शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
4
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
5
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
6
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
7
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
8
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
9
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
10
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
11
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
12
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
13
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
14
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
15
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
16
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
17
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
18
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
19
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
20
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त

Maharashtra Assembly Election 2019 : सावरकरांना भारतरत्न मिळू नये हीच काँग्रेसची इच्छा : रविशंकर प्रसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 20:10 IST

सावरकर यांनी देशासाठी त्याग केला. परंतु त्यांना भारतरत्न मिळावा, ही काँग्रेसचीच इच्छा नाही. कुटुंबातील व्यक्तींच्या चौकटीतच भारतरत्न मर्यादित ठेवू इच्छितात, असा आरोप केंद्रीय विधी व न्यायमंत्री रविशंकर प्रसाद यांनी केला. नागपुरात पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.

ठळक मुद्देकाँग्रेसने नियोजनबद्धपणे प्रादेशिक नेत्यांना कमकुवत केले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न मिळावा, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे भाजपच्या संकल्पपत्रात नमूद आहे. सावरकर यांनी देशासाठी त्याग केला. परंतु त्यांना भारतरत्न मिळावा, ही काँग्रेसचीच इच्छा नाही. कुटुंबातील व्यक्तींच्या चौकटीतच भारतरत्न मर्यादित ठेवू इच्छितात, असा आरोप केंद्रीय विधी व न्यायमंत्री रविशंकर प्रसाद यांनी केला. नागपुरात पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.यावेळी भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष खा. विजय सोनकर, माजी खासदार अजय संचेती, आ. अनिल सोले, आ. सुधाकर कोहळे, आ. गिरीश व्यास, भाजप महाराष्ट्र अनुसूचित मोर्चाचे अध्यक्ष सुभाष पारधी, संजय भेंडे, अर्चना डेहनकर, चंदन गोस्वामी उपस्थित होते. काँग्रेस परिवारातील लोकांना भारतरत्न मिळाला यात आनंदच आहे. परंतु सरदार पटेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मौलाना आझाद यांना त्यांच्या मृत्यूनंतर काही दशकांनी व्ही.पी. सिंह व पी.व्ही. नरसिंहराव यांच्या कार्यकाळात भारतरत्न पुरस्कार मिळाला. सावरकरांना भारतरत्न मिळावा, अशी चर्चा सुरू झाल्यानंतर अस्वस्थ झालेल्या काँग्रेसने भूतकाळ तपासावा, असे प्रतिपादन रविशंकर प्रसाद यांनी केले. फुले दाम्पत्य व सावरकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजासाठी वेचले. अशा महात्म्यांना भारतरत्न मिळावा, ही अतिशय आनंदाची बाब आहे. मात्र विरोधक केवळ राजकारण करण्यात गुंतले आहेत. त्यांनी याचा विरोध करणे म्हणजे महाराष्ट्रातील जनतेचा घोर अपमान आहे, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.प्रचारादरम्यान भाजपा कलम ३७० चा मुद्दा महाराष्ट्राच्या प्रचारात का उपस्थित करीत आहेत, असा प्रश्न विरोधक करीत आहेत. परंतु तो राष्ट्रीय मुद्दा आहे. हे कलम रद्द केल्याने तेथे भारतातील १०६ कायदे लागू झाले आहेत. विरोधकांकडे कुठलेच मुद्दे नसल्याने ते अशाप्रकारचे वक्तव्य करीत आहेत. ७० वर्षांत काश्मीरला कलम ३७० चा कुठला फायदा झाला ते सांगावे आणि नंतर त्याबाबत प्रश्न उपस्थित करावे, असे आव्हानही त्यांनी विरोधकांना दिले. मोदींप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील राष्ट्रवाद, देशभक्ती आणि सुशासन या तीन सिद्धांतावर काम करीत आहेत. विधानसभा निवडणुकीतदेखील भाजप-शिवसेना महायुती बहुमताने विजयी होईल, असे ते म्हणाले. काँग्रेसने राष्ट्रीय पातळीहून योजनाबद्ध पद्धतीने महाराष्ट्रातील प्रादेशिक नेत्यांना कमकुवत केले, असा चिमटादेखील त्यांनी काढला.महात्मा गांधीभारतरत्नहून मोठेकेंद्र सरकार महात्मा गांधी यांना भारतरत्न देण्यासंदर्भात का बोलत नाही, यासंदर्भात विचारणा केली असता ते भारतरत्न पुरस्काराहून मोठे असल्याचे प्रतिपादन रविशंकर प्रसाद यांनी केले. नोबेल पुरस्कारदेखील त्यांना अगोदरच मिळायला हवा होता. मात्र गांधी हे महात्मा आहेत व आज जग त्यांच्या सिद्धांतावर चालत आहे, असे ते म्हणाले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Ravi Shankar Prasadरविशंकर प्रसादMediaमाध्यमे