शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
2
Mumbai Watermelon Case: कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं?
3
चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
4
ऑपरेशन सिंदूरदरम्यान, पाकिस्तानचे ११ तळ उडवले, १३ विमाने पाडली, तसेच..., वर्षभरानंतर तिन्ही सैन्यदलांनी आकडाच सांगितला    
5
IPL 2026: युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचा 'तो' विक्रम इतिहासजमा, पंजाबच्या कूपर कॉन्लीची रेकॉर्ड ब्रेक इनिंग!
6
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
7
भयंकरच घडलं! सात वर्षांपूर्वी केला होता प्रेमविवाह; सिरीशाला पतीने रिक्षा स्टॅण्डवरच संपवले 
8
तमिळनाडूत सस्पेन्स संपला! 'विजय' सरकारला राज्यपालांचा हिरवा कंदील; जाणून घ्या कधी होणार शपथविधी
9
देशातील १३ राज्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; ताशी ६० किमी वेगाने वाहणार वारे
10
बीड महामार्ग भूसंपादन घोटाळा: तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक पोलिसांच्या ताब्यात
11
Astro Tip: पैशांची कमतरता भासतेय? शुक्रवारी आवर्जून करा 'हे' ५ उपाय; लक्ष्मी होईल प्रसन्न 
12
क्रिकेट विश्वावर शोककळा! विराट कोहलीचा जुना सहकारी अमनप्रीत सिंग गिलचे वयाच्या ३६ व्या वर्षी निधन
13
मार्कशीटमधील खाडाखोड कळली अन् बापाची सटकली; ९ वर्षांच्या मुलीला क्रूरपणे संपवलं, नंबर १ चा होता अट्टहास
14
रंगांचा खेळ! रेड, ग्रीन तर माहितीय पण फूड पॅकेजिंगवरील ब्लू, येलो मार्कचा नेमका अर्थ काय?
15
१०,००० किमी मारक क्षमता, अनेक बडे देश टप्प्यात, अग्नी-६ सुपर क्षेपणास्त्र तयार, भारत जगाला दाखवणार ताकद
16
तुम्ही चुकून दुसऱ्याच्या मोबाईल नंबरवर रिचार्ज मारलात? पैसे परत घेता येतात की नाही...
17
थलापती विजय ७ मे रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार होता, झालाच नाही; हजारो समर्थक माघारी फिरले...
18
Firoza Khatun : जेलमध्ये जुळलं सूत! प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; जेलर फिरोजा खातूनने केलं कैद्यासोबत लग्न
19
राज्यपालांना दोनदा भेटले तरीही विजय यांना सत्तास्थापनेचं निमंत्रण नाही, राज्यघटनेत काय म्हटलंय?
20
Sangeetha Sornalingam: तृषा कृष्णनपेक्षा श्रीमंत आहे थलपति विजयची पत्नी संगीता, अभिनेत्रीपेक्षा ५ पट प्रॉपर्टी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाची इतकी भीती तर मार्चमध्ये संमेलन कशासाठी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:24 IST

- संजय नहार यांचे कौतिकरावांना प्रत्युत्तर - तुमच्या विचारण्यातच नकार होता, हे स्पष्ट करा प्रवीण खापरे / लोकमत न्यूज ...

- संजय नहार यांचे कौतिकरावांना प्रत्युत्तर

- तुमच्या विचारण्यातच नकार होता, हे स्पष्ट करा

प्रवीण खापरे / लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष ज्या प्रकारे कोरोनाची भीती व्यक्त करत आहेत, ते योग्य आहे. मात्र, या भयात विरोधाभास प्रकर्षाने जाणवतो आहे. इतकीच धास्ती आहे तर मग मार्च महिन्यातच संमेलन घेण्याचा अट्टहास का, असे प्रत्युत्तर सरहद्द संस्थेचे संस्थापक संजय नहार यांनी दिले आहे.

कोरोनाच्या दीर्घ काळानंतर जानेवारीच्या पहिल्याच रविवारी पार पडलेल्या महामंडळाच्या बैठकीपूर्वी अध्यक्षांकरवी दुसऱ्याच कुणी सदस्याने दिल्लीत ३० मार्च २०२१च्या पूर्वी संमेलन घेऊ शकता का, असा प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात महामंडळ अध्यक्षांना कोरोनाची जी भीती आहे, तीच व्यक्त करत १ मे ही तारीख स्पष्ट केली होती. मात्र, त्यांचे नाशिक हे आधीच निश्चित झाले होते, हे त्या नंतरच्या घडामोडीवरून स्पष्ट व्हायला लागले आहे.

दिल्लीमध्ये संमेलन घेण्यामागची भूमिका महाराष्ट्राबाहेर असलेल्या मराठी माणसांना मराठीशी जोडण्याची आहे. महाराष्ट्राबाहेरही मराठी माणूस दुसऱ्या परिसरातल्या माणसांशी बोलत नाही. संमेलनाच्या माध्यमातून पारंपरिक सख्य निर्माण करणे शक्य होणार आहे. त्यामुळे संमेलन दिल्लीत घेण्याची आमची तयारी असल्याचे नहार म्हणाले.

मराठी माणसाची फाळणी करू नका

मोदी-गडकरी यांना खूश करण्यासाठी हे प्रयत्न असल्याचा आरोप करणे म्हणजे मराठी माणसांत दुही निर्माण करण्यासारखेच आहे, असे संजय नहार कौतिकराव ठाले-पाटील यांनी लावलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देताना ‘लोकमत’शी बोलत होते. गडकरी असो वा पवार हे पक्षीय, वैचारिकदृष्ट्या वेगळे असले तरी सर्वप्रथम ते मराठी आहेत. सगळ्यांना एकाच व्यासपीठावर आणण्यासाठी हा प्रयत्न आहे. मात्र, ‘खूश करण्यासाठी’ची भाषा वापरून महामंडळ अध्यक्षांनी मराठी अस्मितेची फाळणीच केली आहे, असा टोला नहार यांनी लावला.

मराठी साहित्य देशाचा-जगाचा विचार करते

दिल्लीत ज्या प्रकारे इतर भाषिक साहित्य संमेलने केवळ त्यांच्या भाषा आणि क्षेत्रापुरता विचार करतात त्या प्रकारे मराठी साहित्य नाही. मराठी साहित्य संमेलनात देशाचा, जगाचा विचार केला जातो. त्याचमुळे महाराष्ट्र स्थापनेच्या हीरक महोत्सवाप्रीत्यर्थ ९४वे साहित्य संमेलन दिल्लीत व्हावे, अशी बहुसंख्याकांची इच्छा असल्याचे नहार म्हणाले.