शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ला झालाच तर...! ५०,००० जवानांची विशेष 'ड्रोन फोर्स'; भारतीय सैन्याचा मोठा निर्णय
2
राज्यपालांना दोनदा भेटले तरीही विजय यांना सत्तास्थापनेचं निमंत्रण नाही, राज्यघटनेत काय म्हटलंय?
3
Top Marathi News Live: विजय यांची बहुमत जुळवण्यासाठी धडपड, आणखी एका पक्षाला पाठवले पत्र
4
अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी वापरले जाणारे 'ग्लॉक ४३X' पिस्तूल बंगालमध्ये कसे आले? जाणून घ्या या हायटेक पिस्तूलची वैशिष्ट्ये
5
मारुतीची स्विफ्ट हायड्रोजनवर धावणार, सुझुकीने जगासमोर सादर केली नवी टेक्नॉलॉजी 
6
हायव्होल्टेज ड्रामा! घरी ईडीची धाड पडताच ९ व्या मजल्यावरुन फेकल्या नोटांनी फेकलेल्या बॅगा
7
प. बंगालमध्ये खेला होबे! ममता बॅनर्जी यांच्या बैठकीतून पक्षाचे १० आमदार गायब; राजकीय चर्चांना उधाण
8
Mangala Thoke : शिकण्याची जिद्द! दिवसा घरकाम, रात्री अभ्यास; ६८ वर्षांच्या आजींनी ६०% गुणांसह पास केली बारावी
9
Jio चा छुपा रुस्तम प्लॅन!... दिसतच नाही, १४९ रुपयांत महिना जाणार, हे सर्च करा...
10
अमेरिकेत विमानाला अपघात, लँडिंग करताना हायवेवरील ट्रकला धडकलं आणि...; व्हिडीओ व्हायरल!
11
Samudrik Shastra: चेहरा बघून ओळखा स्वभाव! गोल, चौकोनी की अंडाकृती? काय सांगतो तुमचा 'फेस शेप'?
12
कधीकाळी सचिन तेंडुलकरसोबत टीम इंडियात केले पर्दापण; आज मानसिक आजाराशी लढतोय 'हा' खेळाडू
13
अनिल परब यांची राज्यभर गाजलेल्या दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणातून निर्दोष मुक्तता
14
चंद्रनाथ रथ हत्येनंतर भाजपची मोठी घोषणा! पश्चिम बंगालमधून सगळ्या गुंडांना साफ करणार, सुवेंदु अधिकारी भडकले...  
15
अण्णा द्रमुकसोबत जाणार,  विरोधात बसणार, की...? स्टॅलिन यांनी केली मोठी घोषणा 
16
राज्य सरकारचा विभाग शक्तिपीठ महामार्गाची माहिती देत नाही- राजू शेट्टी यांचा आरोप
17
सुनेत्रा पवार यांच्या जागी छगन भुजबळ राज्यसभेवर जाणार? येवल्याची सूत्रे समीर भुजबळांकडे जाण्याची चर्चा
18
Manoj Tiwari : "सन्मानाने बाजूला व्हा, अन्यथा..."; ममता बॅनर्जींचा राजीनामा देण्यास नकार, मनोज तिवारींचं टीकास्त्र
19
Numerology: प्रगतीतील अडथळे दूर करण्यासाठी महत्त्वाच्या कामाला जाताना मूलांकानुसार 'हे' रंग टाळा!
20
धक्कादायक! १५ वर्षीय मुलीवर वडील अन् मामाकडून अत्याचार; नात्याला काळीमा फासणारी घटना उघड
Daily Top 2Weekly Top 5

तूर वाळतेय तर चणा पिवळा पडतोय !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:22 IST

सौरभ ढोरे काटोल : अति पावसामुळे खरीप हंगामात काटोल तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. आता ढगाळ वातावरण व पहाटे ...

सौरभ ढोरे

काटोल : अति पावसामुळे खरीप हंगामात काटोल तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. आता ढगाळ वातावरण व पहाटे पडणाऱ्या धुक्क्याचा फटका रबी पिकांना बसतो आहे. तालुक्यात बहुतांश भागात तुरीचे पीक सोकाटल्याचे दिसून येत आहे. रबी हंगामातील चणा पिकावरही याचा परिणाम दिसून येत आहे. चणा पीक पिवळे पडायला लागले आहे. यासोबतच भाजीपाल्यावर वातावरणीय बदलाचा फटका बसताना दिसून येत आहे. गतवर्षीच्या तुलनेत काटोल तालुक्यात यंदा खरीपाचे क्षेत्र अधिक होते. अतिवृष्टीने मात्र सर्वत्र नुकसान झाले. हंगामातील शेवटचे पीक तूर तारेल अशी शेतकऱ्यांना आशा होती. मात्र तसे होताना दिसत नाही. तालुक्यात ५,६३६ हेक्टर क्षेत्रात तूरीची लागवड करण्यात आली होती. मात्र जमिनीतील अति ओलाव्यामुळे तूरीने पाहिजे तसा जोम धरला नाही. काही ठिकाणी उशिरा लागवड करण्यात आलेल्या क्षेत्रात आता ढगाळ वातावरणाचा फटका बसतो आहे. यंदा तालुक्यात १३,७४२ हेक्टरमध्ये रबीचा पेरा झाला आहे. यात गहू ७५७५ हेक्टर, हरभरा ५७०५ हेक्टर तर मका १२३ हेक्टर क्षेत्रात आहे. भाजीपाल्याची लागवड ३३८ हेक्टरमध्ये करण्यात आली आहे. यातील हरभरा (चणा) पिकावर ढगाळ वातावरणामुळे घाटे अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तविली आहे. पहाटेच्या धुक्यामुळे चणा पिवळट पडायला लागला आहे.

कीटनाशकाची फवारणी करा

काही भागातील तूर आता कापून बाजूला झाली आहे. मात्र ज्यांचे पेरे उशिरा झाले त्या पिकांना वातवरणीय बदलाचा फटका बसत आहे. अशी स्थितीवर तुरीवर उपाय शक्य नाही. चण्यावर ढगाळ वातावरणाने व धुक्यामुळे घाटे अळी दुसऱ्या आणि तिसऱ्या स्टेजवर असल्याचे समजते . त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच पिकावर कीटकनाशक फवारणी करावी असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले.