शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
5
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
6
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
7
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
9
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
10
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
11
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
12
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
13
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
14
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
15
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
16
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
17
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
18
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
19
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
20
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
Daily Top 2Weekly Top 5

- तर नागपुरात लातूरसारखी स्थिती

By admin | Updated: April 20, 2016 03:09 IST

लातूर-मराठवाड्यामध्ये पाण्याचा दुष्काळ असल्याच्या पार्श्वभूमीवर नागपुरात पाणी असले तरी लाखो लिटर पाण्याचा अपव्यय थांबविला नाही तर येथेही दुष्काळजन्य स्थिती निर्माण होऊ शकते.

दररोज लाखो लिटर पाणी जाते वाया : अपव्यय थांबविला नाही तर गंभीर दुष्परिणामनागपूर : लातूर-मराठवाड्यामध्ये पाण्याचा दुष्काळ असल्याच्या पार्श्वभूमीवर नागपुरात पाणी असले तरी लाखो लिटर पाण्याचा अपव्यय थांबविला नाही तर येथेही दुष्काळजन्य स्थिती निर्माण होऊ शकते. कारण पाण्याचा इतर स्रोत नाही आणि उपलब्ध पाणी योग्य प्रमाणात उपयोगात आणणे गरजेचे आहे. अन्यथा अपव्यय झाला तर उपलब्ध पाणी संपण्याची स्थिती गंभीर पाणी संकट निर्माण करू शकते. यात प्रशासनासह प्रत्येक नागरिकाने सहभाग देण्याची आवश्यकता आहे. मनपाच्यावतीने शहराबाहेरील वस्त्यांमध्ये करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यादरम्यान दररोज जवळपास एक लाख लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. टँकरमधून वाहून जाणाऱ्या पाण्याचे जतन करून अन्य वस्त्यांमध्ये पाणी पोहोचविण्याचे आवाहन सामाजिक संघटनांनी केले. मनपातर्फे जवळपास २३० आणि ओसीडब्ल्यूचे ११० अशा एकूण ४४० टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. ओसीडब्ल्यू टँकर योग्यस्थितीत असल्याशिवाय पाणीपुरवठ्यासाठी परवानगी देतच नाही. तर मनपाच्या २३० टँकरपैकी १०० पेक्षा जास्त टँकरवर झाकण नाही, शिवाय लिकेजमुळे त्यातून सतत पाणी वाहत असते. अशा १०० टँकरच्या प्रत्येकी १० अशा एकूण एक हजार फेऱ्या दररोज होतात. प्रत्येक टँकरमधून १०० लिटरपेक्षा जास्त पाण्याचा अपव्यय होत असल्याचे दिसून आले आहे. शहरात दररोज एक लाख लिटर पाणी वाया जाते. झाकण नसलेले आणि लिकेज असणारे टँकर तात्काळ बंद करण्याची मागणी सामाजिक संघटनांनी केली आहे. नेटवर्क एरिया आणि नॉन मेट्रो एरियात पोहोचविण्यात येणारे पाणी सुभाननगर, डेप्टी सिग्नल, आसीनगर झोन, डम्पिंग यार्ड, म्हाळगीनगर, रेशीमबाग, वंजारीनगर, लक्ष्मीनगर, सेमिनरी हिल्स, वांजरा पाण्याच्या टाकीवरून टँकरमध्ये भरले जाते. या पाण्याच्या टाकीवरून टँकरमध्ये पाणी भरतानासुद्धा येथील कर्मचाऱ्यांच्या चुकांमुळे हजारो लिटर पाणी वाया जाते. या चुका टाळल्या तर मोठ्या प्रमाणात पाणी बचत होऊ शकते. नागपुरात मुबलक पाणी आहे. पण दररोज लाखो लिटर पाणी वाया जात असेल तर भविष्यात लातूरसारखी परिस्थिती होण्यास वेळ लागणार आहे.