शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
3
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
4
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
5
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
6
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
7
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
8
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
9
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
10
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
11
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
12
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
13
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
14
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
15
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
16
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
17
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
18
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
19
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
20
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती

तरुणींकडून करून घेतली जात आहे गांजाची तस्करी; रेल्वे गाड्यांतून आणला जातो गांजा

By नरेश डोंगरे | Updated: August 25, 2023 14:44 IST

ईव्हेन्ट ट्रूपचे नाव : बेमालूमपणे चालतोय हा गोरखधंदा

नरेश डोंगरे

नागपूर : रेल्वे गाड्यांमधून गांजाची मोठ्या प्रमाणात तस्करी होत आहे. विशेष म्हणजे तस्करांनी गांजा तस्करीत 'ईव्हेन्टस् ट्रूप' मध्ये काम करणाऱ्या तरुणींना गांजा तस्करीत गुंतवले असून त्यांच्याकडून बेमालूमपणे हा गोरखधंदा करवून घेतला जात आहे. अधून मधून रेल्वे सुरक्षा दलाकडून कारवाई होत असली तरी तस्करीच्या प्रमाणात कारवाईचे प्रमाण खूपच कमी आहे.

गांजा तस्करीसाठी तस्करांकडून रेल्वे गाड्यांचा वापर केला जातो. ओडिशातील संभलपूर हे गांजा तस्करीचे हब समजले जाते. त्यामुळे तिकडून येणाऱ्या गाड्यांमधून एक किलो, दोन किलो, पाच किलो गांजाचे पॅक (बॉक्स) बणवून गांजाचे पार्सल ठिकठिकाणी रवाना केले जाते. प्रारंभी गांजा तस्करीसाठी गरीब, गरजू महिला-पुरुष आणि बेरोजगार तरुणांचा वापर केला जात होता. त्यांना जाण्या-येण्याचे तिकिट आणि एका खेपचे दोन ते पाच हजार रुपये दिले जात होते. मात्र, अनेकदा त्यांच्या संशयास्पद वर्तनामुळे ते पकडले जातात. त्यामुळे आता बड्या तस्करांनी आपला पॅटर्न बदलला आहे. त्यांनी गांजा तस्करीसाठी चक्क तरुणींनाच कामी लावले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, 'ईव्हेन्ट ट्रूप'च्या गोंडस नावाआड गरिब तरुण-तरुणींना ठिकठिकाणी नेले जाते. तेथे कार्यक्रमात कॅटरिंग किंवा अन्य कोणती जबाबदारी त्यांना दिली जाते. कार्यक्रम आटोपल्यानंतर परतीच्या प्रवासाला निघताना तरूणींच्या पर्समध्ये गांजाचे पँकिंग ठेवले जाते. ती पर्स ठरलेल्या ठिकाणी दुसऱ्या कुणाच्या हवाली करायची असते. त्याचे नाव, नंबर तरुणीला दिला जात नाही. पर्स घेणारा तुम्हाला संपर्क करून तोच तुमच्याकडे पर्स घ्यायला येईल, असे सांगितले जाते.

किरकोळ वाटणाऱ्या या धोक्याच्या कामासाठी संबंधित तरुणीच्या हातात टीप म्हणून ५०० ते १ हजार रुपये ठेवले जाते. महागडी दिसणाऱ्या पर्सच्या आतमध्ये काय आहे, त्याची माहिती नसल्याने तरुणीही सहज तयार होते. चांगले राहणीमान आणि कपडे घालून प्रवास करणाऱ्या या तरुणींची तपासणी होत नसल्याने गांजाची खेप त्यांच्या माध्यमातून नियोजित ठिकाणी, ठरावीक तस्कराच्या हातात बेमालूमपणे पोहचविली जाते.

विविध प्रांतात पोहचवली जाते खेप

प्रत्येक रेल्वेस्थानकावर ठरलेले तस्कर किंवा एजंट गांजाची डिलिव्हरी घेतात. नागपुरात गांजा आल्यानंतर येथून तो महाराष्ट्रात ठिकठिकाणी तसेच मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि दिल्लीकडे पाठविला जातो.

९५ किलो गांजा जप्त

अधून मधून रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) गांजा जप्त करण्याची कामगिरी बजावतात. यावर्षी ८ महिन्यात आरपीएफने वेगवेगळी कारवाई करून २३ लाख, ७५ हजार, ८४० रुपये किंमतीचा ९५ किलो, २०० ग्राम गांजा जप्त केला. मात्र, कारवाई आणि जप्तीचे प्रमाण खुपच कमी असल्याचे संबंधित वर्तुळात म्हटले जाते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDrugsअमली पदार्थrailwayरेल्वेnagpurनागपूर