शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

निवडणूक आयोग बूथ कॅपचरिंग करत आहे का?

By कमलेश वानखेडे | Updated: November 29, 2024 16:12 IST

नाना पटोले यांचा सवाल : ईव्हीएमवर एवढे प्रेम का ?

कमलेश वानखेडे, नागपूर लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मतदानाच्या शेवटच्या तासात झारखंडमध्ये मते वाढली, पण ते प्रमाण फक्त दीड टक्का होते. मात्र, महाराष्ट्रमध्ये ७.६ टक्के मतदान वाढले. हे मतदान रात्री कसे वाढले, एवढी मोठी लाईन कुठे लागली, त्या लाईनचे फोटो निवडणूक आयोगाने द्यावे, अशी मागणी करीत निवडणूक आयोग बूथ कॅपचरिंग करत आहे का, असा सवाल काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

शुक्रवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना पटोले म्हणाले, आपण निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले त्यावर उत्तर देण्याचा आयोगाने अयशस्वी प्रयत्न केला. सायंकाळी ६ नंतर ६२.२ टक्के मतदान झाल्यावर रात्री ६६.५ टक्के मतदान झाल्याचे सांगतात. ९ लाख मते कशी वाढली याचे उत्तर आयोगाने द्यावे. सर्वोच्च न्यायालय व निवडणूक आयोग पारदर्शक कारभार असल्याचे सांगतात, मग ईव्हीएमचे एवढे प्रेम का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या विरोधात राज्यभरात स्वाक्षरी मोहीम राबविली जाईल. लाखो लोकांच्या स्वाक्षरीसह मुख्य निवडणूक आयोगाला पत्र दिले जाईल. आम्ही न्यायालयीन लढाई लढू, निवडणूक आयोगाला प्रश्न विचारू, जण भावनेची लढाई लढू, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

निवडणूक आयोगाच्या कृपेने आलेले सरकारमतदान वाढले त्याचा फायदा कोणाला होतो याची चर्चा होते, पण निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे. आम्ही मतदान वाढवले असे आयोग ट्विट करते, पण हे मतदान कसे वाढले, याचे स्पष्टीकरण देत नाही. हे लोकांचा मतांनी नव्हे तर निवडणूक आयोगाच्या कृपेने आलेले सरकार आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

पाच दिवस होऊनही सरकार अस्तित्वात नाहीमुख्यमंत्री कोण होईल याचा निर्णय भाजप नेचे घेतील. पण निकाल लागून पाच दिवस झाले तरी सरकार अस्तित्वात आले नाही, हे चिंताजनक आहे. एकनाथ शिंदे नाराज आहेत की आणखी कुणी याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही, असेही पटोले यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगnagpurनागपूरcongressकाँग्रेसMahayutiमहायुतीEVM Machineईव्हीएम मशीन