शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB च्या वाट्याला यंदाही 'ई साला कप नामदे' नाहीच! राजस्थान रॉयल्सकडून 'विराट' स्वप्नांचा चुराडा 
2
चित्त्यापेक्षा चपळ! विराट कोहलीचा भन्नाट थ्रो, ध्रुव जुरेल रन आऊट; Janhvi Kapoor चं सेलिब्रेशन
3
पुणे अपघात प्रकरणी बाल हक्क न्यायालयाचा मोठा निर्णय; १७ वर्षांच्या 'बाळा'ची बालसुधारगृहात रवानगी
4
२२ खून, अनेक गुन्हे, वेशांतर करून रामललांच्या दर्शनाला गेला असताना पोलिसांनी आवळल्या मुसक्या
5
हे आहेत लोकसभा निवडणूक लढवत असलेले सर्वात श्रीमंत उमेदवार, संपत्तीचा आकडा वाचून विस्फारतील डोळे  
6
"मद्य घोटाळा असो किंवा नॅशनल हेराल्ड घोटाळा...", PM मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
7
RCB चे तारे ज़मीन पर! महत्त्वाच्या सामन्यात शरणागती, राजस्थान रॉयल्सची सुरेख गोलंदाजी
8
फुल राडा! RR चा कोच कुमार संगकारा तिसऱ्या अम्पायरला जाब विचारायला गेला अन्... Video
9
रोव्हमन पॉवेलचा Stunner कॅच; फॅफ ड्यू प्लेसिस माघारी, पण विराट कोहलीने रचला विक्रम भारी
10
विराट कोहलीला 'फसव्या' चेंडूवर युझवेंद्र चहलने गंडवले; विक्रमवीराला तंबूत पाठवले, Video 
11
भाजप किती जागा जिंकेल? अमेरिकेतील प्रसिद्ध राजकीय तज्ञाने केली भविष्यवाणी, म्हणाले...
12
Fact Check: राष्ट्रपती मुर्मू यांच्या रंगावर भाष्य करतानाचा पंतप्रधान मोदींचा 'तो' Video एडिटेड
13
PHOTOS: ब्यूटी विद ब्रेन! सर्वात तरूण IAS अधिकारी; सौंदर्याच्या बाबतीत जणू काही अभिनेत्रीच
14
पुण्यातील अपघाताबाबत राहुल गांधींचा तो दावा गैरसमजातून, असीम सरोदेंनी सांगितली कायद्यातील तरतूद
15
उच्च न्यायालयाचा ममता सरकारला दणका; 2010 नंतर दिलेली सर्व OBC प्रमाणपत्रे रद्द
16
आला उन्हाळा, तब्येत सांभाळा; उष्णतेमुळे 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
17
धार्मिक वक्तव्ये टाळा, सैन्याचे राजकारण करू नका; भाजप-काँग्रेसला निवडणूक आयोगाचे निर्देश
18
इंडिया आघाडीतून पंतप्रधान कोण होणार? जयराम रमेश म्हणाले- "सर्वात मोठ्या पक्षाचा उमेदवार..."
19
वर्ल्ड कपच्या तोंडावर अमेरिकेकडून बांगलादेशचा धुव्वा; भारताच्या शिलेदारानं सामना गाजवला
20
राज ठाकरेंचं विधान अन् सभागृहात हशा; मुलांमधील लठ्ठपणाबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

आयुष्यमान भारत योजना : राज्यात केवळ ८३ लाख लाभार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 10:41 AM

केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना ‘आयुष्यमान भारत’मध्ये २०११ मध्ये झालेले सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षणानुसार (एसईसीसी) केवळ ८३ लाख लाभार्थी कुटुंबानाच याचा लाभ मिळणार आहे.

ठळक मुद्देनागपूर जिल्ह्यात ३ लाख ७७ हजार लाभार्थी

सुमेध वाघमारे।लोकमत न्यूज नेटवर्कनागूपर : केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना ‘आयुष्यमान भारत’ची सुरुवात राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये २५ सप्टेंबरला पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जन्मदिनापासून करण्याचा प्रयत्न आहे. मात्र, २०११ मध्ये झालेले सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षणानुसार (एसईसीसी) केवळ ८३ लाख लाभार्थी कुटुंबानाच याचा लाभ मिळणार आहे. तर, नागपूर जिल्ह्यात फक्त ३ लाख ७७ हजार लाभार्थी कुटुंब पात्र ठरले आहेत. धक्कादायक म्हणजे जिल्ह्यातील २०६ गावांमध्ये शून्य लाभार्थी अशी नोंद आहे.‘आयुष्यमान भारत’ म्हणजे राष्ट्रीय आरोग्य विमा योजनेंतर्गत एका कुटुंबाला पाच लाख रुपये विमा संरक्षण, कोणत्याही आजारांवर देशभरातील नामांकित रुग्णालयात लाभार्थी कुटुंबातील व्यक्तींना उपचार घेता येणार आहे.२०११ मध्ये झालेले सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षणानुसार (एसईसीसी) लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आली. यात ज्या कुटुंबाचे उत्पन्न एक लाखाच्या आत आहे अशाच कुटुंबाचा समावेश करण्यात आला आहे.या यादीनुसार आरोग्य विभागाने राज्यातील शहरी व ग्रामीण भागातील पात्र कुटुंबातील व्यक्तींचे आधार कार्ड, मोबाईल नंबर, कुटुंबाची माहिती संकलित करण्याचे कार्य आता अंतिम टप्प्यात आले आहे. परंतु अनेक पात्र कुटुंबीयांची नावे यादीत नसल्याने गोंधळ उडाला आहे. राज्याची लोकसंख्या ११ कोटी २४ लाखवर पोहचली असताना ८३ लाख ६३ हजार ६६४ कुटुंबीयांना याचा लाभ मिळणार आहे.नागपूर जिल्ह्याचा विचार केल्यास, ४७ लाख लोकसंख्या असताना ३ लाख ७७ हजार ३०१ लाभार्थी पात्र ठरविण्यात आले आहे.याच कुटुंबातील पाच व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळणार आहे. यामुळे उर्वरित नागपूर जिल्ह्यातील ४३ लाख लोकसंख्येमध्ये कुणी गरीब नाही का, प्रत्येक कुटुंबाचे उत्पन्न एक लाखावर आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.नागपूर शहरात ३२८ वॉर्डात २ लाख लाभार्थीराष्ट्रीय आरोग्य विमा योजनेंतर्गत नागपूर जिल्ह्यातील शहरी भाग असलेल्या ३२८ वॉर्डातून २ लाख ३९८ लाभार्थी कुटुंबीयांची निवड करण्यात आली आहे. यात कळमेश्वरमधील १९८३, कामठीमधील ८०६३, काटोलमधील २२००, खापामधील ८६३, मोहपामधील ९४, मोवाडमधील ११७२, नागपूर महानगरपालिकेंतर्गत १ लाख ७६ हजार १०३, नरखेडमधील २६९३, रामटेकमधील २१६५, सावनेरमधील २१७६ तर उमरेडमधील २८८६ कुटुंबीयांची निवड करण्यात आली आहे. नागपूर शहराच्या २५ लाख लोकसंख्या असलेल्या १३५ वॉर्डातून केवळ सात टक्केच पात्र कुटुंबाना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

१८९१ गावांत १ लाख ७६ हजार पात्र कुटुंबआयुष्यमान योजनेच्या यादीत नागपूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत अंतर्गत १८९१ गावांचा समावेश करण्यात आला आहे. यात १ लाख ७६ हजार ९०३ पात्र कुटुंब आहेत. उर्वरित २०६ गावांमध्ये गरीब कुटुंबच नसल्याने त्या गावाचे नाव यादीत समाविष्ट करण्यात आलेले नाही. ही गावे जाणीवपूर्वक डावलण्यात आल्याचा आरोपही होत आहे.

टॅग्स :Healthआरोग्यGovernmentसरकार