शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

चिमुकलीचे अपहरण, बलात्कार अन् हत्या, क्रूरकर्मा पुरीच्या फाशीचे प्रकरण हायकोर्टात

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: June 25, 2024 18:44 IST

१ जुलै रोजी सुनावणी : कळमेश्वर तालुक्यामधील संतापजनक घटना

राकेश घानोडेनागपूर : पाच वर्षीय चिमुकलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करणारा आणि तिला दगडाने ठेचून ठार मारणारा क्रूरकर्मा संजय पुरी (३७) याच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब करण्यासाठी राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रकरण दाखल केले आहे. त्यावर येत्या १ जुलै रोजी न्यायमूर्तिद्वय विभा कंकणवाडी व वृषाली जोशी यांच्यासमक्ष सुनावणी होणार आहे. ही संतापजनक घटना कळमेश्वर तालुक्यामधील लिंगा गावात ६ डिसेंबर २०१९ रोजी घडली.

सत्र न्यायालयाने संजय पुरीला ३ जून २०२४ रोजी फाशीची शिक्षा सुनावली आहे. फौजदारी प्रक्रिया संहितेमधील कलम ३६६ अनुसार फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यासाठी त्यावर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब करणे बंधनकारक आहे. त्यामुळे राज्य सरकारने हे प्रकरण उच्च न्यायालयात दाखल केले आहे. लिंगा गाव एका शेतामुळे दोन वस्तीत विभागले गेले आहे. पीडित चिमुकली गावाच्या एका भागात आईवडिलांसह राहत होती तर, दुसऱ्या भागात तिच्या आजीचे घर होते. ६ डिसेंबर २०१९ रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास ती शेत ओलांडून आजीच्या घरी जात होती. दरम्यान, पुरीने तिला उचलून शेताच्या आतमध्ये नेले व तिच्यावर पाशवी बलात्कार केला. त्यानंतर तिची दगडाने डोके ठेचून निर्घृण हत्या केली. चिमुकली अचानक बेपत्ता झाल्यामुळे पालकांनी ७ डिसेंबर रोजी कळमेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. परंतु, दोन दिवस चिमुकलीचा पत्ता लागला नाही. परिणामी, पोलिसांनी गावात पोहोचून सखोल तपास केला असता पुरीचे वर्तन संशयास्पद वाटले. त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbai High Courtमुंबई हायकोर्टDeathमृत्यू