शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

दहावी, बारावीचा अभ्यासक्रम कसा करणार पूर्ण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 11:27 IST

Nagpur News दहावी आणि बारावीला शिकविणारे शिक्षक व विद्यार्थी अभ्यासक्रम कसा पूर्ण होईल, या गोंधळात आहेत.

ठळक मुद्देशिक्षक आणि विद्यार्थीही गोंधळातअजूनही शाळेत ५० टक्के उपस्थिती नाही

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : दहावी आणि बारावीचे महत्त्वाचे वर्ष असल्याने शिक्षण विभागाने नववी ते बारावी वर्गाच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. नागपूर जिल्ह्यात १४ डिसेंबरपासून, तर महापालिकेच्या हद्दीतील शाळा ४ जानेवारीपासून सुरू झाल्या. अजूनही शाळांमध्ये ५० टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती नाही. एकीकडे परीक्षा तीन महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. शासनाने अभ्यासक्रमात २५ टक्के कपात केली असली तरी, ७५ टक्के अभ्यासक्रम पूर्ण करण्यास साधारणत: साडेतीन ते चार महिन्यांचा कालावधी लागतो आहे. त्यामुळे दहावी आणि बारावीला शिकविणारे शिक्षक व विद्यार्थी अभ्यासक्रम कसा पूर्ण होईल, या गोंधळात आहेत.

कोरोनामुळे मार्च महिन्यापासून शाळा बंद होत्या. त्यामुळे जुलै महिन्यामध्ये शासनाने ऑनलाइन शिक्षणावर जोर दिला. पण ग्रामीण भागात ऑनलाइनच्या समस्या असल्याने अपेक्षित अभ्यासक्रम शिकविला गेला नाही. १४ डिसेंबरपासून शाळा सुरू झाल्यानंतर खऱ्या अर्थाने जिल्ह्यात अभ्यासाला सुरुवात झाली. यंदा ७५ टक्के अभ्यासक्रमावरच पेपर निघणार आहे. पण ७५ टक्के अभ्यासक्रम पूर्ण करायलाही साडेतीन महिन्यांच्यावर कालावधी लागतो आहे. त्यामुळे यावर्षी शिक्षक केवळ अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर भर देत आहे. मुलांची रिव्हिजन, प्रॅक्टिकल कसे घेणार हा प्रश्नच आहे. शहरामध्ये काही नामांकित शाळांनी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन क्लासेस जुलै महिन्यापासूनच सुरू केले होते. त्यामुळे त्या शाळेतील विद्यार्थ्यांचे अभ्यासक्रम पूर्ण झाले असून, आता ते विद्यार्थ्यांकडून रिव्हिजन करवून घेत आहे. सोबतच प्रॅक्टिकलची तयारी करीत आहेत.

- आम्ही जुलैमध्ये ऑनलाइन क्लासेस सुरू केले. डिसेंबरमध्ये आमचा अभ्यासक्रम संपला. आता आम्ही रिव्हिजन व प्रॅक्टिकलवर फोकस करीत आहे. आमच्या विद्यार्थ्यांना भरपूर वेळ मिळणार असल्याने परीक्षेचे टेन्शन नाही.

अर्चना डाखोळे, प्राचार्य, सोमलवार हायस्कूल

- ७५ टक्के संपूर्ण अभ्यासक्रम अपेक्षित वेळेत पूर्ण होऊ शकत नाही. अभ्यासक्रम कुठून सुरू करायचा, असा प्रश्न पडतो आहे. अभ्यासक्रम कमी केला असला तरी, संपूर्ण धडे अभ्यासाचे आहे. धड्यातील एक भाग कमी केला आहे. अजूनही उपस्थिती ५० टक्क्यांवर नाही. ऑनलाइन ऑफलाइन दोन्ही वर्ग शिकविणे शक्य नाही. विद्यार्थी गोंधळलेल्या मन:स्थितीत आहे.

- डॉ.अशोक गव्हाणकर, प्राचार्य

- महाराष्ट्र राज्यातील शिक्षण विभाग गप्पगार बसला आहे. २०२१ सत्रातील परीक्षेचा अभ्यासक्रम व प्रात्यक्षिक याबद्दल दिशानिर्देश स्पष्ट नाही, वेळापत्रक नाही, परीक्षा केंद्रावरील व्यवस्था व नियोजन अस्पष्ट आहे. जानेवारी महिना अर्धा लोटला तरीही संथ गतीने शिक्षण विभागाची कार्यपद्धती ही चिंता वाढविणारी बाब आहे.

प्रा. सपन नेहरोत्रा

- आमच्या शाळेने दहावीच्या विद्यार्थ्यांवर सुरुवातीपासूनच फोकस केले. ऑनलाइनच्या माध्यमातून शिक्षक सातत्याने संपर्कात होते. शाळेच्या पुढाकारामुळे आम्ही अभ्यासात खंड पडू दिला नाही. आमचा अभ्यासक्रम पूर्ण झाला आहे. आता आमची रिव्हिजन सुरू आहे.

अखिलेश डांगे, शहरी विद्यार्थी

- ग्रामीण भागात ऑक्टोबर महिन्यापर्यंत शाळांनी गांभीर्याने घेतलेच नाही. ग्रामीण भागात ऑनलाइन शिक्षण शक्यच नव्हते. डिसेंबर महिन्यात शाळा सुरू झाली आहे. ७५ टक्के अभ्यासक्रम तीन महिन्यात शक्य नाही. आमचा केवळ अभ्यासक्रम पूर्ण होणार आहे. परीक्षेची तयारी नाही. ग्रामीण भागातील परिस्थितीचे आकलन करून किमान ५० टक्के अभ्यासक्रमावरच पेपर घ्यावेत.

नीलेश कारोकार, ग्रामीण विद्यार्थी

टॅग्स :ssc examदहावी