शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
2
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
3
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
4
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
5
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
6
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
‘एक्स्प्रेस वे’वर पुन्हा कोंडी, पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक कोलमडली; ‘मिसिंग लिंक’ही ठप्प
9
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
10
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
11
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
12
"पहिल्याच दिवशी स्पष्ट सांगा की मी महत्त्वाचा नाही किंवा..."; २०२७ वर्ल्डकपबाबत विराटचे सूचक विधान
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
19
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
20
मोदीजी जे सांगत आहेत ते देशहितासाठीच, देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

खोब्रागडे यांची मृत्यूशी झुंज संपली

By admin | Updated: May 24, 2014 01:07 IST

गोंदिया जिल्ह्यातील कवलेवाडा येथे पेट्रोल टाकून जिवंत पेटविलेल्या संजय खोब्रागडे यांची अखेर मृत्यूशी झुंज संपली. शुक्रवारी सकाळी ७.३० वाजता मेडिकलमध्ये उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

पेट्रोल टाकून जिवंत पेटविल्याचे प्रकरण : मृतदेह घेण्यास नातेवाईकांचा नकार

नागपूर/गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील कवलेवाडा येथे पेट्रोल टाकून जिवंत पेटविलेल्या संजय खोब्रागडे यांची अखेर मृत्यूशी झुंज संपली. शुक्रवारी सकाळी ७.३० वाजता मेडिकलमध्ये उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. खोब्रागडे यांचा मृतदेह शवविच्छेदन गृहात आणला असता विविध आंबेडकरी संघटनांनी जोरदार नारेबाजी केली. खोब्रागडे यांचा मुलगा प्रदीप याने शवविच्छेदनाला लागणार्‍या पंचनाम्यावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला. पोलिसांच्या कस्टडीत असलेली त्याची आई देविकाबाई निर्दोष असून तिनेच पंचनाम्यावर सही करावी, अशी मागणी त्याने आणि संघटनांनी लावून धरल्याने सायंकाळपर्यंत तणावाचे वातावरण होते. गोंदिया जिल्ह्यात गोरेगाव तालुक्यातील कवलेवाडा येथील रहिवासी खोब्रागडे यांच्यावर १६ मे रोजी मध्यरात्री पेट्रोल टाकून पेटवून दिले. शनिवारी सायंकाळी खोब्रागडे यांना अत्यवस्थ अवस्थेत मेडिकलमध्ये आणले. वॉर्ड क्रमांक १९ मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू झाले. ९४ टक्के जळालेल्या खोब्रागडेंचे पाय सोडून सर्वांग जळाले होते. त्यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांना दुसर्‍याच दिवशी वॉर्ड क्र. ४ मध्ये हलविण्यात आले. शर्तीचे उपचार सुरू असताना आज त्यांचा मृत्यू झाला. मृतदेह मेडिकलच्या शवविच्छेदन गृहात आणण्यात आला. यावेळी विविध आंबेडकरी सामाजिक संघटनांनी शासनाच्या विरोधात जोरदार नारेबाजी केली. त्यांच्या मते पोलीस करीत असलेला तपास चुकीचा आहे. शासनाने पोलिसांकडून हा तपास काढून सीबीआयकडे सोपवावा, तसेच शवविच्छेदनाकरिता पोलिसांच्या पंचनाम्यावर देविकाबाईच स्वाक्षरी करेल, अशी या मागणीला करीत त्यांचा मुलगा व संघटनेचे कार्यकर्ते अडून बसले होते. रात्री उशिरापर्यंत पंचनाम्यावर स्वाक्षरी झालेली नव्हती. दरम्यान, या प्रकरणाची सीबीआय किंवा विशेष पथकाकडून चौकशी करावी अशी मागणी करीत आंबेडकरी संघटनांनी ‘गोंदिया शहर बंद’चे आवाहन केले होते. यासाठी दिवसभर कार्यकर्ते गटागटांनी शहराच्या व्यापार लाईनमध्ये घोषणा देत फिरत होते. तहसील कार्यालयासमोर धरणेही देण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या नावे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. खोब्रागडे यांना त्यांची पत्नी व तिच्या प्रियकराने जाळल्याचा पोलीस केवळ देखावा करीत असून यात आधी अटक करण्यात आलेल्या सहा आरोपींना वाचविण्यासाठीच पोलिसांनी या प्रकरणाला वळण दिल्याचा आरोप आंबेडकरवादी संघटनांंनी केला. (प्रतिनिधी)