शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
2
Ahmedabad Plane Crash Live Updates : भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
3
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
4
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
5
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
6
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
7
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
8
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
9
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
10
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
11
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
12
Ahmedabad Plane Crash: "ज्यांनी जीव गमावला, त्यांना.."; अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
13
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
14
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
15
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
16
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारतीचा भाग कोसळला, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
17
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
18
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
19
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
20
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?

काेल वॉशरीजने ग्रामस्थांचे जगणे मुश्कील; पारशिवनी तालुक्यातील भीषण वास्तव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2022 15:41 IST

एमपीसीबी अधिकारी घेणार नागरिकांच्या भेटी

नागपूर : विदर्भातील शेतकऱ्यांना एकीकडे नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागताे तर दुसरीकडे औष्णिक वीजकेंद्रातून बाहेर पडणाऱ्या प्रदूषणाचीही समस्या सहन करावी लागते. वीजकेंद्रातून निघणारी राख आणि वॉशरीजमधून निघाऱ्या धुळीने लाेकांचे जगणे मुश्कील केले आहे. पारशिवनी तालुक्यातील वडारा आणि येसंबा या दाेन्ही गावच्या शेतजमिनींची धुळधाण हाेत असताना ग्रामस्थांची ओरड कुणाच्या कानावर पडत नाही.

वडारा आणि येसंबा या गावच्या शेतजमिनीच्या मधाेमध ही काेल वॉशरीज आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, कोळशाची प्रतवारी करण्यात येत असलेली वॉशरीज कोरडी आणि उघडी आहे. येथे २०-२२ फूट उंच ढिगाऱ्यांमध्ये काेळसा साठवला जातो. कोळशाच्या धुळीमुळे आजूबाजूच्या तीन किमी परिसरात प्रचंड प्रदूषण होत आहे. गावांतील सुमारे ५० शेतकरी त्यांच्या शेतजमिनीत भाजीपाला, कापूस, सोयाबीन, कडधान्ये पिकवतात आणि गोड लिंबाच्या बागाही आहेत.

मार्च २०२१ मध्ये कोल वशरीजचे काम सुरू झाले. कोळशाच्या धुळीचा पिकांवर गंभीर परिणाम होत असून जवळजवळ ७५ टक्के उत्पादन कमी झाले आहे. शिवाय शेतकरी आणि ग्रामस्थांच्या आरोग्यावरदेखील परिणाम हाेत असून डोळ्यात जळजळ होणे, श्वास घेण्यास त्रास होणे आणि घशात वारंवार संसर्ग होण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी)चे प्रादेशिक अधिकारी ए.एम. करे यांच्यानुसार, वशरीज सुरू करण्यासाठी सशर्त परवानगी देण्यात आली होती; पण कोणत्या अटींची पूर्तता करायची होती, हे त्यांनी स्पष्ट केले नाही. वडारा गावाजवळील गोंडेगाव कोल वॉशरीज, ज्याला गुप्ता कोल वॉशरीज म्हणूनही ओळखले जाते, त्यांना नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल पाच लाख रुपयांची बँक गॅरंटी भरण्यासह प्रदूषण नियंत्रण प्रणालीच्या ऑपरेशन्स आणि देखभालीसाठी पाच लाख रुपयांची बँक हमी सादर करण्यास सांगितले आहे.

कापूस उत्पादक शेतकरी कृष्णा किलेकर यांनी व्यथा मांडली. वॉशरीजच्या धुरामुळे कापूस काळा पडत असल्याने त्याला भाव मिळत नसल्याचे ते म्हणाले. शिवाय वॉशरीजमधून निघणाऱ्या दूषित पाण्यामुळे जमीन काळी पडली असून तिचा पाेत घसरला आहे. संत्री, माेसंबीचेही नुकसान हाेत आहे. एवढेच नाही वॉशरीजचे पाणी कॅनलद्वारे थेट पेंच नदीत पाेहाेचत असून शेतातील विहिरी अत्यंत प्रदूषित झाल्या असल्याची व्यथा त्यांनी मांडली.

आज शेतकऱ्यांच्या भेटी घेणार

दरम्यान, एमपीसीबीचे अधिकारी गुरुवारी शेतकरी आणि काेल वॉशरीज मालकांशी भेट घेऊन या समस्यांवर चर्चा करणार असल्याचे ए.एम. करे यांनी ‘लाेकमत’शी बाेलताना सांगितले.

टॅग्स :pollutionप्रदूषणenvironmentपर्यावरणnagpurनागपूरwater pollutionजल प्रदूषण