शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात लॉकडाऊनमधील जप्त वाहनचालकांचे परवाने रद्द होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 23:35 IST

लॉकडाऊन आणि पोलिसांनी वारंवार सांगूनही विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या वाहनचालकांची आता खैर नाही. वाहतूक पोलीस वाहनचालकांविरुद्ध गुन्हे दाखल करून आरटीओच्या माध्यमातून त्यांचे परवाने रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करणार आहे.

ठळक मुद्देपहिल्या दिवशी ७५ वाहनचालकांविरुद्ध गुन्हा दाखल : वाहतूक पोलिसांची विशेष मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉकडाऊन आणि पोलिसांनी वारंवार सांगूनही विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या वाहनचालकांची आता खैर नाही. वाहतूक पोलीस वाहनचालकांविरुद्ध गुन्हे दाखल करून आरटीओच्या माध्यमातून त्यांचे परवाने रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करणार आहे. वाहतूक पोलिसांनी गुरुवारी पहिल्याच दिवशी ७५ वाहने जप्त करून या सर्वांविरुद्ध भादंवि कलम १८८ अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.लॉकडाऊन असूनही लोक रस्त्यावर वाहनांसह फिरताना सर्रास दिसून येत आहेत. वाहतूक पोलिसांनी अशा विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या चालकांविरुद्ध कारवाई सुरू केली आहे. सुरुवातीला वाहनचालकांविरुद्ध चालानची कारवाई करण्यात आली. तरीही लोक ऐकायला तयार नाहीत. त्यामुळे आता वाहने जप्त करणे सुरू केले आहे. आतापर्यंत ५६९ वाहने जप्त करण्यात आली आहेत. वाहने जप्त केल्यानंतरही रस्त्यावर फिरणाऱ्यांची संख्या कमी होत नव्हती. त्यामुळे आता वाहतूक पोलिसांनी अशा चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांचे वाहन चालविण्याचे परवाने रद्द करण्यास सुरुवात केली आहे.वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांच्या नेतृत्वात गुरुवारी ७५ वाहनचालकांविरुद्ध भादंवि कलम १८८ अंतर्गत लॉकडाऊनचे उल्लंघन करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपींची वाहने जप्त करण्यात आली आहेत. सर्वाधिक २९ वाहने कामठी चेंबरने जप्त केली आहेत. वाहतूक शाखा येणाºया दिवसात आरटीओकडून आरापींचे ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करण्याची शिफारस करणार आहे.वाहतूक शाखेचे उपायुक्त विक्रम साळी यांनी सांगितले की, उपद्रवी आणि गैरजबाबदार लोक लॉकडाऊनचे महत्त्व समजून घ्यायला तयार नाहीत. ते स्वत: आणि आपल्या कुटुंबासह सर्वसामान्य नागरिकांचे जीवन धोक्यात घालत आहेत. कोरोनाशी लढाई सोशल डिस्टन्स आणि घरी राहूनच लढली जाऊ शकते. यानंतरही लोक विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत. पोलिसांना चकमा देऊन पळून जात आहेत. असे लोक पोलिसांना चकमा तर देऊ शकतात परंतु स्वत:ला आणि आपल्या कुटुंबाला कोरोना विषाणूच्या संसर्गापासून वाचवू शकत नाहीत. त्यामुळेच वाहतूक शाखेने अशा लोकांविरुद्ध गुन्हे दाखल ककरून त्यांचे ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.पोलीस उपायुक्त साळी यांनी असेही सांगितले की, आरटीओला सांगण्यात येईल की, आरोपी वाहनचालक समाजाप्रति गैरजबाबदार आहेत. त्यांच्या कृत्यामुळे समाजाला धोका निर्माण होतो. त्यामुळे त्यांचा वाहन चालवण्याचा परवाना रद्द करून त्यांना यापासून वंचित ठेवण्यात यावे. याशिवाय दोषी वाहनचालकांविरुद्ध न्यायालयातसुद्धा आरोपपत्र दाखल करण्यात येईल. वाहतूक पोलिसांची ही मोहीम लॉकडाऊन असेपर्यंत सुरू राहील. तेव्हा नागरिकांनी लॉकडाऊनचे पालन करून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहनही उपायुक्त साळी यांनी केले आहे.वाहन सोडविणे कठीण होईलवाहतूक पोलिसांनी लॉकडाऊनपासून आतापर्यंत ५६९ वाहने जप्त केली आहेत. ही वाहने लॉकडाऊननंतर दंडाची रक्कम भरून सोडवायची होती. गुरुवारी एफआयआर दाखल करणे सुरू झाले आहे. यामुळे वाहने सोडवणे आता कठीण होईल. वाहतूक शाखा आरोपी वाहनचालकांविरुद्ध न्यायालयातही आरोपपत्र दाखल करणार आहे. आरोपी चालकास वाहन सोडवण्यासाठी न्यायालयात अर्ज करावा लागेल. न्यायालयाच्या निर्देशानंतरच वाहतूक शाखा वाहन सोपवेल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याtraffic policeवाहतूक पोलीस