शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

- तर उन्हाळ्यात भार नियमन अटळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 19:48 IST

महाजनकोला आवश्यक कोळसा मिळाला नाही तर, या उन्हाळ्यात भार नियमन अटळ आहे. सध्या महाजनकोला रोज १९ टक्के कमी कोळसा पुरवठा होत आहे. उन्हाळ्यात वाढणारी वीजेची मागणी पूर्ण करण्यासाठी महाजनकोने रोज १ लाख ५० हजार १०० टन कोळशाची मागणी केली आहे. त्यामुळे कोळसा कंपन्यांपुढे मोठे आव्हान आहे.

ठळक मुद्दे१९ टक्के कोळशाचा तुटवडा : रोज १.५० लाख टन कोळशाची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महाजनकोला आवश्यक कोळसा मिळाला नाही तर, या उन्हाळ्यात भार नियमन अटळ आहे. सध्या महाजनकोला रोज १९ टक्के कमी कोळसा पुरवठा होत आहे. उन्हाळ्यात वाढणारी वीजेची मागणी पूर्ण करण्यासाठी महाजनकोने रोज १ लाख ५० हजार १०० टन कोळशाची मागणी केली आहे. त्यामुळे कोळसा कंपन्यांपुढे मोठे आव्हान आहे.महाजनकोने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर करून ही स्थिती स्पष्ट केली आहे. मार्च ते जून या काळात वीजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प पूर्ण क्षमतेने उपयोगात आणणे आवश्यक आहे. त्याकरिता रोज १ लाख ५० हजार १०० टन कोळशाची गरज भासणार आहे. ७ आॅक्टोबर २०१७ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कोळसा कंपन्यांनी महाजनकोला रोज १ लाख १९ हजार मॅट्रिक टन कोळसा देण्याचे मान्य केले होते. परंतु, आतापर्यंत महाजनकोला दर दिवशी सुमारे ९५ हजार ७७३ टन कोळसा मिळाला आहे. पुरवठ्यात रोज १९ टक्के कोळशाचा तुटवडा आहे. परिणामी, क्षमतेपेक्षा कमी वीज निर्मिती होत आहे अशी माहिती न्यायालयाला देण्यात आली आहे.या प्रकरणावर सोमवारी न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व मुरलीधर गिरटकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. न्यायालयाने महाजनकोचे प्रतिज्ञापत्र रेकॉर्डवर घेऊन पुढील मुद्दे विचारात घेण्यासाठी १४ मार्च रोजी सुनावणी निश्चित केली. उच्च न्यायालयात कोळसा आयात व त्यात होणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहारासंदर्भात जनहित याचिका प्रलंबित आहेत. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर यांनी बाजू मांडली.२२ दिवसांचा साठा आवश्यकमार्गदर्शकतत्वानुसार महाजनकोच्या प्रत्येक औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पात किमान २२ दिवस पुरेल एवढा कोळशाचा साठा ठेवणे आवश्यक आहे. पुरेसा साठा ठेवला तरच भविष्यात येणाऱ्या अडचणींचा वीज निर्मितीवर परिणाम होणार नाही. सध्या देशातील ४६ औष्णिक प्रकल्पांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. २३ फेब्रुवारीपर्यंत महाजनकोच्या चंद्रपूर प्रकल्पात ४ लाख ७० हजार, पारसमध्ये ४१ हजार, परळीमध्ये १ लाख ३५ हजार, नाशिकमध्ये ६६ हजार, भुसावळमध्ये ७५ हजार, कोराडीमध्ये १ लाख ४२ हजार तर, खापरखेडामध्ये १ लाख ३८ हजार टन कोळशाचा साठा होता असे महाजनकोने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयmahavitaranमहावितरण