शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
4
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
5
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
6
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
7
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
8
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
9
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
10
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
11
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
12
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
13
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
14
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
15
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
16
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
17
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
18
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
19
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
20
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज

Lok Sabha Election 2019; नागपुरात बॅनर, फ्लेक्सच्या २६ तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 11:02 IST

निवडणुकीदरम्यान आदर्श आचारसंहिता आणि खर्चाच्या उल्लंघनाची तक्रार करणाऱ्या नागरिकांसाठी निवडणूक आयोगाने ‘सी-व्हिजिल अ‍ॅप’च्या माध्यमातून प्रथमच सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

ठळक मुद्देसी-व्हिजिल अ‍ॅप’ नागरिकांसाठी ठरतेय प्रभावी अस्त्रअर्ध्या तासात कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : निवडणुकीदरम्यान आदर्श आचारसंहिता आणि खर्चाच्या उल्लंघनाची तक्रार करणाऱ्या नागरिकांसाठी निवडणूक आयोगाने ‘सी-व्हिजिल अ‍ॅप’च्या माध्यमातून प्रथमच सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या माध्यमातून नागरिकही स्वतंत्र व नि:पक्षपाती निवडणुकांच्या संचलनासाठी सक्रियपणे जबाबदार भूमिका बजावू शकतात. नागपूर व रामटेक लोकसभा मतदार संघातील २६ नागरिकांना ‘सी-व्हिजिल अ‍ॅप’चा वापर करून आचारसंहितेच्या उल्लंघनाबाबतच्या तक्रारी प्रथमच दाखल केल्या आहेत.भारत निवडणूक आयोगाने नागरिकांसाठी ‘सी-व्हिजिल अ‍ॅप’ जनतेसाठी उपलब्ध करून दिले असून, नागपूर जिल्ह्यातील नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी असलेले बॅनर व फ्लेक्स असल्याबाबत सी-व्हिजिल अ‍ॅपवरून तक्रारी केल्या आहेत. यापैकी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सादर झालेल्या सर्व तक्रारींची तात्काळ दखल घेतली. यापैकी १३ ठिकाणी असलेले बॅनर तात्काळ हटविले आहे. तसेच १० तक्रारींची प्रत्यक्ष पडताळणी केली असता त्या जागेवर आचारसंहितेचा भंग होत नसल्याचे आढळून आले. दोन तक्रारी चौकशीस्तरावर आहेत. तर एक तक्रार निर्णय प्रक्रियेत असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली.रामटेक लोकसभा मतदार संघात सी-व्हिजिल अ‍ॅप या मोबाईलच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या तक्रारीवरून कामठी व रामटेक येथील पाच तक्रारींचा समावेश आहे. नागपूर मतदार संघातील नागपूर-दक्षिणमध्ये दोन, नागपूर दक्षिण-पश्चिममधील ११, नागपूर-पूर्वमधील तीन तर नागपूर उत्तरमधील एका तक्रारीचा समावेश आहे. तक्रार प्राप्त झाल्यानंतर या तक्रारीसंदर्भात सरासरी २ ते २९ मिनिटांच्या आत दखल घेऊन कारवाई करण्यात आली आहे.‘सी-व्हिजिल या अ‍ॅप’मार्फत नागरिकांना आदर्श आचारसंहिता भंग होत आहे असे वाटत असल्यास नागरिकांनी त्या घटनेचे एक छायाचित्र अथवा २ ते ३ मिनिटांचा व्हिडिओ रेकॉर्ड करावा आणि भौगोलिक माहिती प्रणालीद्वारे स्वयंचलित स्थान मॅपिंगसह अ‍ॅपवर फोटो अथवा व्हिडिओ अपलोड करावा. त्यानंतर तक्रार करणाऱ्या नागरिकांच्या मोबाईलवर एक युनिक आयडी प्राप्त होतो. नागरिक अशाप्रकारे आचारसंहितेसंदर्भातील घटना नोंदवू शकतात.नागरिकांनी तक्रार नोंदविल्यानंतर ती अवघ्या पाच मिनिटातच जिल्हा नियंत्रण कक्षाकडे प्राप्त होते. त्या माहितीच्या आधारे तक्रारीचा आढावा घेण्यासाठी नियुक्त केलेल्या एसएसटी, व्हीएसटी आणि भरारी पथकाकडे ही तक्रार पाठविण्यात येते. त्यानंतर जीव्हीआयजी, आयएल अन्वेषक या जीआयएसआधारित मोबाईल अ‍ॅप्लिकेशनच्या सहाय्याने संबंधित पथक घटनास्थळावर अवघ्या १५ मिनिटांच्याआत पोहचणे अपेक्षित आहे.संबंधित तक्रारीबाबत प्राथमिक तपास व तक्रारींच्या तथ्यांची तपासणी करून यासंबंधीचा अहवाल या अ‍ॅपद्वारे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे पाठविल्या जातो. हा अहवाल ३० मिनिटांपेक्षा कमी कालावधीत पोहचणे आवश्यक आहे. या तक्रारींमध्ये तथ्य आढळून आल्यास भारत निवडणूक आयोगाच्या राष्ट्रीय तक्रार पोर्टलवर माहिती पाठविण्यात येते आणि तक्रार अपलोड केल्यापासून अवघ्या १०० मिनिटांच्या आत तक्रारींची स्थिती तक्रारदार नागरिकांना पाठविण्यात येईल. तक्रार करणाऱ्या नागरिकांना मोबाईलवरसुद्धा संदेशाद्वारे कळविण्यात येईल.

कुणी आमिष दाखवत असेल तरी तक्रार करानागरिकांनी आचारसंहिता भंग होत असलेल्या तक्रारीसंदर्भात ‘सी-व्हिजिल अ‍ॅप’चा वापर करावा तसेच तक्रार नोंदवायची असल्यास राज्य संपर्क क्रमांक १९५० यावरसुद्धा कॉल करता येईल. ‘सी-व्हिजिल मार्फत मतदारांना पैसा, मद्य आणि अमली पदार्थांचे वाटप मतदारांना मारहाण अथवा दमबाजीचा प्रकार, जमावाला चिथावणीखोर भाषण तसेच मतदारांना आमिष आदीबाबत तक्रार करता येईल, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अश्विन मुदगल यांनी आवाहन केले आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक