शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
2
सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
3
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
4
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
5
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
6
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
7
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
8
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
9
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
10
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
11
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
12
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
13
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
14
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
15
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
16
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
17
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
18
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

तिबेटच्या स्वातंत्र्यासाठी नागपुरातील भंतेंजींचा पायी प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 5:23 PM

चीनच्या ताब्यातून तिबेटला स्वतंत्र करण्याच्या उद्देशाने नागपुरातील एका तरुण भंतेजींनी पुढाकार घेत तिबेटमुक्ती धम्म पदयात्रा सुरू केली आहे. दीक्षाभूमी ते धर्मशाळा असा दोन हजार किमीचा प्रवास ते पायी चालून पूर्ण करणार आहेत. या प्रवासात ते विविध बौद्ध स्थळांना भेटी देत ठिकठिकाणी तिबेटच्या मुक्तीसाठी जनजागृतीही करणार आहेत. तसेच तिबेटचे स्वातंत्र्य हे भारतासाठी कसे महत्त्वाचे आहे, हेही पटवून देणार आहेत.

ठळक मुद्देदीक्षाभूमी ते धर्मशाळा : दोन हजार किमीच्या प्रवासात जनजागृती करणार

आनंद डेकाटे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चीनच्या ताब्यातून तिबेटला स्वतंत्र करण्याच्या उद्देशाने नागपुरातील एका तरुण भंतेजींनी पुढाकार घेत तिबेटमुक्ती धम्म पदयात्रा सुरू केली आहे. दीक्षाभूमी ते धर्मशाळा असा दोन हजार किमीचा प्रवास ते पायी चालून पूर्ण करणार आहेत. या प्रवासात ते विविध बौद्ध स्थळांना भेटी देत ठिकठिकाणी तिबेटच्या मुक्तीसाठी जनजागृतीही करणार आहेत. तसेच तिबेटचे स्वातंत्र्य हे भारतासाठी कसे महत्त्वाचे आहे, हेही पटवून देणार आहेत.भंते रेवत दीक्षाभूमी असे या तरुण भंतेजींचे नाव. चंद्रपूर येथील दीक्षाभूमी येथून त्यांनी आपल्या धम्म पदयात्रेला सुरुवात केली आहे. सध्या ते नागपुरात दाखल झाले आहेत. येथील दीक्षाभूमीला भेट दिली असून, भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांची भेट घेऊन ते पुढील प्रवासाला निघणार आहेत. यादरम्यान त्यांच्याशी संवाद साधता आला. तिबेट हा एक स्वतंत्र देश आहे. परंतु तो सध्या चीनच्या ताब्यात आहे. तिबेट हे पूर्णपणे बौद्ध राष्ट्र आहे. ६० वर्षांपूर्वी चीनने तिबेटवर अतिक्रमण करून ते राष्ट्र आपल्या ताब्यात घेतले. तिबेटी लोक दलाई लामा यांच्या नेतृत्वात आजही आपल्या स्वातंत्र्याची लढाई लढत आहेत. भारतासह जगभरात तिबेटी लोक निर्वासितांचे जीवन जगत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही तिबेटच्या स्वातंत्र्याचे समर्थन करीत भारताने तिबेटला स्वतंत्र राष्ट्राची मान्यता दिली असती तर आज चीनसोबतचा सीमेचा वाद राहिलाच नसल्याचे तेव्हाच स्पष्ट केले होते. तिबेट हे एक बौद्ध राष्ट्र आहे. तथागत गौतम बुद्धांना ते मानतात. त्यामुळे भारताबद्दल त्यांच्या मनात एक नितांत आदर आहे. तसेच भारतानेही पारतंत्र्य भोगले आहे. त्यामुळे स्वतंत्र राष्ट्र याचे महत्त्व एक भारतीय या नात्याने आपल्यालाही आहे. या दोन्ही गोष्टी लक्षात घेता तिबेट स्वतंत्र व्हावे, अशी आपली इच्छा असल्याचे भंते रेवत यांचे म्हणणे आहे. दीक्षाभूमीवरून धर्मशाळापर्यंत ते पायी चालत जात आहेत.यादरम्यान ते विविध ठिकाणी चर्चासत्र, व्याख्यान आदींद्वारे तिबेटची मुक्ती भारतासाठी कशी आवश्यक आहे, हे पटवून देत असून जनजागृती करीत आहेत. त्यांच्या या लढ्यात त्यांना समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा, इंडो तिबेट संघटना, पंचशील बुद्धगया मुक्ती आंदोलन, अखिल भरतीय भिक्खू संघ, महाबोधी सोसायटी आॅफ इंडिया आणि अखिल भारतीय धम्मसेना यांच्यासह देशातील विविध संघटनांचे सहकार्य मिळत आहे.स्वतंत्र तिबेट हे भारताच्या हिताचेचीनचे सामर्थ्य व त्याचे साम्राज्यवादी धोरण लक्षात घेता, आज आपल्याला पाकिस्तानपेक्षा चीनचा अधिक धोका आहे. सीमारेषेवरून नेहमीच वाद होत असतात. दोन्ही देशांचे संबंध बिघडत असतात. अशा परिस्थितीत तिबेट हे स्वतंत्र राष्ट्र असणे हे भारताच्या हिताचे आहे. तिबेट हे स्वतंत्र झाले तर चीनसोबतचा सीमावाद हा कायमचा संपेल. तिबेटसारखे एक शांत शेजारी राष्ट्र भारताला लाभल्याने त्या सीमेवरील तणाव कायमचा संपुष्टात येईल. त्यामुळे ह विषय केवळ तिबेटच्या स्वातंत्र्यापुरता मर्यादित नसून तो भारताच्या कायमस्वरूपी संरक्षणाच्या हिताचाही आहे. याबाबतची आपण जनजागृती करीत आहोत.भंते रेवत दीक्षाभूमी

 

टॅग्स :Diksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमीnagpurनागपूर