शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
2
India Womens T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
3
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
4
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
5
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
6
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
7
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
9
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
10
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
11
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
12
उल्हासनगरातील नेताजी चौकात मुलीच्या वादातून राडा, तरुणांच्या पोटात चाकू खुपसून जीवेठार मारण्याचा प्रयत्न 
13
'मला दाखवला तो मुलगा हीरोसारखा होता, हा तो नाहीच', मांडवात वधूचा धिंगाणा, थेट पोलीसच बोलावले, मग...
14
Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... 
15
८ मुलांची आई जावयासोबत फरार; मेहंदीच्या बहाण्याने शेतात भेटले अन् दुचाकीवरून पळाले!
16
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
17
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
18
पेट्रोलमध्ये ८५ टक्के इथेनॉलच्या चर्चेने 'हा' शेअर सुसाट; नितीन गडकरींच्या मुलाची आहे कंपनी
19
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
20
भारताच्या 'या' राज्यात सापडला दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जिवंत बॉम्ब; लष्कराच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!
Daily Top 2Weekly Top 5

काटोल खून खटला; आरोपीला जन्मठेप

By admin | Updated: May 1, 2016 03:00 IST

काटोल येथे चाकूने हल्ला करून एकाला ठार आणि तीन जणांना जखमी केल्याच्या प्रकरणात अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. टी. सूर्यवंशी यांच्या न्यायालयाने ...

सत्र न्यायालय : दुकानाचे गाळे विकण्याच्या वादातून घडला होता थरारनागपूर : काटोल येथे चाकूने हल्ला करून एकाला ठार आणि तीन जणांना जखमी केल्याच्या प्रकरणात अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. टी. सूर्यवंशी यांच्या न्यायालयाने एका आरोपीला जन्मठेप आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंडाच्या रकमेतील पाच हजार रुपये मृताच्या पत्नीला आणि प्रत्येकी एक हजार रुपये जखमींना नुकसान भरपाई म्हणून देण्याचा आदेश न्यायालयाने दिला. प्रेमचंद चंद्रभान चरडे (६३) असे आरोपीचे नाव असून, तो काटोलच्या चंडिका वॉर्ड दोडकीपुरा येथील रहिवासी आहे. नंदकिशोर नामदेव कोरडे (४०), असे मृताचे नाव होते. तो पंचवटी काटोल येथील रहिवासी होता. नंदकिशोरचे वडील नामदेव रघुनाथ कोरडे (७३), विलास महादेवराव चरडे (५६) आणि कुणाल ऊर्फ बाल्या गोविंदराव बाभूळकर (३५) रा. दोडकीपुरा, अशी जखमींची नावे आहेत. यातील जखमींपैकी विलास चरडे यांचे खटल्याची सुनावणी संपल्यानंतर नुकतेच आजाराने निधन झाले. या खटल्याची पार्श्वभूमी अशी, आरोपी प्रेमचंद चरडे याने आपल्या घरासमोरील स्वत:च्याच मोकळ्या जागेत दुकानाच्या गाळ्यांचे बांधकाम केले होते. त्यापैकी खालचे एक गाळे त्याने नामदेव कोरडे यांना २००२ मध्ये विकले होते. कोरडे यांनी तेथे शुभम पशू खाद्य भंडार नावाचे दुकान सुरू केले होते. व्यवस्थित बांधकाम करून न देता आगाऊ पैसे घेतल्याने कोरडे कुटुंब आणि प्रेमचंद चरडे यांच्यात भांडण होऊन वैमनस्य निर्माण झाले होते. खुनीहल्ल्याची ही थरारक घटना २६ सप्टेंबर २०१३ रोजी घडली होती. घटनेच्या वेळी नामदेव कोरडे हे आपल्या शुभम पशू खाद्य भंडारसमोर बसलेले होते, तर त्यांचा मुलगा नंदकिशोर हा शेजारच्या कुणाल बाभूळकर याच्या दुकानासमोर बसलेला होता. त्याच वेळी प्रेमचंद चरडे हा बाहेरून आला होता. त्याने अचानक नामदेव कोरडे यांच्या मानेवर चाकूने वार केले होते. त्यानंतर त्याने शेजारी राहणारे विलास चरडे यांच्या गळ्यावर, हातावर चाकूने वार केल्यानंतर तो डोक्यात सैतान संचारल्याप्रमाणे नंदकिशोर याच्याकडे धावला होता. त्याला खाली पाडून त्याच्या छातीवर, गळ्यावर चाकूने वार केले होते. त्यानंतर लागलीच तो रक्ताने भरलेल्या अवस्थेत कुणाल बाभूळकरच्या सलूनच्या दुकानात शिरला होता. तेथे कुणालच्या गळ्यावर आणि हातावर वार केले होते. या थरारक घटनेने परिसरात पळापळ झाली होती. काटोलमध्ये पसरली होती दहशतया घटनेने या भागात दहशत पसरून लोकांनी आपापली दुकाने बंद केली होती. आरोपी प्रेमचंद चरडे हा घटनास्थळावरून पळून गेला होता. जखमींना मेडिकल कॉलेज इस्पितळाकडे उपचारार्थ रवाना करण्यात आले असता, नंदकिशोर कोरडे याचा मृत्यू झाला होता. नंदकिशोरची आई रेखाबाई कोरडे यांच्या तक्रारीवरून काटोल पोलिसांनी भादंविच्या ३०२, ३०७ कलमान्वये गुन्हा दाखल करून प्रेमचंद चरडे याला अटक केली होती. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक बी. एन. ठाकरे यांनी करून, आरोपीविरुद्ध न्यायालयात सबळ पुराव्यांसह आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात एकूण आठ साक्षीदार तपासण्यात आले. गुन्हा सिद्ध होऊन आरोपीला भादंविच्या ३०२ कलमांतर्गत जन्मठेप आणि सहा हजार रुपये दंड, भादंविच्या ३०७ कलमांतर्गत सात वर्षे सश्रम कारावास आणि चार हजार रुपये दंड सुनावण्यात आला. न्यायालयात सरकारच्या वतीने प्रमुख जिल्हा सरकारी वकील विजय कोल्हे तर आरोपीच्या वतीने अ‍ॅड. सुरेंद्र गडलिंग यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)