीच सहा दिवस बिनखात्याचे, जनतेला काय अपेक्षा असणार? विरोधकांचा सरकारला खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2024 07:42 IST

विरोधी पक्ष संख्येत कमी असला तरी सरकारला मजबुतीने धारेवर धरेल

नागपूर : अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. अधिवेशन संपूनही हे सरकार मंत्र्यांना खातेवाटप करू शकले नाही. ज्या सरकारचे मंत्री अधिवेशनातील सहा दिवस विनाखात्याने वावरले, त्या सरकारकडून जनतेला काही मिळण्याची अपेक्षा काय? असा खोचक टोला विरोधकांनी महायुती सरकारला लगावला. 

अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी माध्यमांना संबोधित केले. राज्यात परभणीच्या घटनेतून असंतोष आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे भडका उडाला. बीडमध्ये सरपंचाच्या मृत्यूला कारणीभूत असलेले वाल्मीक कराड एका मंत्र्याचा निकटवर्तीय आहे.

मुंबईतील काँग्रेस कार्यालयावर हल्ला, कल्याणमध्ये मराठी माणसावरील हल्ला, वर्षभरात ४५ हजार महिलांवर झालेल्या अत्याचार, राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडली असताना, हे सरकार मंत्रिमंडळातील नेत्यांचा व पोलिसांचा बचाव करीत, जनतेवर अन्याय करीत आहे. कायद्याचे भक्षकच सरकारमध्ये असतील तर काय अपेक्षा करणार? असा सवाल विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. सरकारने सोयाबीन, कापूस, धान उत्पादक शेतकऱ्यांना काहीच दिले नाही. मागच्या सरकारच्या काळातील खोट्या योजना व आश्वासनापुरतेच खोटे अधिवेशन झाले. हे सरकार येणाऱ्या काळात जनतेला न्याय देईल, अशी अपेक्षाच नाही. विरोधी पक्ष संख्येत कमी असला तरी सरकारला मजबुतीने धारेवर धरेल, असा दावा दानवे यांनी केला.

या अधिवेशनाचे काहीच फलित नाही 

नव्या सरकारला जनतेने भरभरून मतदान केल्याने, जनतेच्या अपेक्षांची पहिल्याच अधिवेशनात पूर्ती होईल, अशी अपेक्षा होती. 

शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीची घोषणा सरकार करेल, असे वाटले होते. मात्र, हे सरकार शेतकरी, युवक, गरिबांचे नाही. 

जनतेच्या आशा-आकांक्षा या अधिवेशनातून पूर्ण होऊ शकल्या नाही. 

या अधिवेशनाचे काहीच फलित निघाले नाही, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

शरद पवार गटाचे नेते अनुपस्थित

एकीकडे स्वबळावर लढण्याची भाषा 'मविआ'तील घटकपक्ष उद्धवसेनेचे नेते करीत आहे. 

अधिवेशन संपले तरी मविआने विरोधी पक्षनेता ठरविलेला नाही, अशात विरोधकांच्या पत्रपरिषदेत शरद पवार गटाचे नेते उपस्थित नसल्याने महाविकास आघाडीतही एकमत नसल्याची चर्चा होती.

यासंदर्भात पटोले यांना विचारल्यावर ते म्हणाले, जयंत पाटील यांचे विमान असल्याने ते निघून गेले. 

महायुतीत एकमेकांविरोधात किती रोष आहे, हे त्यांना विचारा, असे सांगून प्रश्नाला बगल दिली. 

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेAmbadas Danweyअंबादास दानवेcongressकाँग्रेसnagpurनागपूर