शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
3
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
4
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
5
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
6
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
7
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
8
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
9
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
10
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
11
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
12
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
13
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
14
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
15
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
16
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
17
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
18
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
19
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
20
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
Daily Top 2Weekly Top 5

यावर्षी किती कापूस खरेदी केला, किती नाकारला ? उच्च न्यायालयाची कापूस महामंडळाला विचारणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 11:02 IST

Nagpur : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मागितली माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : यावर्षी राज्यामध्ये किती कापूस खरेदी करण्यात आला व किती कापूस गुणवत्ताहीन ठरवून नाकारण्यात आला याची केंद्रनिहाय आकडेवारी आणि कापूस खरेदी नियमांची माहिती दोन आठवड्यांत सादर करा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने गुरुवारी भारतीय कापूस महामंडळाला दिला.

यासंदर्भात ग्राहक पंचायतचे जिल्हा संघटक (ग्रामीण) श्रीराम सातपुते यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्तीद्वय नितीन सांबरे व वृषाली जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. कापूस महामंडळाच्यावतीने ८ ते १२ टक्के ओलावा असलेल्या कापसाचीच खरेदी केली जाते. त्यानुसार आतापर्यंत राज्यातील १२४ केंद्रांमधून सुमारे १ कोटी ४ लाख क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे आणि शेतकऱ्यांना ९ हजार ५०० कोटी रुपयांचा चुकाराही देण्यात आला आहे. महामंडळाने न्यायालयाला प्रतिज्ञापत्राद्वारे ही माहिती दिल्यानंतर सातपुते यांनी काही केंद्रांमध्ये शेतकऱ्यांचा कापूसच खरेदी करण्यात आला नाही, असा आरोप केला आणि संबंधित कापूस १०० टक्के गुणवत्ताहीन होता का, असा सवाल उपस्थित केला. न्यायालयाने ही बाब लक्षात घेता वरील आदेश दिला.

केंद्रांची संख्या बदलत राहते

  • राज्यातील शेती पावसावर अवलंबून असल्यामुळे कापसाचे उत्पादन दरवषीं कमी-जास्त होते. त्यामुळे बाजाराची परिस्थिती व कापसाचे उत्पादन लक्षात घेऊन किती खरेदी केंद्रे सुरू करायची हे ठरवले जाते.
  • खरेदी केंद्रांची संख्या व स्थळांमध्ये आवश्यकतेनुसार बदल करावा लागतो.
  • यावर्षी सुरुवातीला १२१ खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली होती. त्यानंतर मागणीनुसार सात खरेदी केंद्रे वाढविण्यात आली, असेही महामंडळाने न्यायालयाला सांगितले.
टॅग्स :High Courtउच्च न्यायालयnagpurनागपूरfarmingशेतीFarmerशेतकरी