शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
2
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
3
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
4
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
5
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
6
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
7
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
8
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
9
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
10
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
11
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
12
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
13
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
14
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
15
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
16
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
17
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
18
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
19
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
20
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅसिडमुळे जनजीवन धोक्यात

By admin | Updated: November 17, 2014 00:58 IST

बुटीबोरी औद्योगिक वसाहतीमधील टाकावू अ‍ॅसिडयुक्त रसायनांमुळे माणसे, जनावरे, शेती व पाण्याचे स्त्रोत धोक्यात असल्याचा दावा करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर

हायकोर्टात याचिका : बुटीबोरी औद्योगिक वसाहतीसंदर्भात केंद्र व राज्य शासनाला नोटीसनागपूर : बुटीबोरी औद्योगिक वसाहतीमधील टाकावू अ‍ॅसिडयुक्त रसायनांमुळे माणसे, जनावरे, शेती व पाण्याचे स्त्रोत धोक्यात असल्याचा दावा करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. गणेश बोडखे असे याचिकाकर्त्याचे नाव असून बुटीबोरी येथे त्यांची शेती आहे. बुटीबोरी एमआयडीसी येथे अनेक रासायनिक उद्योग असून या उद्योगांतील अ‍ॅसिडयुक्त पाणी नजीकच्या वाठोडा नाल्यात सोडले जाते. रासायनिक घनकचरा मोकळ्या जागेवर फेकला जातो. वाठोडा नाला वेणा नदीला मिळतो. यामुळे वेणा नदीचे पाणी दूषित झाले आहे. विहिरी व पाण्याचे अन्य स्त्रोतही प्रदूषित झाले आहेत. विषारी पाणी पिल्यामुळे माणसांना विविध गंभीर आजारांनी ग्रासले आहे. जनावरे मृत्युमुखी पडत आहेत. रासायनिक घनकचरा फेकला जातो ती जनावरे चारण्याची जमीन आहे. शेतीची उत्पादन क्षमता घटली आहे. अ‍ॅसिडमुळे पिके जळून जात आहेत. यासंदर्भात राज्य शासन व उद्योगांना अनेकदा पत्रे लिहिली, पण अद्याप काहीच उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व विनय देशपांडे यांनी याप्रकरणी केंद्रीय पर्यावरण विभागाचे सचिव, राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, पोलीस अधीक्षक व बुटीबोरी पोलीस निरीक्षक यांना नोटीस बजावून १० डिसेंबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. मनोज कारिया यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)