शहरं
Join us  
Trending Stories
1
ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
2
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लागले लक्ष
3
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
4
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
5
बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?
6
४० रोडरोमिओंना अद्दल घडवणारी लेडी सिंघम; सरपंचाची लेक झाली धडाकेबाज IPS ऑफिसर
7
“विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करा”: चंद्रकांत पाटील
8
चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
9
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
10
Mumbai Watermelon Case: कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं?
11
ऑपरेशन सिंदूरदरम्यान, पाकिस्तानचे ११ तळ उडवले, १३ विमाने पाडली, तसेच..., वर्षभरानंतर तिन्ही सैन्यदलांनी आकडाच सांगितला    
12
IPL 2026: युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचा 'तो' विक्रम इतिहासजमा, पंजाबच्या कूपर कॉन्लीची रेकॉर्ड ब्रेक इनिंग!
13
भयंकरच घडलं! सात वर्षांपूर्वी केला होता प्रेमविवाह; सिरीशाला पतीने रिक्षा स्टॅण्डवरच संपवले 
14
तमिळनाडूत सस्पेन्स संपला! 'विजय' सरकारला राज्यपालांचा हिरवा कंदील; जाणून घ्या कधी होणार शपथविधी
15
देशातील १३ राज्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; ताशी ६० किमी वेगाने वाहणार वारे
16
Astro Tip: पैशांची कमतरता भासतेय? शुक्रवारी आवर्जून करा 'हे' ५ उपाय; लक्ष्मी होईल प्रसन्न 
17
क्रिकेट विश्वावर शोककळा! विराट कोहलीचा जुना सहकारी अमनप्रीत सिंग गिलचे वयाच्या ३६ व्या वर्षी निधन
18
मार्कशीटमधील खाडाखोड कळली अन् बापाची सटकली; ९ वर्षांच्या मुलीला क्रूरपणे संपवलं, नंबर १ चा होता अट्टहास
19
रंगांचा खेळ! रेड, ग्रीन तर माहितीय पण फूड पॅकेजिंगवरील ब्लू, येलो मार्कचा नेमका अर्थ काय?
20
१०,००० किमी मारक क्षमता, अनेक बडे देश टप्प्यात, अग्नी-६ सुपर क्षेपणास्त्र तयार, भारत जगाला दाखवणार ताकद
Daily Top 2Weekly Top 5

महापौर तिवारी व उपमहापौर धावडे यांनी पदभार स्वीकारला()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नवनियुक्त महापौर दयाशंकर तिवारी व उपमहापौर मनिषा धावडे यांनी गुरुवारी पदभार स्वीकारला. मनपा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नवनियुक्त महापौर दयाशंकर तिवारी व उपमहापौर मनिषा धावडे यांनी गुरुवारी पदभार स्वीकारला. मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीच्या परिसरात महापौर व उपमहापौरांचा पदग्रहण समारंभ आयोजित करण्यात आला होता.

व्यासपीठावर खासदार डॉ.विकास महात्मे, आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रवीण दटके, मावळते महापौर संदीप जोशी, स्थायी समिती सभापती विजय झलके, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे,प्रतोद दिव्या धुरडे, माजी आमदार प्रा.अनिल सोले, सुधाकर देशमुख, सुधाकर कोहळे,डॉ. मिलिंद माने, माजी महापौर माया इवनाते, अर्चना डेहनकर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये .तिवारी यांच्या वयोवृध्द मातोश्री शारदा, यांच्यासह कुटुंबीय आवर्जून उपस्थित होते.

संदीप जोशी यांनी नवनिर्वाचित महापौर दयाशंकर तिवारी यांचे तुळशीरोप देऊन स्वागत केले व पदभार सोपविला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस या दोन नेत्यांच्या शहर विकासाच्या स्वप्नाला गती देण्यार असल्याचे दयाशंकर तिवारी यांनी सांगितले. संदीप जोशी म्हणाले, महापौरपद स्वीकारताना आलेल्या अडचणीत, समस्यांमध्ये व प्रत्येक प्रसंगी दयाशंकर तिवारी पूर्ण ताकदीने सोबत राहिले. आज ते महापौर म्हणून नियुक्त झाले. त्यांच्यापुढे अनेक आव्हाने आहेत. शहराला विकासाच्या ट्रॅकवर आणण्यासाठी आम्ही सर्व पूर्ण ताकदीने सोबत आहोत.

दयाशंकर तिवारी यांनी अनेक संघर्ष पेलून इथपर्यंतचा पल्ला गाठला आहे. आव्हाने पेलणे हे त्यांच्या स्वभावातच आहे. त्यामुळे मनपाचे नेतृत्व करताना येणारे प्रत्येक आव्हान ते यशस्वीपणे पार पाडतील असा विश्वास प्रवीण दटके यांनी यावेळी व्यक्त केला. विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी महापौर-उपमहापौरांना शुभेच्छा दिल्या. सूत्र संचालन नगरसेवक संजय बंगाले यांनी तर आभार संदीप जाधव यांनी मानले.

...

मुंढे बोलत होते राधाकृष्णन न बाेलता मारतात

तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कोणतीही कामे केली नाही. ते नुसते मीडियाशी बोलत होते. वर्षभरात कोणतीही कामे झालेली नाही. आताचे आयुक्त राधाकृष्णन बी. हेही काही करत नाही. पण न बोलता ते मारतात असा टोला आमदार कष्णा खोपडे यांनी आपल्या भाषणातून लावला. दयाशंकर तिवारी यांचा जनसंपर्क, स्वभाव आणि काम करण्याची शैलीवरून ते शहराच्या सर्वांगीण विकासाची अपेक्षा पूर्ण करतील, असा विश्वास व्यक्त केला.