शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

अवीट चवीचा गावरान आंबा काळाच्या ओघात हद्दपार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2022 19:21 IST

Nagpur News इतर क्षेत्रातून येणाऱ्या आंब्याचे वाढलेले महत्त्व आणि त्या क्षेत्रातील आंब्याचे झालेले ब्रॅण्डिंग यामुळे गावरान आंब्याचे महत्त्व आपसूकच घटले.

नागपूर : गावाकडच्या शेतशिवारातील पाडावर फुलणारा गावरान आंबा, आता केवळ इतिहास ठरला आहे. गावातून शेतांकडे जाणाऱ्या पांदण रस्त्यावर उन्हाळ्यात गार सावली देणारे, हे गावरान आंब्याचे वृक्ष आता केवळ स्वप्न ठरले आहे. आर्थिक निकष आणि कृषी उत्पन्न यातील गणितात गावरान आंब्याचे वृक्ष बसत नसल्याने, ही स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळेच, गावरान नावाचा लुसलुसित आंबा जिल्ह्यातून हद्दपार झाला, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

जिल्ह्यात आंब्याच्या बागा नाहीतच

नागपूर जिल्ह्यात आंबा, हे मुद्दामहून लावले जाणारे वृक्ष नाही किंवा आंब्याच्या बागा फुलविण्याचा विचार येथील शेतकरी करत नाही. धुऱ्यावर, रस्त्याच्या काठावर खाल्लेल्या आंब्याच्या घुया फेकल्यानंतर स्वत:च उगवलेले आणि मोठे झालेले वृक्ष, अशी जिल्ह्यातील स्थिती आहे. अशा तऱ्हेने नागपूर जिल्ह्यात साधारणतः एक हजार हेक्टरवर आंबे उभे असलेले दिसतात.

गावरान आंब्याचे क्षेत्र घटले

१. इतर क्षेत्रातून येणाऱ्या आंब्याचे वाढलेले महत्त्व आणि त्या क्षेत्रातील आंब्याचे झालेले ब्रॅण्डिंग यामुळे गावरान आंब्याचे महत्त्व आपसूकच घटले.

२. गावरान आंब्याला किंमत कमी मिळत असल्याने, शेतकऱ्यांनी ही झाडे तोडून टाकली व त्याऐवजी कलमी आंब्याची झाडे लावण्यास सुरुवात केली.

३. आंब्याचे झाड मोठे असल्याने, सावलीही मोठी होते. सावलीमुळे आंतरिक पीक घेणे कठीण जाते. म्हणून आंब्याची झाडे उभी राहू नयेत, असाच प्रयत्न असतो.

नागपूरकरांना आवडतो आंबा

१. नागपूरकरांना बैगन फल्ली, नीलम व दसेरी हा आंबा प्रचंड आवडतो. शिवाय, या आंब्याचे दर सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे असतात.

२. अत्यंत महाग असल्याने हापूस, केसर हा आंबा श्रीमंतांचा आंबा म्हणून ओळखला जातो. आर्थिकदृष्ट्या उत्तम असणाऱ्यांकडेच हा आंबा चवीने घेतला जातो.

३. नागपुरात येणारा रत्नागिरी येथील हापूस आंबा सेकंड ग्रेडचा असतो. फर्स्ट ग्रेडचा आंबा विक्रीला कधीच उपलब्ध नसतो.

गरिबांचा आंबाही महाग

पिकलेल्या आंब्याचा हा सीझन नसल्याने आणि आवक कमी असल्याने गरिबांचा आंबा म्हणून ओळख असलेले नीलम, बैगन फल्ली, दसेरी हे आंबेही प्रचंड महाग आहेत. १५० ते २०० रुपये किलो असे दर आहेत. गुढीपाडव्यानंतर आवक वाढली की दर कमी होतील.

माचवून खाण्याच्या गावरान आंब्याची गोडीच वेगळी

गावरान आंबा हा आकाराने लहान असतो. त्यामुळे, माचवून माचवून त्याचा रस पिण्याची गोडी वेगळीच असते. या आंब्याचा रसही विनापाणी मिसळून खाल्ला जातो. हा आंबा आजही गडचिरोली आदी भागातून मागवण्यावर अनेकांचा भर असतो.

* झाडांमुळे माकडांचा उपद्रव प्रचंड असतो आणि त्यामुळे, शेतातील उभ्या पिकांची नासधूस होते. म्हणून आंब्याची झाडे लावली जात नाहीत.

- अनिल मोवाडे, शेतकरी (सावनेर)

* इतर झाडांच्या तुलनेत आंब्याचा घेर मोठा असतो आणि सावलीही मोठी असते. त्यामुळे, पीक घेण्यास अडचण येते.

- मधुसूदन तलमले, शेतकरी (खात)

...................

टॅग्स :Mangoआंबा