शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
2
अजित पवारांचा घूमजाव, आधी म्हणाले कल्पना होती, आता म्हणतात, "पार्थच्या जमीन व्यवहाराची माहिती नाही"
3
रस्त्यावर भटके कुत्रे दिसले नाही पाहिजे, त्यांना..; सर्वोच्च न्यायालयाचे तीन मोठे आदेश
4
Larissa Nery : "मी राहुल गांधींना ओळखत नाही, भारतात..."; ब्राझिलियन महिलेला वाटली भीती, केला मोठा खुलासा
5
दुकानातून हळूहळू कमी होत होता दारूचा स्टॉक; कपल करत होतं भरलेल्या बाटल्यांची चोरी! कसं पकडलं?
6
२५ लाख ते ६० लाख... गृहकर्जावर महिन्याचा खर्च किती? तुमचा EMI कमी करण्यासाठी 'हा' कालावधी निवडा
7
मारुतीने व्हिक्टोरिस लाँच केली अन् या कारवर बंपर सूट दिली; ऑक्टोबरपेक्षा आणखी ५४,००० रुपयांनी स्वस्त केली...
8
पहिल्याच दिवशी जमिनीवर आला 'हा' आयपीओ; गुंतवणूकदारांना मोठं नुकसान, GMP नं केला 'विश्वासघात'
9
Jasprit Bumrah Record : बुमराहचा मोठा पराक्रम! पाकिस्तानी गोलंदाजाला धोबीपछाड देत बनला 'नंबर वन'
10
Astro Tips: काही जातकांच्या पत्रिकेत विवाह योगच नसतो; त्यांनी कोणता उपाय करावा? पाहू 
11
२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
12
शनिवारी संकष्ट चतुर्थी, ३ राशींना साडेसाती; ‘हे’ ५ उपाय नक्की करा, शनिदोषातून मुक्तता मिळवा!
13
Video - बॅकबेंचर ते चार्टर्ड अकाउंटंट... लेक CA होताच बापाने मारली घट्ट मिठी, डोळ्यांत आनंदाश्रू
14
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
15
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
16
नितीश कुमारांची डोकेदुखी वाढणार? वाढीव मतदानामुळे सत्तांतराची शक्यता? आकडे काय सांगतात?
17
कार्तिक संकष्ट चतुर्थी २०२५: चंद्रोदयाची वेळ काय? ‘असे’ करा व्रत; राहु काळ, शुभ मुहूर्त पाहा
18
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
19
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
20
Jara Hatke: पूजेत, धर्मकार्यात वापरला जाणारा पांढरा शुभ्र कापूर कसा तयार करतात माहितीय?

गृहमंत्र्यांच्या आदेशाने मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज, नाना पटोले यांचा थेट फडणवीसांवर वार

By कमलेश वानखेडे | Updated: September 2, 2023 15:51 IST

राहुल गांधी यांचे जोरदार भाषण होत असताना लाठीचार्ज करण्याचे पाप केले

नागपूर :मराठा आरक्षणासाठी  उपोषण करणाऱ्यांवर  लाठीचार्ज होणे, हे दुर्दैवी आहे. गृहमंत्र्यांच्या आदेशाने मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे जोरदार भाषण होत असताना लाठीचार्ज करण्याचे पाप केले, असा थेट आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. 

शनिवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना पटोले म्हणाले, लहान मुलांवर लाठीचार्ज झाला, गृहमंत्री म्हणतात सौम्य लाठीचार्ज करायला सांगितले होते. आमिष देऊन मराठा समाजावार लाठीचार्ज केला. स्वतः सरकारने राजीनामे दिले पाहिजे, जनता माफ करणार नाही. महाराष्ट्राची संस्कृती संपवण्याचा घाट सरकार घालत आहे, हा प्रयत्न यशस्वी होणार नाही, असे पटोले म्हणाले. मराठा समाजाला न्याय देण्यासाठी कॉंग्रेस भूमिका निभावेल, असे म्हणत पटोले यांनी राष्ट्रीय जनगणना करून घेण्याची मागणी केली.

पोलीस तुमचे, आदेश तुमचे, मग राजकरण कोण करत आहे? हे सरकारं स्वत: भ्रष्टाचार करून परिवारवाद करण्याचा आरोप कॉंग्रेसवर करत आहे. इंडिया आघाडीची बैठक असल्यान प्रयत्न अयशस्वी करण्यासाठी हे केले. २४ तासांत आरक्षण आणून देण्याची फडणवीस बतावणी करत होते. या सर्व चोराच्या उलट्या बोंबा आहेत. नियमित अधिवेशन आताच संपले, पंतप्रधान यांच्याकडे मणिपूरवर बोलण्यासाठी वेळ नाही, आता अधिवेशन बोलवत आहेत. जुमलेबाज सरकार आहे, वेळेवर काहीही करतील, निवडणुका लावतील, लोकांनी यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी केले.

भारत भारत आहे. मूळ मुद्याला दुर्लक्ष करत असेल तर त्यावर चर्चाच करायची गरज नाही. पाकिस्तानचे लोक हिंदुस्तान म्हणतात. सरसंघचालक मोहन भागवत हे देखील हिंदुस्थान म्हणत आहे, असा चिमटाही त्यांनी काढला.

रविवारपासून जनसंवाद पदयात्रा

- जनसंवाद पदयात्रेची सुरुवात रविवारी आष्टी शहिद येथून होत आहे. राज्यातील विविध स्थळी ही यात्रा सुरू करत आहे. जुमलेबाज सरकार आहे, तरुणांना फसवलं, सर्वसामान्य लोकांचं जगन मुश्किल केले, या जनसंवाद यात्रेतून या सरकारची पोलखोल करणार आहोत. ३ ते १२ सप्टेंबर  ही यात्रा आहे, नवरात्र नंतर दुसरी यात्रा होईल, असेही पटोले यांनी सांगितले 

ईव्हीएम ऐवजी बॅलेटने मतदान घ्या

-  वन नेशन वन इलेक्शन घेण्यास हरकत नाही. पण निवडणुका निष्पक्ष व्हाव्यात. ईव्हीएम ऐवजी बॅलेटने मतदान घ्यावे, मग ती ग्रामपंचायत पासून लोकसभेपर्यंत निवडणुका घेतल्या तरी चालेल. आमची हरकत नाही, असेही पटोले यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :PoliticsराजकारणNana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसMaratha Reservationमराठा आरक्षणBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस