शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

गृहमंत्र्यांच्या आदेशाने मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज, नाना पटोले यांचा थेट फडणवीसांवर वार

By कमलेश वानखेडे | Updated: September 2, 2023 15:51 IST

राहुल गांधी यांचे जोरदार भाषण होत असताना लाठीचार्ज करण्याचे पाप केले

नागपूर :मराठा आरक्षणासाठी  उपोषण करणाऱ्यांवर  लाठीचार्ज होणे, हे दुर्दैवी आहे. गृहमंत्र्यांच्या आदेशाने मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे जोरदार भाषण होत असताना लाठीचार्ज करण्याचे पाप केले, असा थेट आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. 

शनिवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना पटोले म्हणाले, लहान मुलांवर लाठीचार्ज झाला, गृहमंत्री म्हणतात सौम्य लाठीचार्ज करायला सांगितले होते. आमिष देऊन मराठा समाजावार लाठीचार्ज केला. स्वतः सरकारने राजीनामे दिले पाहिजे, जनता माफ करणार नाही. महाराष्ट्राची संस्कृती संपवण्याचा घाट सरकार घालत आहे, हा प्रयत्न यशस्वी होणार नाही, असे पटोले म्हणाले. मराठा समाजाला न्याय देण्यासाठी कॉंग्रेस भूमिका निभावेल, असे म्हणत पटोले यांनी राष्ट्रीय जनगणना करून घेण्याची मागणी केली.

पोलीस तुमचे, आदेश तुमचे, मग राजकरण कोण करत आहे? हे सरकारं स्वत: भ्रष्टाचार करून परिवारवाद करण्याचा आरोप कॉंग्रेसवर करत आहे. इंडिया आघाडीची बैठक असल्यान प्रयत्न अयशस्वी करण्यासाठी हे केले. २४ तासांत आरक्षण आणून देण्याची फडणवीस बतावणी करत होते. या सर्व चोराच्या उलट्या बोंबा आहेत. नियमित अधिवेशन आताच संपले, पंतप्रधान यांच्याकडे मणिपूरवर बोलण्यासाठी वेळ नाही, आता अधिवेशन बोलवत आहेत. जुमलेबाज सरकार आहे, वेळेवर काहीही करतील, निवडणुका लावतील, लोकांनी यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी केले.

भारत भारत आहे. मूळ मुद्याला दुर्लक्ष करत असेल तर त्यावर चर्चाच करायची गरज नाही. पाकिस्तानचे लोक हिंदुस्तान म्हणतात. सरसंघचालक मोहन भागवत हे देखील हिंदुस्थान म्हणत आहे, असा चिमटाही त्यांनी काढला.

रविवारपासून जनसंवाद पदयात्रा

- जनसंवाद पदयात्रेची सुरुवात रविवारी आष्टी शहिद येथून होत आहे. राज्यातील विविध स्थळी ही यात्रा सुरू करत आहे. जुमलेबाज सरकार आहे, तरुणांना फसवलं, सर्वसामान्य लोकांचं जगन मुश्किल केले, या जनसंवाद यात्रेतून या सरकारची पोलखोल करणार आहोत. ३ ते १२ सप्टेंबर  ही यात्रा आहे, नवरात्र नंतर दुसरी यात्रा होईल, असेही पटोले यांनी सांगितले 

ईव्हीएम ऐवजी बॅलेटने मतदान घ्या

-  वन नेशन वन इलेक्शन घेण्यास हरकत नाही. पण निवडणुका निष्पक्ष व्हाव्यात. ईव्हीएम ऐवजी बॅलेटने मतदान घ्यावे, मग ती ग्रामपंचायत पासून लोकसभेपर्यंत निवडणुका घेतल्या तरी चालेल. आमची हरकत नाही, असेही पटोले यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :PoliticsराजकारणNana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसMaratha Reservationमराठा आरक्षणBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस