शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नामांतर आंदोलनातील ‘लाँगमार्च’चा प्राण म्हणजे इ.मो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 23:36 IST

मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरासाठी दीक्षाभूमीवरून ऐतिहासिक असा ‘लाँगमार्च’ निघाला. दररोज शेकडो मैल चालून भीमसैनिक थकून जात होते. त्यांचे पाय रक्तबंबाळ होत असत. अशा थकलेल्या भीम सैनिकांमध्ये नवीन ऊर्जा निर्माण करून त्यांच्या रक्तबंबाळ पायांना पुन्हा चालण्यासाठी प्रेरणा देण्याचे काम तेव्हा खऱ्या अर्थाने इ.मो. नारनवरे यांच्या गीतांनी केले. त्या ऐतिहासिक लाँगमार्चचा प्राण म्हणजे इ.मो. नारनवरे होत, अशा शब्दात लाँगमार्चचे प्रणेते सरसेनापती प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी त्यांचा गौरव केला.

ठळक मुद्देजोगेंद्र कवाडे : इ.मो. नारनवरे यांचा अमृत महोत्सवी सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरासाठी दीक्षाभूमीवरून ऐतिहासिक असा ‘लाँगमार्च’ निघाला. दररोज शेकडो मैल चालून भीमसैनिक थकून जात होते. त्यांचे पाय रक्तबंबाळ होत असत. अशा थकलेल्या भीम सैनिकांमध्ये नवीन ऊर्जा निर्माण करून त्यांच्या रक्तबंबाळ पायांना पुन्हा चालण्यासाठी प्रेरणा देण्याचे काम तेव्हा खऱ्या अर्थाने इ.मो. नारनवरे यांच्या गीतांनी केले. त्या ऐतिहासिक लाँगमार्चचा प्राण म्हणजे इ.मो. नारनवरे होत, अशा शब्दात लाँगमार्चचे प्रणेते सरसेनापती प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी त्यांचा गौरव केला.ज्येष्ठ कवी व आंबेडकरी विचारवंत इ.मो. नारनवरे यांच्या ७५ व्या वर्षपूर्तीनिमित्त शुक्रवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आॅडिटोरियम दीक्षाभूमी येथे त्यांचा शाल, गौरवपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. त्यावेळी आपले विचार व्यक्त करताना प्रा. कवाडे बोलत होते. आंबेडकरी विचारवंत ताराचंद्र खांडेकर हे अध्यक्षस्थानी होते. तर माजी मंत्री नितीन राऊत, प्रसिद्ध न्युरोलॉजिस्ट डॉ. चंद्रशेखर मेश्राम, ज्येष्ठ साहित्यिक धर्मराज निमसरकर, सामाजिक कार्यकर्त्या तक्षशीला वाघधरे, गीता नारनवरे प्रामुख्याने उपस्थित होत्या.प्रा. जोगेंद्र कवाडे म्हणाले, प्रत्येक शब्दाचा वापर हा आंबेडकरी आणि तथागत बुद्धाची निष्ठेशी सुसंगत राहील, यावर इ.मो. नारनवरे यांचा भर राहिलेला आहे. अक्षरांची दगडफेक आणि शब्दांचा गोळीबार काय असतो हे त्यांच्या प्रत्येक शब्दातून जाणवते. लाँगमार्चमध्ये आम्ही तो अनुभवले आहे. नामांतराच्या आंदोलनातील चंदरची त्यांनी लिहिलेली कथा अंगावर शहरे आणते. त्यांनी लिहिलेले ‘जयभीम हमारा नारा है, जयभीम देश हमारा है’ हे गीत म्हणजे देशातील समस्त शोषित वंचितांचे राष्ट्रगान व्हावे, असे आहे. ते केवळ लेखक नसून प्रसंगी रस्त्यावर उतरणारा कार्यकर्तासुद्धा आहे. अशा शब्दात त्यांनी इ.मो. नारनवरे यांचा गौरव केला. आज देशात भीषण परिस्थिती आहे, अशा परिस्थितीत ज्यांना बुद्धाची शांती समजत नसेल त्यांना भीमाच्या क्रांतीने समजावण्याची गरज आहे, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.अध्यक्षीय भाषणात ताराचंद्र खांडेकर म्हणाले, इ.मो. नारनवरे यांनी आंबेडकरी चळवळीची सांस्कृतिक पुनर्रचनेची पायाभरणी करताना कधीही लाचारी किंवा तडजोड स्वीकारली नाही. आंबेडकरी निष्ठा आयुष्यभर जबाबदारीने स्वीकारल्यामुळेच ते इतरांसाठी मार्गदर्शक ठरतात. नितीन राऊत म्हणाले, नामांतराचे आंदोलन खºया अर्थाने पेटवण्याचे काम हे इ.मो. नारनवरे यांच्या गीतांनी केले. यावेळी धर्मराज निमसरकार, तक्षशीला वाघधरे यांनीही त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. आपल्या सत्काराला उत्तर देतांना इ.मो. नारनवरे यांनी चळवळीची नाळ तुटू देऊ नका. चळवळीतील नेत्यांवर आरोप करीत असताना त्यांनी चळवळीसाठी काय केले आहे, याचीही जाणीव ठेवा, असे आवाहन केले.प्रास्ताविक का.रा. वालदेकर यांनी केले. नीलकांत कुलसंगे यांनी गौरवपत्राचे वाचन केले. संचालन पल्लवी जीवनतारे यांनी केले. नरेश वाहाने यांनी आभार मानले.‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’चे काव्यात्मक लेखन हे ऐतिहासिक कार्ययावेळी चंद्रशेखर मेश्राम म्हणाले, इ.मो. नारनवरे यांनी अनेक कार्य केले. परंतु बुद्ध आणि त्यांचा धम्म या ऐतिहासिक ग्रंथाचे काव्यात्मक लेखन हे त्यांच्या जीवनातील ऐतिहासिक कार्य असल्याचे आपण मानतो. हा ग्रंथ लवकरच प्रकाशित व्हावा. त्याची जबबादारी आपण स्वीकारायला तयार आहोत. तसेच इ.मो. नारनवरे यांचे अप्रकाशित साहित्य प्रकाशित करण्याची आपण जबाबदारी घेत असल्याचेही त्यांनी यावेळी घोषित केले.

टॅग्स :nagpurनागपूरcultureसांस्कृतिक