शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
2
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
3
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
4
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
5
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
6
“नरेंद्र मोदी अन् अमित शाहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचेत”; संजय राऊतांचा दावा
7
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
8
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
9
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
10
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
11
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
12
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
13
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
14
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
15
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
16
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
17
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
18
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
19
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
20
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?

Maharashtra Assembly Election 2019 : महिला सुरक्षा आणि महिला सक्षमीकरणात सरकार नापास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 12:08 AM

महिला सुरक्षा आणि महिला सक्षमीकरणात हे सरकार पूर्ण नापास झाले आहे, असा आरोप काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी शुक्रवारी केला.

ठळक मुद्देकाँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शर्मिष्ठा मुखर्जी यांचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मागील पाच वर्षात राज्यात आणि देशात महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांत प्रचंड वाढ झाली असून, गुन्हे रोखण्यात सरकार अपयशी ठरले आहे. महिला सुरक्षा आणि महिला सक्षमीकरणात हे सरकार पूर्ण नापास झाले आहे, असा आरोप काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी शुक्रवारी केला.नागपुरात आल्या असता त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या. त्या म्हणाल्या, २०१२ मध्ये निर्भया कांड घडले. या घटनेनंतर तातडीने तपास करून गुन्हेगारांचा शोध लावण्यात आला. आयोगाची स्थापना केली. कडक कायदा आणला. न्यायदानात विलंब होऊ नये म्हणून फास्ट ट्रॅक कोर्टची स्थापना केली. त्यानंतर नवीन सरकार आले. मात्र या कांडातील गुन्हेगारांना अद्याप शिक्षा झालेली नाही.२०१४ नंतर महिलांवरील अन्याय, अत्याचारात वाढ झाल्याचा आरोप करून मुखर्जी म्हणाल्या, २०१३ मध्ये बलात्काराच्या घटनांची संख्या १ हजार ५४६ होती. ती २०१८ मध्ये ४ हजार ७६ वर पोहचली. महाराष्ट्रात मुलांच्या अपहरणाच्या गुन्ह्यांतही वाढ झाली. बेटी बचाव बेटी पढाव ही घोषणा या सरकारने केली, त्या जाहिरातीसाठी स्वत:च्या छायाचित्रांचे पोस्टर देशभर लावले, पण एकाही पोस्टरवर त्याअंतर्गत असलेल्या कायद्याची आणि गुन्ह्यांची माहिती जनतेला दिली नाही. ९२८ कोटी रुपयांची तरतूद या योजनेवर सरकारने केली, त्यातील फक्त १९ टक्के निधी राज्याला मिळाला आणि ४० टक्के निधी जाहिरातीवर खर्च केला. हे सरकार जाहिरातबाज आणि घोषणाबाज असल्याचा आरोप त्यांनी केला. त्या म्हणाल्या, उन्नाव प्रकरणात भाजपातील ज्येष्ठ नेत्याचे नाव येऊनही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आणि अटक करण्यात या सरकारने विलंब का केला, याचे उत्तर जनतेला द्यावे. चिन्मयानंद यांच्याविरुद्ध तक्रारकर्तीच्या आरोपांमध्ये स्पष्ट उल्लेख असतानाही थेट बलात्काराची कलमे न लावता तसा प्रयत्न केल्याची कलमे लावली आहेत. गुन्हे दाखल करण्यात टाळाटाळ का, याचे उत्तर भाजपाने देशाला द्यावे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019congressकाँग्रेसWomenमहिलाGovernmentसरकारMediaमाध्यमे