शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

नागपूर जिल्ह्यातल्या कोंढाळीत आहे ग्रामस्थांच्या हक्काचे ज्ञानमंदिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 1:10 PM

काटोल तालुक्यातील कोंढाळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेबद्दल असलेला जिव्हाळा इतका आहे की, ही शाळा ग्रामस्थांच्या आपुलकीचे ज्ञानमंदिर झाली आहे.

ठळक मुद्देअनेक पिढ्या केल्या संस्कारीत शाळेने गाठले शतक, ग्रामस्थांचा पाठिंबा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्हा परिषदेच्या शाळांच्या बाबतीत उदासीन दृष्टिकोन दिसून येतो. शाळेच्या इमारतीपासून भौतिक सुविधेपर्यंत अशी अनेक कारणे आहेत, ज्यामुळे पालकांची मानसिकता बदलत आहे. परिणामी जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या घसरत चालली आहे. पण काटोल तालुक्यातील कोंढाळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे चित्र याउलट आहे. येथे पालकांचा शाळेबद्दल असलेला जिव्हाळा इतका आहे की, ही शाळा ग्रामस्थांच्या आपुलकीचे ज्ञानमंदिर झाली आहे. विशेष म्हणजे या शाळेची शतकोत्तरी वाटचाल सुरू आहे.वीज बिल न भरल्यामुळे वीज पुरवठा खंडित होण्यासारखे असे अनेक प्रश्न जिल्हा परिषदेच्या शाळांना भेडसावत आहेत. पण कोंढाळीच्या जि.प. शाळेला ग्रामस्थांचा पूर्ण पाठिंबा आहे. त्यामुळेच ही शाळा परिसरातील खासगी शाळांवर मात करीत जिल्हा परिषदेचे अस्तित्व टिकवून आहे. गावातील अनेक पिढ्या या शाळेने संस्कारित केल्या आहेत. त्यामुळे शाळेबद्दलचा जिव्हाळा ग्रामस्थांना आहे. लोकसहभागातून शाळेत कॉन्व्हेंट सुरू करण्यात आले आहे. शाळेवर आलेल्या कुठल्याही आपत्तीला, आवश्यकतेला, भौतिक सोयीसुविधांसाठी ग्रामस्थ एकत्र येऊन लोकसहभागातून निधी गोळा करतात. या शाळेबद्दलचा जेवढा जिव्हाळा ग्रामस्थांचा आहे, तेवढाच जिव्हाळा येथील शिक्षक आणि मुख्याध्यापकांचा आहे. मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनात आणि ग्रामस्थांच्या समन्वयातून ही शाळा प्रगतीकडे वाटचाल करीत आहे.शाळेत शिकणारे विद्यार्थी शेतमजूर व कामगार वर्गातील आहेत. पण पहिल्या वर्गापासून येथे विद्यार्थ्यांना संगणकाचे प्रशिक्षण मिळते आहे. शाळेच्या सर्व खोल्या डिजिटल करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या मानसिकतेच्या दृष्टिकोनातून शिक्षकांनी अध्यापनाच्या पद्धती बदलविल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना विविध उपक्रमांच्या माध्यमातून वाव दिला जात आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र