शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

... तर दिल्लीसारखे महाराष्ट्राच्या उपराजधानीतही घालावे लागतील मास्क!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 10:09 IST

वायू प्रदूषणाने दिल्लीचे सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले आहे. गेल्या महिन्यात हवेच्या प्रदूषणात चार ते पाच पटीने वाढ झाल्याने धोकादायक परिस्थिती निर्माण झाली होती. ही स्थिती नागपुरात नसली तरी वाढत्या वाहनांमुळे व जुनी वाहने मोडीत काढण्याकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे नागपूरही दिल्लीच्या वाटेवर असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

ठळक मुद्दे शहरातील अंतर्गत वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा उपराजधानीत वाहनांची संख्याही १५ लाख ७३ हजारावर

सुमेध वाघमारे।आॅनलाईन लोकमतनागपूर : वायू प्रदूषणाने दिल्लीचे सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले आहे. गेल्या महिन्यात हवेच्या प्रदूषणात चार ते पाच पटीने वाढ झाल्याने धोकादायक परिस्थिती निर्माण झाली होती. ही स्थिती नागपुरात नसली तरी वाढत्या वाहनांमुळे व जुनी वाहने मोडीत काढण्याकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे नागपूरही दिल्लीच्या वाटेवर असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे दिल्लीकरासारखे मास्क नागपूरकरांनाही घालावे लागतील, अशी भिती व्यक्त केली जात आहे. सध्याच्या स्थितीत उपराजधानीत वाहनांची संख्याही १५ लाख ७३ हजारावर गेली आहे. साधारण दीड व्यक्तीमागे एक वाहन असे हे प्रमाण आहे.

१३ लाख दुचाकी वाहनेशहरात एकूण वाहनांच्या तुलनेत रस्त्यावर दुचाकीचे साम्राज्य आहे. २०१३ मध्ये दुचाकींची संख्या १० लाख ३२ हजार ६०७ होती. २०१४ मध्ये ही संख्या १० लाख ६४ हजार ५७४ वर गेली तीन वर्षांत यात तीन लाखाने वाढ होऊन ही संख्या १३ लाखांवर गेली आहे. याच्या पाठोपाठ कारची संख्याही वाढत आहे. शहरात सध्याच्या घडीला १ लाख ३५ हजार कार्स रस्त्यांवर धावत आहे.गेल्या १० वर्षात नागपूरची लोकसंख्या सुमारे ३५ टक्क्यांनी वाढली आहे. याच्या तुलनेत खासगी वाहनांच्या संख्येत सुमारे ४५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. खासगी वाहनांची वाढती संख्या हे वाहतूक कोंडीचे खरे कारण ठरत आहे. २०१२ मध्ये शहरात वाहनांची संख्या ११ लाख ५७ हजार ३४ होती, २०१३ मध्ये ही संख्या १३ लाख ७८ हजारावर गेली आता ती १५ लाख ७३ हजार २४३ वर पोहचली आहे. यामध्ये दुचाकी, चारचाकी या खासगी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. सार्वजनिक वाहतुकीचा परवाना घेऊन चालणाऱ्या ट्रक, टँकर, ट्रेलर, बस, टुरिस्ट टॅक्सी, आॅटो रिक्षा या वाहनांची संख्या १ लाख ७५ हजार इतकी आहे. वाढत्या वाहनांमुळे अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. २०१६ साली नागपुरात १ हजार ३७३ अपघात झाले व यात ३०७ बळी गेले आहेत.

दीड व्यक्तीमागे एक वाहनशहराची लोकसंख्या ३० लाखांवर पोहचली आहे. यातील सुमारे १० लाख लोकसंख्या १८ वर्षांखाली असेल असे गृहित धरले तरी २० लाख लोकसंख्येच्या तुलनेत १५ लाख ७३ हजार २४३ वाहने आहेत. यावरून साधारण दीड व्यक्तीमागे एक वाहन आहे. वाढत्या वाहनांमुळे शहरातील अंतर्गत वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. याकडे आताच गांभिर्याने पाहिले नाही तर याचा विपरीत परिणाम होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.‘हवा गुणवत्ता निर्देशका’च्या मापदंडानुसार नागपुरातील हवा गेल्या सहा महिन्यांपासून धोक्याच्या पातळीवर आहे. याला मुख्य कारण म्हणजे, शहरात मोठ्या प्रमाणात सुरू असलेले बांधकाम व वाहनाचे प्रदूषण. चांगली बाब ही आहे की, आपल्या शहराच्या भोवताल वीज निर्मिती प्रकल्प सोडल्यास उद्योग नाहीत. यामुळे दिल्लीसारखी स्थिती नाही. परंतु आपण त्या दिशेने वाटचाल करीत आहोत.-कौस्तुभ चॅटर्जी, पर्यावरणतज्ज्ञ

टॅग्स :pollutionप्रदूषण