शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
3
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
4
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
6
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
7
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
8
Raymond Gautam Singhania : "माझ्या खासगी जीवनाचा व्यवसायाशी..," वडील-पत्नीशी वाददरम्यान गौतम सिंघानियांचं मोठं वक्तव्य
9
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
10
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
11
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
12
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
13
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
14
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
15
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
16
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
17
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
18
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
19
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
20
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...

पत्रकारांनी एकाहून अधिक कौशल्य आत्मसात करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 1:06 PM

स्पर्धेच्या या युगात पत्रकारांसमोर ‘डिजिटलायझेशन’ तसेच ‘एआय’चे (आर्टिफिशियल इन्टेलिजन्स) आव्हान आहे. याला सामोरे जात असताना पत्रकारांनी एकापेक्षा जास्त कौशल्य आत्मसात करणे आवश्यक आहे, असे मत ज्येष्ठ पत्रकार पी.साईनाथ यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देजनसंवाद विभागाचा सुवर्ण महोत्सवी सोहळा साजरा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बदलत्या काळात पत्रकारितेतील कार्यप्रणाली तसेच पत्रकारांवरील जबाबदाऱ्यादेखील बदलत आहे. स्पर्धेच्या या युगात पत्रकारांसमोर ‘डिजिटलायझेशन’ तसेच ‘एआय’चे (आर्टिफिशियल इन्टेलिजन्स) आव्हान आहे. याला सामोरे जात असताना पत्रकारांनी एकापेक्षा जास्त कौशल्य आत्मसात करणे आवश्यक आहे, असे मत ज्येष्ठ पत्रकार पी.साईनाथ यांनी व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील जनसंवाद विभागाच्या सुवर्ण महोत्सवी वर्ष कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.जनसंवाद विभागाच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे, विभागप्रमुख डॉ.मोईज हक प्रामुख्याने उपस्थित होते. महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक यांच्या दैनिकांचे वितरण मर्यादित होते; आजसारखी त्यांची व्याप्ती नव्हती. तरीही त्यांचा प्रभाव आजच्या माध्यमांपेक्षा अधिक होत असे.लोकमान्य टिळकांना वर्तमात्रपत्रांतील लिखाणामुळे मंडालेच्या तुरुंगात पाठविण्यात आले. त्यांच्याविरोधात मुंबईच्या अशिक्षित गिरणी कामगारांनी मोठे आंदोलन केले होते. ते टिळकांच्या वृत्तपत्राचे वाचक नव्हते, पण त्यांना हे माहीत होते की, हा माणूस आपल्या भल्यासाठी लिहितो. पत्रकारांचे स्वातंत्र्य टिकून रहावे यासाठी अशिक्षित कामगारांनी जीवाचे बलिदान केले होते. मागील ३० वर्षांमध्ये माध्यमांना कॉर्पोरेट स्वरूप आले आहे. माध्यमे हा उद्योग असला तरी पत्रकारिता हा काही उद्योग नाही. तो नफ्यासाठी केला जात असेल, पण पत्रकारिता ही आदर्शांनुसार चालते, असे प्रतिपादन पी.साईनाथ यांनी केले.प्रसारमाध्यमांचे सामर्थ्य कायम असून काळानुरुप पत्रकारांना स्वत:ला बदलले पाहिजे. अभ्यासक्रमांमध्येदेखील बदल असतील तर विद्यापीठ त्यासाठी नेहमीच पुढाकार घेईल, असे डॉ.विनायक देशपांडे यांनी सांगितले.डॉ.मोईज हक यांनी संचालन करत असताना विभागाच्या वाटचालीवर तसेच विविध उपक्रमांवर प्रकाश टाकला. प्रा. स्निग्धा खटावकर यांनी संचालन केले तर अमर अणे यांनी आभार मानले.

पत्रकारितेची बदलती व्याप्ती समजून घ्या : पुप्पाला४‘जनसंवाद क्षेत्रातील करिअरच्या नव्या संधी’ या विषयावरील परिसंवादात स्वतंत्र पत्रकार व माध्यम सल्लागार चंद्रमोहन पुप्पाला, वरिष्ठ पत्रकार जयदीप हर्डीकर, ‘सार डिजिटल‘चे प्रमुख अनुराग कुळकर्णी, जी.व्ही.के. नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट कॉर्पोरेशनचे ‘कॉर्पोरेट कम्युनिकेशन’ व्यवस्थापक भालचंद्र चोरघडे, ‘आर.जे.’ मिलिंद पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पत्रकारितेची व्याप्ती बदलते आहे व त्याचा विस्तार होतो आहे. केवळ टीव्ही, वर्तमानपत्र यातूनच पत्रकारिता होते असे नाही. तर नवमाध्यमांतदेखील विविध ‘प्लॅटफॉर्म्स’ उपलब्ध आहेत. मूळ प्रवाहातील माध्यमांसह नवमाध्यमांना उत्कृष्ट मजकूर आवश्यक आहे. त्यामुळे स्वतंत्र पत्रकारिता करत या संस्थांना दर्जेदार मजकूर पुरविला जाऊ शकतो, अशी माहिती चंद्रमोहन पुप्पाला यांनी दिली. खासगी रेडियो क्षेत्रात नव्या टॅलेंटची आवश्यकता आहे. परंतु कौशल्य असलेले मनुष्यबळ मिळत नसल्याची खंत मिलिंद पाटील यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Journalistपत्रकार