शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

भारतात वर्षभरात २८ लाख क्षयरोगाच्या रुग्णांची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 22:04 IST

दहा मृत्यूच्या प्रमुख कारणात क्षयरोगाचा समावेश आहे. जगभरात क्षयरोगाचे १०.४ दशलक्ष नवे रुग्ण आढळून येतात. गेल्या वर्षी म्हणजे २०१७ मध्ये भारतात क्षयरोगाचे २७ लाख ९० हजार नवे रुग्ण आढळून आले यातील ४ लाख ३५ हजार रुग्णांचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देसाडे चार लाख रुग्णांचा मृत्यू : खासगी डॉक्टरांकडून नि:शुल्क उपचाराची सोय

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दहा मृत्यूच्या प्रमुख कारणात क्षयरोगाचा समावेश आहे. जगभरात क्षयरोगाचे १०.४ दशलक्ष नवे रुग्ण आढळून येतात. गेल्या वर्षी म्हणजे २०१७ मध्ये भारतात क्षयरोगाचे २७ लाख ९० हजार नवे रुग्ण आढळून आले यातील ४ लाख ३५ हजार रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे क्षयरोगाच्या समूळ उच्चाटनासाठी डॉक्टरांसह प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी उचलायला हवी, असा सूर शहरातील प्रसिद्ध फुफ्फुसरोग तज्ज्ञांनी काढला.२४ मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिवस म्हणून साजरा केला जातो. या रोगाला घेऊन जनजागृतीसाठी गुरुवारी आयोजित पत्रपरिषदेचे शहरातील फुफ्फुसरोग तज्ज्ञ सहभागी झाले होते. यात डॉ. रविंद्र सरनाईक, मेडिकलचे विभाग प्रमुख डॉ. सुशांत मेश्राम, मेयोच्या विभाग प्रमुख डॉ. राधा मुंजे, डॉ. राजेश स्वर्णकार, डॉ. ज्ञानशंकर मिश्रा, डॉ. समीर अरबट, डॉ. विवेक गुप्ता, डॉ. विक्रांत देशमुख, डॉ. समुेध चौधरी, डॉ. विनीत निरंजने, डॉ. गौतम मोहरील, डॉ. विक्रम राठी, डॉ. जितेंद्र जैसवानी, डॉ. सुहास टिकले व डॉ. राजेश बलाल उपस्थित होते.रोज ४५०० रुग्णांचा मृत्यू-डॉ. सरनाईकडॉ. रवींद्र सरनाईक म्हणाले, वैद्यकीय उपचारांमध्ये बरीच प्रगती झाली असलीतरी क्षयरोग हा प्रथम क्रमांकाचा जीवघेणा रोग आजही कायम आहे. जगात या रोगाने रोज ४५०० रुग्णांचा मृत्यू होतो. यातच हे जंतू विविध औषधांना प्रतिरोध निर्माण होऊन दाद देत नसल्याने एका मोठ्या महाभयानक परिस्थितीस सामोरे जावे लागत आहे. परिणामी, क्षयरोगाचे उच्चाटनाचे प्रयत्न विफल ठरत आहे.नि:शुल्क उपचार पद्धती-डॉ. स्वर्णकारडॉ. राजेश स्वर्णकार म्हणाले, क्षयरुग्णाला लवकरात लवकर औषधोपचार मिळावा म्हणून व क्षयरोगाचे प्रमाण कमी व्हावे म्हणून केंद्र शासनाने ‘युएटीबीसी’ प्रकल्प हाती घेतला आहे. यात खासगी डॉक्टर्स व औषध दुकानांना सहभागी करून घेतले आहे. या प्रकल्पांतर्गत खासगी डॉक्टरला क्षयरुग्णाच्या नोंदणीसाठी ५०० रुपये व उपचार पूर्ण झाल्यावर ५०० रुपये शासन देणार आहे. शिवाय, नेमलेल्या औषध दुकानांमधून नि:शुल्क औषध मिळणार आहे.चार दशलक्ष एचआयव्हीबाधितांचा मृत्यू-डॉ. मुंजेडॉ. राधा मुंजे म्हणाल्या, एचआयव्ही बाधितांसाठी क्षयरोग धोकादायक ठरत आहे. जगात १०.४ दशलक्ष नवे क्षयरोगाचे रुग्ण आढळून येतात, यात १० टक्के एचआयव्ही बाधित असतात. २०१६ मध्ये १.७ दशलक्ष रुग्णांचा क्षयरोगाने मृत्यू झाला यात ‘.४’ दशलक्ष एचआयव्हीबाधित होते. सध्या मल्टीड्रग रेझिसटन्ट टीबी (एमडीआर-टी) एक नवे आवाहन देशापुढे आहे. २०१६ मध्ये ‘एमडीआर’चे ०.५ दशलक्ष रुग्ण आढळून आले होते.शहरात ‘एक्सडीआर’चे ११ रुग्ण-डॉ. मिश्राडॉ. ज्ञानशंकर मिश्रा म्हणाले, क्षयरोगाचे जे रुग्ण व्यवस्थित औषधी (डॉट्स) घेत नाही किंवा अर्धवट घेतात त्यांना क्षयरोगाची पुढची पायरी ‘मल्टीड्रग रेझिसटन्ट ट्युबरक्युलॉसिस’ (एमडीआर-टीबी) आणि त्याहीपुढे जाऊन ‘एक्सटेसिव्ह ड्रग रेझिसटन्ट ट्युबरक्युलॉसिस’ (एक्सडीआर-टीबी) होतो. नागपुरात सध्या ‘एमडीआर’चे १२६ तर ‘एक्सडीआर’चे ११ रुग्ण आहेत. या रुग्णाच्या संसगार्तून वर्षातून डझनभर सामान्य व्यक्तींना हा आजार सहज होऊ शकतो.

टॅग्स :doctorडॉक्टरnagpurनागपूर