शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
3
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
4
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
5
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
6
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
7
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
8
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
9
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
10
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
11
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
12
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
13
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
14
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
17
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
18
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
19
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
20
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!

Maharashtra Election 2019 : भाजपसाठी प्रतिष्ठेची, आघाडीसाठी अस्तित्वाची लढाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2019 04:05 IST

आपला गड शाबूत राखण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे.

- कमलेश वानखेडेनागपूर शहर व जिल्ह्यातील १२ पैकी ११ जागा सद्यस्थितीत भाजपच्या ताब्यात आहेत. आपला गड शाबूत राखण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. तर काँग्रेस- राष्ट्रवादीनेही बहुतांश जागी नवे चेहरे देऊन तगडे आव्हान उभे केले आहे. बहुतांश बंडखोरांनी माघार घेतली असून नागपूर दक्षिण व रामटेक मतदारसंघात मात्र भाजप-सेना व काँग्रेसच्या बंडखोरांनी पक्षाच्या उमेदवाराचा ताप वाढविला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून रिंगणात आहेत. त्यांना काँग्रेसकडून माजी आ. आशिष देशमुख यांनी आव्हान दिले आहे. मुख्यमंत्री राज्यभर प्रचारात व्यस्त असल्याने भाजपच्या स्थानिक टीमने धुरा सांभाळली आहे. येथे ‘आॅल इज वेल’ असल्याचा त्यांचा दावा आहे.माजी मंत्री अनिल देशमुख नितीन राऊत व काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. देशमुखांना काटोलमध्ये भाजपचे चरणसिंग ठाकूर तर राऊत यांना भाजपचे आ. मिलिंद माने टक्कर देत आहेत. भाजपचे आ. सुधाकर देशमुख यांच्यासमोर काँग्रेसचे विकास ठाकरे ठाकले आहेत. या तिन्ही जागांवर काट्याची टक्कर पहायला मिळेल.दक्षिण नागपुरात भाजपचे आ. मोहन मते, काँग्रेसचे गिरीश पांडव व अपक्ष प्रमोद मानमोडे असा तिरंगी सामना आहे. येथे मानमोडे यांनी काँग्रेसची तर बंडखोरी करणारे भाजपचे नगरसेवक सतीश होले व शिवसेनेचे नगरसेवक किशोर कुमेरिया यांनी भाजपची डोकेदुखी वाढविली आहे. पूर्व नागपुरात भाजपचे आ. कृष्णा खोपडे व काँग्रेसचे नगरसेवक पुरुषोत्तम हजारे यांच्यात तर मध्य नागपुरात भाजपचे आ. विकास कुंभारे यांच्याविरोधात युवक काँग्रेसचे बंटी शेळके यांच्यात थेट लढत आहे. येथे हलबा-मुस्लीम मतदारांवर विजयाचे गणित अवलंबून आहे.सावनेरमध्ये आ. सुनील केदार यांच्यासमोर भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांचे कडवे आव्हान आहे. उमरेडमध्ये भाजपचे आ. सुधीर पारवे यांच्याविरोधात काँग्रेसने राजू पारवे यांच्या रूपात नवा चेहरा देऊन रंगत आणण्याचा प्रयत्न केला आहे. हिंगण्यात भाजपचे आ. समीर मेघे व काँग्रेसकडून रिंगणात असलेले माजी आ. विजय घोडमारे यांच्यात थेट लढत आहे.प्रचारातील प्रमुख मुद्दे१) भाजपतर्फे शहर व जिल्ह्यातील विकास कामांचा पाढा वाचला जात आहे.२) देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मु्ख्यमंत्री करण्यासाठी भाजप मत मागत आहे.३) काँग्रेसने बेरोजगारी व शेतकऱ्यांच्या समस्यांचा प्रमुख मुद्दा घेतला आहे.४) वाढती महागाई व सरकारचे अपयश काँग्रेस जनतेसमोर मांडत आहे.रंगतदार लढतीपश्चिम नागपुरात भाजपचे आ. सुधाकर देशमुख व काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्यात जुनीच लढत रंगणार आहे.दक्षिण नागपुरात भाजपचे माजी आ. मोहन मते, काँग्रेसचे गिरीश पांडव व अपक्ष प्रमोद मानमोडे अशी तिरंगी लढत आहे. येथे काँग्रेस व भाजप समोर बंडखोरीचे मोठे आव्हान आहे.कामठी मतदारसंघात ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जागेवर भाजपचे टेकचंद सावरकर रिंगणात आहेत. काँग्रेसकडून जि.प.चे माजी अध्यक्ष सुरेश भोयर रिंगणात आहे. या लढाईची जिल्ह्यात चर्चा आहे.रामटेकमध्ये भाजपचे आ. मल्लिकार्जुन रेड्डी, काँग्रेसचे उदयसिंग यादव व बंडखोरी करीत अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेले शिवसेनेचे आशिष जयस्वाल यांच्यात तिरंगी लढत होत आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसnagpurनागपूर