शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

भाजपला चंद्रपुरात धोका कशाचा?, विजयाच्या हॅट्ट्रिक नंतरही सावध पवित्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2023 11:18 IST

लोकसभेच्या धोकादायक सहा जागांमध्ये विदर्भातील केवळ एक : प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा दावा

राजेश शेगोकार

नागपूर : भाजपने मिशन लोकसभा आणि विधानसभेची जोरदार तयारी वर्षभरापूर्वीच सुरू केली आहे. तरीही लोकसभेच्या जास्तीत जागा जिंकण्याचे ध्येय ठेवणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना ४२ जागांवर ‘सेफ’ वाटत असून राज्यातील सहा लोकसभा मतदारसंघ धोकादायक वाटत आहेत. पत्रकारांशी बोलताना त्यांनी असे वक्तव्य केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे २००४ ते २०१४ असा सलग तीन वेळा जिंकलेल्या या मतदारसंघात भाजपला धाेका कशापासून याची चर्चा आता सुरू झाली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा, बल्लारपूर, चंद्रपूर व वरोरा आणि यवतमाळ जिल्ह्यातील वणी व आर्णी या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश असलेल्या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचा मागोवा घेतला तर गेल्या बारा निवडणुकीत चार वेळा भाजपने विजय मिळविला आहे. १९९६ मध्ये भाजपचे हसंराज अहिर यांनी पहिल्यांदा विजय मिळवून भाजपचा झेंडा रोवत काँग्रेसला मात दिली. मात्र, पुढच्या दोन्ही निवडणुका काँग्रेसने जिंकून या मतदारसंघात भाजपचा झंझावात दहा वर्षे रोखून ठेवला होता. पुढे मात्र हॅट्ट्रिक करत भाजपने या मतदारसंघात आपले स्थान बळकट केले. त्या स्थानाला गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे बाळू धानोरकर यांनी सुरुंग लावला. तेथूनच भाजपची ताकद पोखरली गेली आहे. भाजपकडून लोकसभेच्या ४८ मतदारसंघांचे निवडणूक प्रमुख जाहीर करून प्रत्येक मतदारसंघात पक्षाची बांधणी केली जात असली तरी चंद्रपुरात भाजपचे ऑन फिल्ड वर्क कमी पडते यावर बावनकुळे यांच्या वक्तव्याने शिक्कामोर्तब झाले आहे.

सरळ लढतीची भीती

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत काँग्रेस व भारतीय जनता पक्षात सरळ लढत झाली की, काँग्रेसला विजय मिळतो मात्र तिरंगी लढत झाल्यास भाजपला यश मिळते हा इतिहास आहे. हंसराज अहिर यांच्या चार वेळच्या विजयांमध्ये तिसऱ्या उमेदवारामुळे होणारे मतविभाजन निर्णायक ठरले. या पृष्ठभूमीवर इंडिया आघाडी कायम राहत जर एकच उमेदवार दिला तर सरळ लढतीत भाजपला अडचण येऊ शकते.

जातीय समीकरणांचे गणित जुळेना

काँग्रेसने बाळू धानोरकर यांना उमदेवारी दिल्यानंतर काँग्रेसच्या बाजूने जातीय समीकरणे जुळून आली त्यामुळे गेल्या निवडणुकीत तिसऱ्या उमेदवाराची एन्ट्री अन् अहिर यांची मते वाढूनही ती विजयासाठी पुरेशी ठरली नाहीत. यावेळी काँग्रेस विद्यमान आमदार प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी देण्याची चिन्हे आहेत. ही उमेदवारीच भाजपसाठी अडचणीची ठरू शकेल अशी चर्चा आहे. शिवाय मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे पडसाद जातीय समीकरण अधिक बळकट करण्याची भीती भाजपला असावी.

तीन मतदारसंघ भाजपकडे पण..!

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात सुधीर मुनगंटीवार (बल्लारपूर), संजीव रेड्डी बोदकुरवार (वणी) व संदीप धुर्वे (आर्णी) हे तीन आमदार भाजपचे, तर सुभाष धोटे व प्रतिभा धानोरकर हे दोन काँग्रेसचे आमदार आहेत. चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार अपक्ष असले तरी आता ते भाजपकडे झुकलेले आहेत त्यामुळे भाजपची ताकद दिसत असली तरी प्रत्यक्षात गेल्या लोकसभा निवडणुकीत वणी व आर्णी या दोन मतदारसंघांतच भाजपला आघाडी होती.

नवा चेहरा देण्याची हिंमत करणार का?

गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे धानोरकर यांनी हॅटट्रिक नोंदविणारे हंसराज अहिर यांचा पराभव केला. आताही धानोरकर यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबाप्रती सहानुभूतीची लाट कायम आहेच दूसरीकडे आ. प्रतिभा धानोरकर यांनी सक्रियता कायम ठेवून संपर्क वाढविला आहे त्यामुळे त्यांना तिकीट मिळाल्यास त्यांच्या विरोधात पुन्हा अहिर यांचाच पर्याय सध्या तरी भाजपकडे आहे. जातीय समीकरणाला मात देऊ शकणारे सुधीर मुनगंटीवार हे चांगला पर्याय होऊ शकतात, पक्षाचा आदेश मानून ते तयारही होतील मात्र भाजपतील छुपे शह काटशहचे राजकारण त्यांना त्रस्त करेल असे बोलले जाते. त्यामुळे भाजप नवा चेहरा देण्याची हिंमत करणार का?

टॅग्स :Politicsराजकारणlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकBJPभाजपाSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारHansraj Ahirहंसराज अहिरchandrapur-acचंद्रपूरcongressकाँग्रेस