शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

... तर दिल्लीसारखे महाराष्ट्राच्या उपराजधानीतही घालावे लागतील मास्क!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 10:09 IST

वायू प्रदूषणाने दिल्लीचे सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले आहे. गेल्या महिन्यात हवेच्या प्रदूषणात चार ते पाच पटीने वाढ झाल्याने धोकादायक परिस्थिती निर्माण झाली होती. ही स्थिती नागपुरात नसली तरी वाढत्या वाहनांमुळे व जुनी वाहने मोडीत काढण्याकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे नागपूरही दिल्लीच्या वाटेवर असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

ठळक मुद्दे शहरातील अंतर्गत वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा उपराजधानीत वाहनांची संख्याही १५ लाख ७३ हजारावर

सुमेध वाघमारे।आॅनलाईन लोकमतनागपूर : वायू प्रदूषणाने दिल्लीचे सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले आहे. गेल्या महिन्यात हवेच्या प्रदूषणात चार ते पाच पटीने वाढ झाल्याने धोकादायक परिस्थिती निर्माण झाली होती. ही स्थिती नागपुरात नसली तरी वाढत्या वाहनांमुळे व जुनी वाहने मोडीत काढण्याकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे नागपूरही दिल्लीच्या वाटेवर असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे दिल्लीकरासारखे मास्क नागपूरकरांनाही घालावे लागतील, अशी भिती व्यक्त केली जात आहे. सध्याच्या स्थितीत उपराजधानीत वाहनांची संख्याही १५ लाख ७३ हजारावर गेली आहे. साधारण दीड व्यक्तीमागे एक वाहन असे हे प्रमाण आहे.

१३ लाख दुचाकी वाहनेशहरात एकूण वाहनांच्या तुलनेत रस्त्यावर दुचाकीचे साम्राज्य आहे. २०१३ मध्ये दुचाकींची संख्या १० लाख ३२ हजार ६०७ होती. २०१४ मध्ये ही संख्या १० लाख ६४ हजार ५७४ वर गेली तीन वर्षांत यात तीन लाखाने वाढ होऊन ही संख्या १३ लाखांवर गेली आहे. याच्या पाठोपाठ कारची संख्याही वाढत आहे. शहरात सध्याच्या घडीला १ लाख ३५ हजार कार्स रस्त्यांवर धावत आहे.गेल्या १० वर्षात नागपूरची लोकसंख्या सुमारे ३५ टक्क्यांनी वाढली आहे. याच्या तुलनेत खासगी वाहनांच्या संख्येत सुमारे ४५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. खासगी वाहनांची वाढती संख्या हे वाहतूक कोंडीचे खरे कारण ठरत आहे. २०१२ मध्ये शहरात वाहनांची संख्या ११ लाख ५७ हजार ३४ होती, २०१३ मध्ये ही संख्या १३ लाख ७८ हजारावर गेली आता ती १५ लाख ७३ हजार २४३ वर पोहचली आहे. यामध्ये दुचाकी, चारचाकी या खासगी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. सार्वजनिक वाहतुकीचा परवाना घेऊन चालणाऱ्या ट्रक, टँकर, ट्रेलर, बस, टुरिस्ट टॅक्सी, आॅटो रिक्षा या वाहनांची संख्या १ लाख ७५ हजार इतकी आहे. वाढत्या वाहनांमुळे अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. २०१६ साली नागपुरात १ हजार ३७३ अपघात झाले व यात ३०७ बळी गेले आहेत.

दीड व्यक्तीमागे एक वाहनशहराची लोकसंख्या ३० लाखांवर पोहचली आहे. यातील सुमारे १० लाख लोकसंख्या १८ वर्षांखाली असेल असे गृहित धरले तरी २० लाख लोकसंख्येच्या तुलनेत १५ लाख ७३ हजार २४३ वाहने आहेत. यावरून साधारण दीड व्यक्तीमागे एक वाहन आहे. वाढत्या वाहनांमुळे शहरातील अंतर्गत वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. याकडे आताच गांभिर्याने पाहिले नाही तर याचा विपरीत परिणाम होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.‘हवा गुणवत्ता निर्देशका’च्या मापदंडानुसार नागपुरातील हवा गेल्या सहा महिन्यांपासून धोक्याच्या पातळीवर आहे. याला मुख्य कारण म्हणजे, शहरात मोठ्या प्रमाणात सुरू असलेले बांधकाम व वाहनाचे प्रदूषण. चांगली बाब ही आहे की, आपल्या शहराच्या भोवताल वीज निर्मिती प्रकल्प सोडल्यास उद्योग नाहीत. यामुळे दिल्लीसारखी स्थिती नाही. परंतु आपण त्या दिशेने वाटचाल करीत आहोत.-कौस्तुभ चॅटर्जी, पर्यावरणतज्ज्ञ

टॅग्स :pollutionप्रदूषण