शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
4
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
5
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
6
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
7
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
8
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
9
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
10
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
11
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
12
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
13
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
14
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
15
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
16
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
17
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
18
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
19
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
Daily Top 2Weekly Top 5

'स्थानिक निवडणुका कार्यकर्त्यांच्या.. निवडणुकीत युती वा आघाडीचा निर्णय तेच घेतील' : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 15:23 IST

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ : संविधान सत्याग्रह यात्रा वर्षभर चालणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आघाडी करायची की नाही, याबाबचा निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हा व ब्लॉक स्तरावरील स्थानिक नेत्यांना दिले असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.

या स्थानिक निवडणुका कार्यकर्त्यांच्या असतात, या निवडणुकीत युती वा आघाडीचा निर्णय स्थानिक पातळी घेणे गरजेचे असून यानुसार तसे अधिकार स्थानिक नेत्यांना देण्यात आले आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

याप्रसंगी खासदार प्रतिभा धानोरकर, शहर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश भोयर, प्रसन्ना तिडके, शकूर नागाणी गिरीश पांडव पदाधिकारी यांच्यासह उपस्थित होते. काँग्रेसचे २० सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत काढण्यात आलेल्या दीक्षा भूमी ते पवनार संविधान सत्याग्रह पदयात्रेची सेवाग्राम येथे यशस्वी सांगता झाली.

ही यात्रा वर्षभर चालणार असल्याचे सपकाळ यांनी सांगतले. संघाचा लोकशाहीवर विश्वास नाही का? असा सवालही सपकाळ यांनी केला. मतपरिवर्तन करुन संविधान संघाने स्विकारावे, असे आवाहनही त्यांनी केले.

बिहारमध्ये मदत अन् शेतकऱ्यांसाठी पैसा नाही

  • बिहारमध्ये निवडणुका आहे निवडणुका आहे म्हणून केंद्र सरकारने तेथील १ महिलांच्या खात्यावर दहा-दहा हजार, अन् महाराष्ट्रातील संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार सुरू आहे.
  • सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत करून कर्जमुक्त्ती जाहीर करण्याची मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
  • जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांचे प्रंचड नुकसान झाले. मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याचे नाटक न करता तातडीने पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.

समाजासमाजांत भांडणे लावली

  • हैदराबाद गॅझेटमधील तरतुदी ग्राह्य धरून महायुती सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा शासन निर्णय जारी केला. मात्र जीआर काढला आणि मराठा व ओबीसी समाजात भांडणे लावली, असा घणाघात हर्षवर्धन सपकाळ यांनी महायुतीवर केला. तेलंगणा सरकारने जातनिहाय जनगणना करून त्यांच्या राज्यातील ओबीसी समाजाला ४२ टक्के आरक्षण दिले. राज्यातही जातनिहाय गणना करून आरक्षण देण्याची मागणी सपकाळ यांनी केली.
  • नथुरामचे उदात्तीकरण सोडून गांधींचे अनुयायी व्हा
  • महात्मा गांधी यांची विचारधारा जगभरात पसरली आहे. २०० देशांत त्यांचे पुतळे आहेत. हिंदुत्वाचा दूत म्हणून त्यांची ओळख आहे. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघााची ओळख हिंचारामुळे आहे. संघाने नथुराम गोडसे याचे उदात्तीकरण करण्याचे सोडून महात्मा गांधी यांचे अनुयायी व्हावे, असे आवाहन सपकाळ यांनी केले.
English
हिंदी सारांश
Web Title : Local election alliances: party workers to decide, says Harshvardhan Sapkal.

Web Summary : Congress empowers local leaders to decide on alliances for local body elections. Sapkal criticizes the central government's financial aid disparity between Bihar and Maharashtra farmers. He also accused the ruling government of creating divisions between Maratha and OBC communities over reservations and urged RSS to follow Gandhi's principles.
टॅग्स :nagpurनागपूरHarshavardhana Sapkalहर्षवर्धन सपकाळcongressकाँग्रेसZP Electionजिल्हा परिषद