शहरं
Join us  
Trending Stories
1
'दक्षिणेतील लोक आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
2
४ जूनच्या निकालानंतर सगळं स्पष्ट होईल; शरद पवारांच्या विधानावर पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
सॅम पित्रोदांनी ईशान्य आणि दक्षिण भारतातील लोकांच्या रंगावरून केलेल्या टिप्पणीला मोदींचं प्रत्युत्तर, म्हणाले...   
4
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
5
उत्तर मुंबईतील सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रीत करणार; पीयूष गोयल यांनी दिली ग्वाही
6
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर; ४ जागांसाठी 'या' तारखेला मतदान
7
Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
परशुराम जन्मोत्सव: विष्णूंचा सहावा अवतार, शस्त्र-शास्त्रात पारंगत चिरंजीव; वाचा, महात्म्य
9
अरे देवा! ब्युटी पार्लरमध्ये भेटल्या, एकमेकींच्या प्रेमात पडल्या अन् घरातून पळाल्या; कोर्ट म्हणतं...
10
...अन् सुरेश रैनाने सिद्धार्थ जाधवला मारली मिठी, अभिनेता म्हणाला- "तुम्ही माझं कौतुक केलं..."
11
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
12
30 वर्ष सहन केला नवऱ्याचा अत्याचार; बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्रीचे लग्नानंतर झाले अतोनात हाल
13
Babar Azam म्हणजे बिन कामाचा भाऊ; पाकिस्तानातील अभिनेत्रींनी कर्णधाराची उडवली खिल्ली
14
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
15
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?
16
रश्मिका मंदानाला विसरा, आता ही साऊथ अभिनेत्री बनली 'नॅशनल क्रश'; दुप्पट केलं मानधन
17
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
18
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
19
अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!
20
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  

इंधन दरवाढीचा परिणाम भाजीपाल्यावर, स्वयंपाक घरातील बजेट कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2022 1:20 PM

जीवनावश्यक वस्तूंसह खाद्यतेल, सिलिंडर आणि अन्य वस्तूंचे दर आकाशाला भिडले आहेत. त्यात पेट्रोल आणि डिझेलच्या महागाईने भर टाकली आहे. भाज्यांच्या किमतीने आर्थिक बोजा वाढला आहे.

नागपूर : पेट्रोल आणि डिझेलची महागाई आता स्वयंपाकघरात पोहोचली आहे. मालवाहतुकीच्या दरवाढीसह भाज्यांचेही दर वाढले आहेत. भाज्यांची सर्वाधिक आवक नागपूर जिल्ह्याबाहेरून आणि अन्य राज्यांतून होत असल्यामुळे दर आवाक्याबाहेर गेले आहेत. पाच दिवसांपूर्वी होलसेलमध्ये ६० रुपयांवर गेलेले टोमॅटोचे दर आता ३० रुपयांपर्यंत खाली आले आहेत; पण दर्जा घसरला आहे. किरकोळमध्ये ५० ते ६० रुपये किलो भाव आहे. हिरवी मिरची, कोथिंबीर आणि पालेभाज्यांचे दरही वाढले आहेत.

किरकोळमध्ये बहुतांश भाज्यांचे भाव ५० ते ६० रुपये किलो आहेत. होलसेलमध्ये भाव वाढल्याचा परिणाम किरकोळ बाजारात दिसून येत आहे. सिलिंडरचे दर वाढल्यामुळे घराचे बजेट बिघडले आहे. आता भाज्या महाग झाल्यामुळे घर कसे सांभाळायचे, असा प्रश्न गृहिणींना पडला आहे.

गरीब आणि मध्यमवर्गीयांवर आर्थिक बोजा

जीवनावश्यक वस्तूंसह खाद्यतेल, सिलिंडर आणि अन्य वस्तूंचे दर आकाशाला भिडले आहेत. त्यात पेट्रोल आणि डिझेलच्या महागाईने भर टाकली आहे. भाज्यांच्या किमतीने आर्थिक बोजा वाढला आहे. हिरवी मिरची आणि कोथिंबीरचे भाव ८० रुपयांवर पोहोचले आहेत. केवळ वांगे, पत्ता कोबी, भेंडी, कोहळे, लवकीचे भाव कमी आहेत. जून महिन्यापर्यंत जास्त भावात भाज्या खरेदी कराव्या लागतील, असे कॉटन मार्केटचे व्यापारी राम महाजन यांनी सांगितले.

महाजन म्हणाले, नागपूर शहरालगतच्या शेतीत भाज्यांच्या उत्पादनात घट झाली आहे. स्थानिक उत्पादक शेतकऱ्यांकडून केवळ ३० टक्के भाज्यांची आवक आहे. डिझेलचा भाव वाढल्यामुळे भाज्यांच्या किमतीवर आणि दर्जावर परिणाम झाला आहे. कोथिंबीर नांदेड, पंढरपूर आणि मध्यप्रदेशचा काही भाग, हिरवी मिरची बुलडाणा, मौदा, टोमॅटो बरेली, जयपूर आणि वांगे मुलताई येथून येत आहे.

टॅग्स :Inflationमहागाईnagpurनागपूरvegetableभाज्या