शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
2
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
3
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
4
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
5
"सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
6
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
7
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
8
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
9
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
10
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
11
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
12
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
13
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
14
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
15
रशिया युक्रेन युद्ध संपूर्ण युरोपात पसरणार, NATO देशांचं सैन्य सज्ज; झेलेन्स्कींचा जगाला मोठा इशारा
16
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण
17
VIRAL : भूकंपाच्या झटक्यानं आसाम हादरलं, नर्सनी धाडस दाखवलं! स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले बाळांचे प्राण 
18
'दशावतार' पाहायला गेलेल्या अमराठी प्रेक्षकाच्या डोळ्यांत पाणी, दिलीप प्रभावळकरांना दिला कडक सॅल्यूट, थिएटरमधील व्हिडीओ
19
हृदयद्रावक! BMW ने घेतला भारत सरकारच्या मोठ्या अधिकाऱ्याचा जीव; नेमकं काय घडलं?
20
UPI Rule Change: आजपासून मोठा बदल, मोठा दिलासा; आता UPI मधून एका दिवसात करू शकता 'इतक्या' लाखांचं ट्रान्झॅक्शन

काेल वॉशरीजने ग्रामस्थांचे जगणे मुश्कील; पारशिवनी तालुक्यातील भीषण वास्तव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2022 15:41 IST

एमपीसीबी अधिकारी घेणार नागरिकांच्या भेटी

नागपूर : विदर्भातील शेतकऱ्यांना एकीकडे नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागताे तर दुसरीकडे औष्णिक वीजकेंद्रातून बाहेर पडणाऱ्या प्रदूषणाचीही समस्या सहन करावी लागते. वीजकेंद्रातून निघणारी राख आणि वॉशरीजमधून निघाऱ्या धुळीने लाेकांचे जगणे मुश्कील केले आहे. पारशिवनी तालुक्यातील वडारा आणि येसंबा या दाेन्ही गावच्या शेतजमिनींची धुळधाण हाेत असताना ग्रामस्थांची ओरड कुणाच्या कानावर पडत नाही.

वडारा आणि येसंबा या गावच्या शेतजमिनीच्या मधाेमध ही काेल वॉशरीज आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, कोळशाची प्रतवारी करण्यात येत असलेली वॉशरीज कोरडी आणि उघडी आहे. येथे २०-२२ फूट उंच ढिगाऱ्यांमध्ये काेळसा साठवला जातो. कोळशाच्या धुळीमुळे आजूबाजूच्या तीन किमी परिसरात प्रचंड प्रदूषण होत आहे. गावांतील सुमारे ५० शेतकरी त्यांच्या शेतजमिनीत भाजीपाला, कापूस, सोयाबीन, कडधान्ये पिकवतात आणि गोड लिंबाच्या बागाही आहेत.

मार्च २०२१ मध्ये कोल वशरीजचे काम सुरू झाले. कोळशाच्या धुळीचा पिकांवर गंभीर परिणाम होत असून जवळजवळ ७५ टक्के उत्पादन कमी झाले आहे. शिवाय शेतकरी आणि ग्रामस्थांच्या आरोग्यावरदेखील परिणाम हाेत असून डोळ्यात जळजळ होणे, श्वास घेण्यास त्रास होणे आणि घशात वारंवार संसर्ग होण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी)चे प्रादेशिक अधिकारी ए.एम. करे यांच्यानुसार, वशरीज सुरू करण्यासाठी सशर्त परवानगी देण्यात आली होती; पण कोणत्या अटींची पूर्तता करायची होती, हे त्यांनी स्पष्ट केले नाही. वडारा गावाजवळील गोंडेगाव कोल वॉशरीज, ज्याला गुप्ता कोल वॉशरीज म्हणूनही ओळखले जाते, त्यांना नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल पाच लाख रुपयांची बँक गॅरंटी भरण्यासह प्रदूषण नियंत्रण प्रणालीच्या ऑपरेशन्स आणि देखभालीसाठी पाच लाख रुपयांची बँक हमी सादर करण्यास सांगितले आहे.

कापूस उत्पादक शेतकरी कृष्णा किलेकर यांनी व्यथा मांडली. वॉशरीजच्या धुरामुळे कापूस काळा पडत असल्याने त्याला भाव मिळत नसल्याचे ते म्हणाले. शिवाय वॉशरीजमधून निघणाऱ्या दूषित पाण्यामुळे जमीन काळी पडली असून तिचा पाेत घसरला आहे. संत्री, माेसंबीचेही नुकसान हाेत आहे. एवढेच नाही वॉशरीजचे पाणी कॅनलद्वारे थेट पेंच नदीत पाेहाेचत असून शेतातील विहिरी अत्यंत प्रदूषित झाल्या असल्याची व्यथा त्यांनी मांडली.

आज शेतकऱ्यांच्या भेटी घेणार

दरम्यान, एमपीसीबीचे अधिकारी गुरुवारी शेतकरी आणि काेल वॉशरीज मालकांशी भेट घेऊन या समस्यांवर चर्चा करणार असल्याचे ए.एम. करे यांनी ‘लाेकमत’शी बाेलताना सांगितले.

टॅग्स :pollutionप्रदूषणenvironmentपर्यावरणnagpurनागपूरwater pollutionजल प्रदूषण