शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भाच्या वाट्याला किती सार्वजनिक आरोग्य केंद्र येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:45 IST

नागपूर : अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी मोठी तरतूद केली आहे. पूर्वी जी ९४ हजार कोटींची होती ती वाढवून २ लाख ...

नागपूर : अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी मोठी तरतूद केली आहे. पूर्वी जी ९४ हजार कोटींची होती ती वाढवून २ लाख २३ हजार ८४६ कोटी रुपयांची करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, देशातील ११ राज्यांमध्ये ३३८२ सार्वजनिक आरोग्य केंद्र उभारण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. विदर्भातील प्राथमिक आरोग्य केंद्राला आलेली अवकळा पाहता येथे जास्तीत जास्त सार्वजनिक आरोग्य केंद्र गरजेचे आहे. यामुळे लोकप्रतिनिधी विदर्भासाठी हे केंद्र किती खेचून आणतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोविडच्या संकटामुळे आपल्या आरोग्य यंत्रणेच्या बाबतीत पुनश्च एकवार गांभीर्याने विचार करण्यासारखी परिस्थिती तयार झाली आहे. राजकीय अनास्थेमुळे तयार झालेली अर्धी-अपुऱ्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेमुळे किती त्रास सहन करावा लागतो, याची अनुभूती मागील वर्षी लोकांना आली. कोरोनाच्या ११ महिन्यांच्या काळात विदर्भात २ लाख ७३ हजार ३६० कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर ६ हजार ९६८ रुग्णांचे बळी गेले आहेत. धक्कादायक म्हणजे, ग्रामीण भागामधून शहरात उपचारासाठी आलेल्या कोरोनाबाधितांची व उशिरा उपचार मिळाल्याने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्याही मोठी आहे. गावपातळीवरीच उपचार मिळाले असते तर आज चित्र वेगळे असते असे तज्ज्ञाचे म्हणणे आहे. यामुळे केंद्रीय अर्थमंत्र्यांनी घोषणा केलेले सार्वजनिक आरोग्य केंद्र विदर्भाच्या वाट्याला जास्तीत यावे, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे.

-‘क्लिन एअर’मध्ये नागपूरची समावेशाची शक्यता

शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी १० लाखांवर लोकसंख्या असलेल्या देशातील ४२ शहरांमध्ये ‘क्लिन एअर’ योजना आणण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. अर्थसंकल्पात यासाठी २ हजार २१७ कोटींची तरतूद केली आहे. नागपुरात वाढत्या प्रदूषणामुळे आजार वाढले आहेत. विशेषत: फुफ्फुसाच्या कॅन्सरचे वाढते रुग्ण पाहता योजनेत नागपूरचा समावेश होण्याची दाट शक्यता आहे.

-मेळघाट, गडचिरोली जिल्ह्यांत मिशन पोषण योजना

देशातल्या ११२ जिल्ह्यांत मिशन पोषण योजना राबवणार असल्याचे अर्थसंकल्पात स्पष्ट केले आहे. ही योजना मेळघाट-अमरावती, गडचिरोली जिल्ह्यात सुरू आहे; परंतु ती अधिक प्रभावीपणे राबविणे गरजेचे असल्याचे चित्र आहे.

-कोरोनामुळे का होईना आरोग्याकडे लक्ष

कोरोना महामारीमुळे का होईना आरोग्य क्षेत्रातील अनेक उणिवा समोर आल्या आहेत. यामुळे या अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठीची तरतूद १३७ टक्क्यांनी वाढवल्याचे दिसून येते. आता याची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या रुग्णांचे लोंढे थोपविण्यासाठी विदर्भातील तालुकास्तरावर अर्थमंत्र्यांनी घोषणा केलेले जास्तीत जास्त सार्वजनिक आरोग्य केंद्र स्थापन होणे गरजेचे आहे.

-डॉ. प्रकाश वाकोडे

माजी उपसंचालक, वैद्यकीय शिक्षण विभाग

-आदिवासींच्या उत्थानासाठी अर्थसंकल्पीय तरतूद गरजेची

आदिवासींचे मृत्यू आणि कुपोषण कमी करण्यासाठी, आदिवासींच्या आरोग्य सुविधांसाठी अर्थसंकल्पात सात टक्के तरतूद आवश्यक आहे. बाल कुपोषण आणि मृत्यू टाळण्यासाठी ‘आरयूटीएफ’ऐवजी स्थानिक उपचारात्मक आहारासाठी अर्थसंकल्प आवश्यक आहे. आदिवासींच्या उत्थानासाठी अर्थसंकल्पीय तरतूद गरजेची आहे.

डॉ. आशिष सातव, मेळघाट.