शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नागपुरात मध्यरात्री उडाला आगीचा भडका, 2 कोटींचे नुकसान; रहिवाशांनी जागून काढली रात्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2023 09:23 IST

वर्धमान नगर हा रहिवाशी परिसर असून येथील एका सायकलच्या गोडाऊनला रात्री १२.३० ते १ वाजताच्या सुमारास आग लागली.

संजय लचुरिया

नागपूर - महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात मध्यरात्री आगीचा भडका उडल्याने एकच गोंधळ निर्माण झाला. शहरातील वर्धमान नगर येथील एका सायकल गोडाऊनमध्ये ही आग लागली होती. आगीचे नेमके कारण अद्याप समजले नसले तरी या आगीने मोठा पेट घेतल्याने गोडाऊनमधील मोठे साहित्य जळून खाक झाले आहे. या दुर्घटनेत गोडाऊन मालकाचे अंदाजे २ ते अडीच कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. 

वर्धमान नगर हा रहिवाशी परिसर असून येथील एका सायकलच्या गोडाऊनला रात्री १२.३० ते १ वाजताच्या सुमारास आग लागली. आगीने रौद्र रुप धारण केले होते. त्यामुळे, अग्निशमन दलाच्या जवळपास २० ते २२ गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने या घटनते कुठलीही जिवितहानी झाली नाही. मात्र, परिसरातील स्थानिकांना या घटनेमुळे रात्र जागून काढवी लागली. परिसरातील काही घरांतील नागरिकांनी गॅस सिलेंडर घराबाहेर काढले, तर काहींच्या घरातील वस्तूही आगीत जळाल्या आहेत. 

दरम्यान, महापालिका प्रशासनाने रात्रीपासूनच आग आटोकण्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केला. मात्र, आगीत मोठं नुकसान झालं असून सकाळी पंचनामा करण्यात येणार आहे.  

टॅग्स :nagpurनागपूरfireआगFire Brigadeअग्निशमन दलPoliceपोलिस