शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
4
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
5
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
6
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
7
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
8
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
9
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
10
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
11
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
12
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
13
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
14
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
15
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
16
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
17
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
18
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
19
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
20
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

काेल वॉशरीजने ग्रामस्थांचे जगणे मुश्कील; पारशिवनी तालुक्यातील भीषण वास्तव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2022 15:41 IST

एमपीसीबी अधिकारी घेणार नागरिकांच्या भेटी

नागपूर : विदर्भातील शेतकऱ्यांना एकीकडे नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागताे तर दुसरीकडे औष्णिक वीजकेंद्रातून बाहेर पडणाऱ्या प्रदूषणाचीही समस्या सहन करावी लागते. वीजकेंद्रातून निघणारी राख आणि वॉशरीजमधून निघाऱ्या धुळीने लाेकांचे जगणे मुश्कील केले आहे. पारशिवनी तालुक्यातील वडारा आणि येसंबा या दाेन्ही गावच्या शेतजमिनींची धुळधाण हाेत असताना ग्रामस्थांची ओरड कुणाच्या कानावर पडत नाही.

वडारा आणि येसंबा या गावच्या शेतजमिनीच्या मधाेमध ही काेल वॉशरीज आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, कोळशाची प्रतवारी करण्यात येत असलेली वॉशरीज कोरडी आणि उघडी आहे. येथे २०-२२ फूट उंच ढिगाऱ्यांमध्ये काेळसा साठवला जातो. कोळशाच्या धुळीमुळे आजूबाजूच्या तीन किमी परिसरात प्रचंड प्रदूषण होत आहे. गावांतील सुमारे ५० शेतकरी त्यांच्या शेतजमिनीत भाजीपाला, कापूस, सोयाबीन, कडधान्ये पिकवतात आणि गोड लिंबाच्या बागाही आहेत.

मार्च २०२१ मध्ये कोल वशरीजचे काम सुरू झाले. कोळशाच्या धुळीचा पिकांवर गंभीर परिणाम होत असून जवळजवळ ७५ टक्के उत्पादन कमी झाले आहे. शिवाय शेतकरी आणि ग्रामस्थांच्या आरोग्यावरदेखील परिणाम हाेत असून डोळ्यात जळजळ होणे, श्वास घेण्यास त्रास होणे आणि घशात वारंवार संसर्ग होण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी)चे प्रादेशिक अधिकारी ए.एम. करे यांच्यानुसार, वशरीज सुरू करण्यासाठी सशर्त परवानगी देण्यात आली होती; पण कोणत्या अटींची पूर्तता करायची होती, हे त्यांनी स्पष्ट केले नाही. वडारा गावाजवळील गोंडेगाव कोल वॉशरीज, ज्याला गुप्ता कोल वॉशरीज म्हणूनही ओळखले जाते, त्यांना नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल पाच लाख रुपयांची बँक गॅरंटी भरण्यासह प्रदूषण नियंत्रण प्रणालीच्या ऑपरेशन्स आणि देखभालीसाठी पाच लाख रुपयांची बँक हमी सादर करण्यास सांगितले आहे.

कापूस उत्पादक शेतकरी कृष्णा किलेकर यांनी व्यथा मांडली. वॉशरीजच्या धुरामुळे कापूस काळा पडत असल्याने त्याला भाव मिळत नसल्याचे ते म्हणाले. शिवाय वॉशरीजमधून निघणाऱ्या दूषित पाण्यामुळे जमीन काळी पडली असून तिचा पाेत घसरला आहे. संत्री, माेसंबीचेही नुकसान हाेत आहे. एवढेच नाही वॉशरीजचे पाणी कॅनलद्वारे थेट पेंच नदीत पाेहाेचत असून शेतातील विहिरी अत्यंत प्रदूषित झाल्या असल्याची व्यथा त्यांनी मांडली.

आज शेतकऱ्यांच्या भेटी घेणार

दरम्यान, एमपीसीबीचे अधिकारी गुरुवारी शेतकरी आणि काेल वॉशरीज मालकांशी भेट घेऊन या समस्यांवर चर्चा करणार असल्याचे ए.एम. करे यांनी ‘लाेकमत’शी बाेलताना सांगितले.

टॅग्स :pollutionप्रदूषणenvironmentपर्यावरणnagpurनागपूरwater pollutionजल प्रदूषण