शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

Lok Sabha Election 2019; निवडणूक असायची त्यांच्यासाठी दिवाळी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 15:29 IST

निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव. या उत्सवात रंग भरण्यासाठी मध्य भारतात नागपूर ही मोठी बाजारपेठ होती.

ठळक मुद्देआज हातालाही काम नाहीनागपूर होते मध्य भारतातील प्रचारसाहित्याची बाजारपेठ

मंगेश व्यवहारे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव. या उत्सवात रंग भरण्यासाठी मध्य भारतात नागपूर ही मोठी बाजारपेठ होती. इतवारी, गांधीबाग, महाल या भागात निवडणुकांचा खरा माहोल राहायचा. बेरोजगारांना रोजगार मिळायचा. कलावंतांना कामापासून फुरसत नसायची. राजकीय नेते, कार्यकर्त्यांच्या चर्चांचे फड रात्रभर चालायचे. निवडणुकीचे साहित्य बनविण्याचे काम सहा महिन्यापूर्वीपासून सुरू व्हायचे. त्याकाळच्या निवडणुका, तेव्हाच्या प्रचाराचा माहोल जाणून घेण्याचा प्रयत्न लोकमतच्या प्रतिनिधीने केला. तेव्हा लक्षात आले की, कधी निवडणुका त्यांच्यासाठी दिवाळी असायच्या आज त्यांच्या हातालाही काम राहिले नाही.१९९० च्या दशकात मुख्य निवडणूक आयुक्त टी.एन. शेषन यांनी आदर्श आचारसंहिता निवडणुकीच्या प्रक्रियेत लागू केली. त्यामुळे निवडणूक खर्च, पोस्टर्स, बॅनर्स, भिंती रंगविणे यावर बंदी आली. प्रत्येक निवडणुकीत किती खर्च करायचा याची मर्यादा उमेदवारांना बांधून दिली. त्यातच प्रिंटिंग तंत्रज्ञानासोबतच निवडणूक प्रक्रियेतच आधुनिक तंत्रज्ञानाचा विकास झाला. त्यामुळे निवडणुकीत प्रचाराचे साहित्य बनविणारे कलावंत, पेंटर, मिस्त्री, प्रिंटर्स, रबर स्टॅम्प मेकर, डेकोरेशनचे साहित्य पुरविणारे व्यावसायिक, सायकलरिक्षा चालक यांच्या व्यवसायावर अवकळा आली.पूर्वी हे व्यावसायिक निवडणुकीच्या काळात किती व्यस्त असायचे यासंदर्भात लोकमतने जाणून घेण्याचा प्रयत्न केला. गांधीबागेतील एम.गोपाल आर्ट नावाने अतिशय प्रसिद्ध असलेले मार्कं डे हे पेंटर निवडणुकीच्या काळात उमेदवाराच्या प्रचारासाठी बॅनर्स, कटआऊट्स बनवायचे. निवडणुकीची घोषणा झाल्याबरोबर ते कामाला लागायचे. मजूर, मिस्त्री, पेंटर, लेटर लिहणारे, कटआऊट कापणारे असे जवळपास २० ते २५ लोक दिवसरात्र काम करायचे. त्यामुळे प्रचाराच्या साहित्यासाठी उमेदवार, त्यांच्या कार्यकर्त्यांच्या रात्री उशिरापर्यंत मैफिली भरायच्या. खायला फुरसत नव्हती एवढे काम त्यांच्याकडे असायचे. त्यांनी इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी, सोनिया गांधी, शरद पवार यांचे ५० फुटाचे कटआऊट्स तेव्हा जाहीर सभेसाठी तयार केले. आज निवडणुकीचे उमेदवार घोषित झाले आहे. प्रचार सुरू झाला आहे. पण त्यांच्याकडे कुठलेही काम नाही. एम. गोपाल आर्टचे मालक गणेश मार्कं डे म्हणाले की, आचारसंहितेमुळे हे सर्व वैभव हरविले आहे.

आचारसंहितेने सर्व काही हिरावलेनिवडणुका आल्या की प्रिंटर्सचा व्यवसाय जोरात रहायचा. महाल परिसरात तर वर्दळच असायची. बॅनर्स, पोस्टर्स, बिल्ले, स्टीकर, पॉम्पलेट, कागदी झेंडे, जाहीरनामा मोठ्या संख्येने छापले जायचे. आशा आॅफसेटचे मिलिंद येवले हे त्यांच्या वडिलांपासून या व्यवसायात आहेत. त्यांच्याकडे तर बॅलेट पेपरसुद्धा छापले जात होते. तेव्हा आॅफसेटला पोलिसांची सुरक्षा असायची. तेव्हा पक्षाचे उमेदवार उमेदवारी घोषित झाल्याबरोबर पहिले काम प्रचार साहित्य निर्मितीचे करायचे. पूर्वी निवडणुकीच्या काळात राजकीय पक्षाच्या चिन्हांचे तोरण बांधले जायचे. आचारसंहितेमुळे काहीच राहिले नाही. राजकीय पक्षाच्या उमेदवारांना तर प्रचार साहित्य पक्षाकडूनच पुरविल्या जाते. त्यामुळे निवडणुकीच्या काळात व्यवसायाला जो बहार यायचा, तो संपला आहे. फ्लेक्समुळे तर पूर्ण व्यवसायच संपला आहे. निवडणुकीच्या काळात कधीकाळी गुंजणारा थ्रेडर मशीनचा आवाज आता शांत झाला आहे.

एका निवडणुकीतून कमवायचो पाच वर्षाचे उत्पन्नचिटणीस पार्क चौकात भारत रबर स्टॅम्प आहे. ८५ वर्षापासून ते या व्यवसायात आहे. निवडणुकीच्या काळात येथे बॅलेट पेपरवर मारण्यात येणाऱ्या फुली बनायच्या. त्यावेळी २५ पोते फुली त्यांच्या येथून जायच्या. जिल्हा प्रशासन त्यांच्याकडून खरेदी करायचे. मतपेट्यांना लागणारे सील त्यांच्याकडे बनायचे. निवडणुकीच्या काळात भिंतीवर पेंटिंग करण्यासाठी टेन्सील बनायच्या. अख्खे कुटुंब या कामात व्यस्त असायचे. निवडणूक म्हणजे त्यांच्यासाठी उत्पन्नाचे मोठे स्रोत होते. एका निवडणुकीतून पाच वर्षाचे उत्पन्न मिळवित असल्याचे भारत रबर स्टॅम्पचे संचालक कृष्णा वैद्य यांनी सांगितले. आचारसंहिता आणि निवडणूक प्रक्रियेत आलेल्या आधुनिकतेमुळे आज काहीच उरले नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक