शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
4
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
5
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
6
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
7
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
8
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
9
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
10
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
11
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
12
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
13
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
14
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
15
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
16
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
17
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
18
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
19
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
20
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ

दहावी, बारावीचा अभ्यासक्रम कसा करणार पूर्ण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 11:27 IST

Nagpur News दहावी आणि बारावीला शिकविणारे शिक्षक व विद्यार्थी अभ्यासक्रम कसा पूर्ण होईल, या गोंधळात आहेत.

ठळक मुद्देशिक्षक आणि विद्यार्थीही गोंधळातअजूनही शाळेत ५० टक्के उपस्थिती नाही

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : दहावी आणि बारावीचे महत्त्वाचे वर्ष असल्याने शिक्षण विभागाने नववी ते बारावी वर्गाच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. नागपूर जिल्ह्यात १४ डिसेंबरपासून, तर महापालिकेच्या हद्दीतील शाळा ४ जानेवारीपासून सुरू झाल्या. अजूनही शाळांमध्ये ५० टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती नाही. एकीकडे परीक्षा तीन महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. शासनाने अभ्यासक्रमात २५ टक्के कपात केली असली तरी, ७५ टक्के अभ्यासक्रम पूर्ण करण्यास साधारणत: साडेतीन ते चार महिन्यांचा कालावधी लागतो आहे. त्यामुळे दहावी आणि बारावीला शिकविणारे शिक्षक व विद्यार्थी अभ्यासक्रम कसा पूर्ण होईल, या गोंधळात आहेत.

कोरोनामुळे मार्च महिन्यापासून शाळा बंद होत्या. त्यामुळे जुलै महिन्यामध्ये शासनाने ऑनलाइन शिक्षणावर जोर दिला. पण ग्रामीण भागात ऑनलाइनच्या समस्या असल्याने अपेक्षित अभ्यासक्रम शिकविला गेला नाही. १४ डिसेंबरपासून शाळा सुरू झाल्यानंतर खऱ्या अर्थाने जिल्ह्यात अभ्यासाला सुरुवात झाली. यंदा ७५ टक्के अभ्यासक्रमावरच पेपर निघणार आहे. पण ७५ टक्के अभ्यासक्रम पूर्ण करायलाही साडेतीन महिन्यांच्यावर कालावधी लागतो आहे. त्यामुळे यावर्षी शिक्षक केवळ अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर भर देत आहे. मुलांची रिव्हिजन, प्रॅक्टिकल कसे घेणार हा प्रश्नच आहे. शहरामध्ये काही नामांकित शाळांनी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन क्लासेस जुलै महिन्यापासूनच सुरू केले होते. त्यामुळे त्या शाळेतील विद्यार्थ्यांचे अभ्यासक्रम पूर्ण झाले असून, आता ते विद्यार्थ्यांकडून रिव्हिजन करवून घेत आहे. सोबतच प्रॅक्टिकलची तयारी करीत आहेत.

- आम्ही जुलैमध्ये ऑनलाइन क्लासेस सुरू केले. डिसेंबरमध्ये आमचा अभ्यासक्रम संपला. आता आम्ही रिव्हिजन व प्रॅक्टिकलवर फोकस करीत आहे. आमच्या विद्यार्थ्यांना भरपूर वेळ मिळणार असल्याने परीक्षेचे टेन्शन नाही.

अर्चना डाखोळे, प्राचार्य, सोमलवार हायस्कूल

- ७५ टक्के संपूर्ण अभ्यासक्रम अपेक्षित वेळेत पूर्ण होऊ शकत नाही. अभ्यासक्रम कुठून सुरू करायचा, असा प्रश्न पडतो आहे. अभ्यासक्रम कमी केला असला तरी, संपूर्ण धडे अभ्यासाचे आहे. धड्यातील एक भाग कमी केला आहे. अजूनही उपस्थिती ५० टक्क्यांवर नाही. ऑनलाइन ऑफलाइन दोन्ही वर्ग शिकविणे शक्य नाही. विद्यार्थी गोंधळलेल्या मन:स्थितीत आहे.

- डॉ.अशोक गव्हाणकर, प्राचार्य

- महाराष्ट्र राज्यातील शिक्षण विभाग गप्पगार बसला आहे. २०२१ सत्रातील परीक्षेचा अभ्यासक्रम व प्रात्यक्षिक याबद्दल दिशानिर्देश स्पष्ट नाही, वेळापत्रक नाही, परीक्षा केंद्रावरील व्यवस्था व नियोजन अस्पष्ट आहे. जानेवारी महिना अर्धा लोटला तरीही संथ गतीने शिक्षण विभागाची कार्यपद्धती ही चिंता वाढविणारी बाब आहे.

प्रा. सपन नेहरोत्रा

- आमच्या शाळेने दहावीच्या विद्यार्थ्यांवर सुरुवातीपासूनच फोकस केले. ऑनलाइनच्या माध्यमातून शिक्षक सातत्याने संपर्कात होते. शाळेच्या पुढाकारामुळे आम्ही अभ्यासात खंड पडू दिला नाही. आमचा अभ्यासक्रम पूर्ण झाला आहे. आता आमची रिव्हिजन सुरू आहे.

अखिलेश डांगे, शहरी विद्यार्थी

- ग्रामीण भागात ऑक्टोबर महिन्यापर्यंत शाळांनी गांभीर्याने घेतलेच नाही. ग्रामीण भागात ऑनलाइन शिक्षण शक्यच नव्हते. डिसेंबर महिन्यात शाळा सुरू झाली आहे. ७५ टक्के अभ्यासक्रम तीन महिन्यात शक्य नाही. आमचा केवळ अभ्यासक्रम पूर्ण होणार आहे. परीक्षेची तयारी नाही. ग्रामीण भागातील परिस्थितीचे आकलन करून किमान ५० टक्के अभ्यासक्रमावरच पेपर घ्यावेत.

नीलेश कारोकार, ग्रामीण विद्यार्थी

टॅग्स :ssc examदहावी