शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
7
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
8
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
9
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
10
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
11
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
12
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
13
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
14
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
15
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
16
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
17
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
18
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
19
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
20
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?

अवीट चवीचा गावरान आंबा काळाच्या ओघात हद्दपार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2022 19:21 IST

Nagpur News इतर क्षेत्रातून येणाऱ्या आंब्याचे वाढलेले महत्त्व आणि त्या क्षेत्रातील आंब्याचे झालेले ब्रॅण्डिंग यामुळे गावरान आंब्याचे महत्त्व आपसूकच घटले.

नागपूर : गावाकडच्या शेतशिवारातील पाडावर फुलणारा गावरान आंबा, आता केवळ इतिहास ठरला आहे. गावातून शेतांकडे जाणाऱ्या पांदण रस्त्यावर उन्हाळ्यात गार सावली देणारे, हे गावरान आंब्याचे वृक्ष आता केवळ स्वप्न ठरले आहे. आर्थिक निकष आणि कृषी उत्पन्न यातील गणितात गावरान आंब्याचे वृक्ष बसत नसल्याने, ही स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळेच, गावरान नावाचा लुसलुसित आंबा जिल्ह्यातून हद्दपार झाला, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

जिल्ह्यात आंब्याच्या बागा नाहीतच

नागपूर जिल्ह्यात आंबा, हे मुद्दामहून लावले जाणारे वृक्ष नाही किंवा आंब्याच्या बागा फुलविण्याचा विचार येथील शेतकरी करत नाही. धुऱ्यावर, रस्त्याच्या काठावर खाल्लेल्या आंब्याच्या घुया फेकल्यानंतर स्वत:च उगवलेले आणि मोठे झालेले वृक्ष, अशी जिल्ह्यातील स्थिती आहे. अशा तऱ्हेने नागपूर जिल्ह्यात साधारणतः एक हजार हेक्टरवर आंबे उभे असलेले दिसतात.

गावरान आंब्याचे क्षेत्र घटले

१. इतर क्षेत्रातून येणाऱ्या आंब्याचे वाढलेले महत्त्व आणि त्या क्षेत्रातील आंब्याचे झालेले ब्रॅण्डिंग यामुळे गावरान आंब्याचे महत्त्व आपसूकच घटले.

२. गावरान आंब्याला किंमत कमी मिळत असल्याने, शेतकऱ्यांनी ही झाडे तोडून टाकली व त्याऐवजी कलमी आंब्याची झाडे लावण्यास सुरुवात केली.

३. आंब्याचे झाड मोठे असल्याने, सावलीही मोठी होते. सावलीमुळे आंतरिक पीक घेणे कठीण जाते. म्हणून आंब्याची झाडे उभी राहू नयेत, असाच प्रयत्न असतो.

नागपूरकरांना आवडतो आंबा

१. नागपूरकरांना बैगन फल्ली, नीलम व दसेरी हा आंबा प्रचंड आवडतो. शिवाय, या आंब्याचे दर सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे असतात.

२. अत्यंत महाग असल्याने हापूस, केसर हा आंबा श्रीमंतांचा आंबा म्हणून ओळखला जातो. आर्थिकदृष्ट्या उत्तम असणाऱ्यांकडेच हा आंबा चवीने घेतला जातो.

३. नागपुरात येणारा रत्नागिरी येथील हापूस आंबा सेकंड ग्रेडचा असतो. फर्स्ट ग्रेडचा आंबा विक्रीला कधीच उपलब्ध नसतो.

गरिबांचा आंबाही महाग

पिकलेल्या आंब्याचा हा सीझन नसल्याने आणि आवक कमी असल्याने गरिबांचा आंबा म्हणून ओळख असलेले नीलम, बैगन फल्ली, दसेरी हे आंबेही प्रचंड महाग आहेत. १५० ते २०० रुपये किलो असे दर आहेत. गुढीपाडव्यानंतर आवक वाढली की दर कमी होतील.

माचवून खाण्याच्या गावरान आंब्याची गोडीच वेगळी

गावरान आंबा हा आकाराने लहान असतो. त्यामुळे, माचवून माचवून त्याचा रस पिण्याची गोडी वेगळीच असते. या आंब्याचा रसही विनापाणी मिसळून खाल्ला जातो. हा आंबा आजही गडचिरोली आदी भागातून मागवण्यावर अनेकांचा भर असतो.

* झाडांमुळे माकडांचा उपद्रव प्रचंड असतो आणि त्यामुळे, शेतातील उभ्या पिकांची नासधूस होते. म्हणून आंब्याची झाडे लावली जात नाहीत.

- अनिल मोवाडे, शेतकरी (सावनेर)

* इतर झाडांच्या तुलनेत आंब्याचा घेर मोठा असतो आणि सावलीही मोठी असते. त्यामुळे, पीक घेण्यास अडचण येते.

- मधुसूदन तलमले, शेतकरी (खात)

...................

टॅग्स :Mangoआंबा