शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
2
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
3
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
4
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
5
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
6
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
7
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
8
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
9
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
10
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
11
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
12
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
13
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
14
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
15
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
16
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
17
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
18
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
19
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
20
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!

नामांतर आंदोलनातील ‘लाँगमार्च’चा प्राण म्हणजे इ.मो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 23:36 IST

मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरासाठी दीक्षाभूमीवरून ऐतिहासिक असा ‘लाँगमार्च’ निघाला. दररोज शेकडो मैल चालून भीमसैनिक थकून जात होते. त्यांचे पाय रक्तबंबाळ होत असत. अशा थकलेल्या भीम सैनिकांमध्ये नवीन ऊर्जा निर्माण करून त्यांच्या रक्तबंबाळ पायांना पुन्हा चालण्यासाठी प्रेरणा देण्याचे काम तेव्हा खऱ्या अर्थाने इ.मो. नारनवरे यांच्या गीतांनी केले. त्या ऐतिहासिक लाँगमार्चचा प्राण म्हणजे इ.मो. नारनवरे होत, अशा शब्दात लाँगमार्चचे प्रणेते सरसेनापती प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी त्यांचा गौरव केला.

ठळक मुद्देजोगेंद्र कवाडे : इ.मो. नारनवरे यांचा अमृत महोत्सवी सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरासाठी दीक्षाभूमीवरून ऐतिहासिक असा ‘लाँगमार्च’ निघाला. दररोज शेकडो मैल चालून भीमसैनिक थकून जात होते. त्यांचे पाय रक्तबंबाळ होत असत. अशा थकलेल्या भीम सैनिकांमध्ये नवीन ऊर्जा निर्माण करून त्यांच्या रक्तबंबाळ पायांना पुन्हा चालण्यासाठी प्रेरणा देण्याचे काम तेव्हा खऱ्या अर्थाने इ.मो. नारनवरे यांच्या गीतांनी केले. त्या ऐतिहासिक लाँगमार्चचा प्राण म्हणजे इ.मो. नारनवरे होत, अशा शब्दात लाँगमार्चचे प्रणेते सरसेनापती प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी त्यांचा गौरव केला.ज्येष्ठ कवी व आंबेडकरी विचारवंत इ.मो. नारनवरे यांच्या ७५ व्या वर्षपूर्तीनिमित्त शुक्रवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आॅडिटोरियम दीक्षाभूमी येथे त्यांचा शाल, गौरवपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. त्यावेळी आपले विचार व्यक्त करताना प्रा. कवाडे बोलत होते. आंबेडकरी विचारवंत ताराचंद्र खांडेकर हे अध्यक्षस्थानी होते. तर माजी मंत्री नितीन राऊत, प्रसिद्ध न्युरोलॉजिस्ट डॉ. चंद्रशेखर मेश्राम, ज्येष्ठ साहित्यिक धर्मराज निमसरकर, सामाजिक कार्यकर्त्या तक्षशीला वाघधरे, गीता नारनवरे प्रामुख्याने उपस्थित होत्या.प्रा. जोगेंद्र कवाडे म्हणाले, प्रत्येक शब्दाचा वापर हा आंबेडकरी आणि तथागत बुद्धाची निष्ठेशी सुसंगत राहील, यावर इ.मो. नारनवरे यांचा भर राहिलेला आहे. अक्षरांची दगडफेक आणि शब्दांचा गोळीबार काय असतो हे त्यांच्या प्रत्येक शब्दातून जाणवते. लाँगमार्चमध्ये आम्ही तो अनुभवले आहे. नामांतराच्या आंदोलनातील चंदरची त्यांनी लिहिलेली कथा अंगावर शहरे आणते. त्यांनी लिहिलेले ‘जयभीम हमारा नारा है, जयभीम देश हमारा है’ हे गीत म्हणजे देशातील समस्त शोषित वंचितांचे राष्ट्रगान व्हावे, असे आहे. ते केवळ लेखक नसून प्रसंगी रस्त्यावर उतरणारा कार्यकर्तासुद्धा आहे. अशा शब्दात त्यांनी इ.मो. नारनवरे यांचा गौरव केला. आज देशात भीषण परिस्थिती आहे, अशा परिस्थितीत ज्यांना बुद्धाची शांती समजत नसेल त्यांना भीमाच्या क्रांतीने समजावण्याची गरज आहे, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.अध्यक्षीय भाषणात ताराचंद्र खांडेकर म्हणाले, इ.मो. नारनवरे यांनी आंबेडकरी चळवळीची सांस्कृतिक पुनर्रचनेची पायाभरणी करताना कधीही लाचारी किंवा तडजोड स्वीकारली नाही. आंबेडकरी निष्ठा आयुष्यभर जबाबदारीने स्वीकारल्यामुळेच ते इतरांसाठी मार्गदर्शक ठरतात. नितीन राऊत म्हणाले, नामांतराचे आंदोलन खºया अर्थाने पेटवण्याचे काम हे इ.मो. नारनवरे यांच्या गीतांनी केले. यावेळी धर्मराज निमसरकार, तक्षशीला वाघधरे यांनीही त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. आपल्या सत्काराला उत्तर देतांना इ.मो. नारनवरे यांनी चळवळीची नाळ तुटू देऊ नका. चळवळीतील नेत्यांवर आरोप करीत असताना त्यांनी चळवळीसाठी काय केले आहे, याचीही जाणीव ठेवा, असे आवाहन केले.प्रास्ताविक का.रा. वालदेकर यांनी केले. नीलकांत कुलसंगे यांनी गौरवपत्राचे वाचन केले. संचालन पल्लवी जीवनतारे यांनी केले. नरेश वाहाने यांनी आभार मानले.‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’चे काव्यात्मक लेखन हे ऐतिहासिक कार्ययावेळी चंद्रशेखर मेश्राम म्हणाले, इ.मो. नारनवरे यांनी अनेक कार्य केले. परंतु बुद्ध आणि त्यांचा धम्म या ऐतिहासिक ग्रंथाचे काव्यात्मक लेखन हे त्यांच्या जीवनातील ऐतिहासिक कार्य असल्याचे आपण मानतो. हा ग्रंथ लवकरच प्रकाशित व्हावा. त्याची जबबादारी आपण स्वीकारायला तयार आहोत. तसेच इ.मो. नारनवरे यांचे अप्रकाशित साहित्य प्रकाशित करण्याची आपण जबाबदारी घेत असल्याचेही त्यांनी यावेळी घोषित केले.

टॅग्स :nagpurनागपूरcultureसांस्कृतिक