शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
2
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
3
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
4
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
5
लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
7
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
8
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
9
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
10
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
11
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
12
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
13
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
15
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
16
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
17
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
18
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
19
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
20
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा

गृहमंत्र्यांच्या आदेशाने मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज, नाना पटोले यांचा थेट फडणवीसांवर वार

By कमलेश वानखेडे | Updated: September 2, 2023 15:51 IST

राहुल गांधी यांचे जोरदार भाषण होत असताना लाठीचार्ज करण्याचे पाप केले

नागपूर :मराठा आरक्षणासाठी  उपोषण करणाऱ्यांवर  लाठीचार्ज होणे, हे दुर्दैवी आहे. गृहमंत्र्यांच्या आदेशाने मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे जोरदार भाषण होत असताना लाठीचार्ज करण्याचे पाप केले, असा थेट आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. 

शनिवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना पटोले म्हणाले, लहान मुलांवर लाठीचार्ज झाला, गृहमंत्री म्हणतात सौम्य लाठीचार्ज करायला सांगितले होते. आमिष देऊन मराठा समाजावार लाठीचार्ज केला. स्वतः सरकारने राजीनामे दिले पाहिजे, जनता माफ करणार नाही. महाराष्ट्राची संस्कृती संपवण्याचा घाट सरकार घालत आहे, हा प्रयत्न यशस्वी होणार नाही, असे पटोले म्हणाले. मराठा समाजाला न्याय देण्यासाठी कॉंग्रेस भूमिका निभावेल, असे म्हणत पटोले यांनी राष्ट्रीय जनगणना करून घेण्याची मागणी केली.

पोलीस तुमचे, आदेश तुमचे, मग राजकरण कोण करत आहे? हे सरकारं स्वत: भ्रष्टाचार करून परिवारवाद करण्याचा आरोप कॉंग्रेसवर करत आहे. इंडिया आघाडीची बैठक असल्यान प्रयत्न अयशस्वी करण्यासाठी हे केले. २४ तासांत आरक्षण आणून देण्याची फडणवीस बतावणी करत होते. या सर्व चोराच्या उलट्या बोंबा आहेत. नियमित अधिवेशन आताच संपले, पंतप्रधान यांच्याकडे मणिपूरवर बोलण्यासाठी वेळ नाही, आता अधिवेशन बोलवत आहेत. जुमलेबाज सरकार आहे, वेळेवर काहीही करतील, निवडणुका लावतील, लोकांनी यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी केले.

भारत भारत आहे. मूळ मुद्याला दुर्लक्ष करत असेल तर त्यावर चर्चाच करायची गरज नाही. पाकिस्तानचे लोक हिंदुस्तान म्हणतात. सरसंघचालक मोहन भागवत हे देखील हिंदुस्थान म्हणत आहे, असा चिमटाही त्यांनी काढला.

रविवारपासून जनसंवाद पदयात्रा

- जनसंवाद पदयात्रेची सुरुवात रविवारी आष्टी शहिद येथून होत आहे. राज्यातील विविध स्थळी ही यात्रा सुरू करत आहे. जुमलेबाज सरकार आहे, तरुणांना फसवलं, सर्वसामान्य लोकांचं जगन मुश्किल केले, या जनसंवाद यात्रेतून या सरकारची पोलखोल करणार आहोत. ३ ते १२ सप्टेंबर  ही यात्रा आहे, नवरात्र नंतर दुसरी यात्रा होईल, असेही पटोले यांनी सांगितले 

ईव्हीएम ऐवजी बॅलेटने मतदान घ्या

-  वन नेशन वन इलेक्शन घेण्यास हरकत नाही. पण निवडणुका निष्पक्ष व्हाव्यात. ईव्हीएम ऐवजी बॅलेटने मतदान घ्यावे, मग ती ग्रामपंचायत पासून लोकसभेपर्यंत निवडणुका घेतल्या तरी चालेल. आमची हरकत नाही, असेही पटोले यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :PoliticsराजकारणNana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसMaratha Reservationमराठा आरक्षणBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस