शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

विदर्भात पावसानं भिजलं सारं रान, नागपूरकर मात्र उकाड्याने हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2023 11:11 IST

यवतमाळात १४६ मि.मी., गडचिराेलीतही झमाझम : पारा घसरला पण...

नागपूर : गेल्या अनेक दिवसांपासून विदर्भवासी आकाशाकडे टक लावून पाहत हाेते. अखेर विदर्भावर वरुणराजाची कृपादृष्टी बरसली; पण नागपूरकरांबाबत मात्र अवकृपा दिसून आली. नागपूरकरांच्या पदरात थाेड्या थेंबाशिवाय काहीच पडले नाही. पारा काही अंशी घसरला खरा पण उकाड्याचा त्रास कमी झाला नाही.

बुधवारी दिवसभर अकाेला वगळता पावसाने कुठेही हजेरी लावली नाही; मात्र मंगळवारच्या रात्री धाे-धाे बरसलेल्या पावसाने विदर्भात बहुतेक भागाला चिंब केले. यवतमाळात १२ तासात तब्बल १४६.१ मि.मी. पाऊस झाला. या जिल्ह्यातील आर्णी, दिग्रस, महागाव तालुक्यातही पाऊस जाेरात बरसला. गडचिराेली जिल्ह्यातही वरुणराजाची बरी कृपा झाली. रात्रभरात शहरात ६८ मि.मी. पावसाची नाेंद झाली. याशिवाय वर्धा ३७.२ मि.मी., बुलढाणा ३२, गाेंदिया ३१.५ मि.मी. तसेच चंद्रपूर, अमरावतीत दिलासा देणारी हजेरी लावली. अकाेल्यात बुधवारी ३२ मि.मी. पाऊस बरसला.

नागपुरात रात्री काही ठिकाणी ५-१० मिनिटांसाठी सरी आल्या पण ते अगदीच नगण्य हाेते. जिल्ह्यात कळमेश्वरला मात्र जाेरात पाऊस झाला. येथे ६४ मि.मी. पावसाची नाेंद झाली आहे. बुधवारी दिवसभर मात्र पावसाने हुलकावणी दिली. सकाळपासून ढगाळ वातावरण हाेते खरे; पण दमट उकाड्याने आजही नागरिकांचा घाम काढला. पारा २.८ अंशाने घसरत ३४.२ अंशावर आला पण सरासरीपेक्षा अद्याप ताे अधिक आहे. विदर्भातील इतर जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे पारा २४ तासात ३ ते ६ अंशापर्यंत खाली घसरला. रात्रीच्या तापमानातही माेठी घसरण झाल्याचे दिसून आले.

हवामान विभागाने आणखी दाेन दिवस विदर्भात चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे नागपूरकरांना वरुणराजाची कृपा बरसण्याची आस आहे.

टॅग्स :environmentपर्यावरणRainपाऊसnagpurनागपूरVidarbhaविदर्भ