शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

सर्वांसाठी घरे योजना; उद्दिष्ट १० हजारांचे; वाटप मात्र ९५ घरांचे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 13:16 IST

Housing scheme, Nagpur newsआर्थिक दुर्बल घटकांसाठी नासुप्रतर्फे ४३४५ घरे उभारली आहेत. परंतु यातील फक्त ९५ लोकांना घरकुलांचे वाटप करण्यात आले आहे.

ठळक मुद्देतांत्रिक कारणामुळे वाटपाला विलंबनासुप्रने ४३४५ घरे उभारली 

गणेश हूडलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सर्वांसाठी २०२२ पर्यंत घरे ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी योजना जून २०१५ मध्ये सुरू करण्यात आली. नागपूर शहरासाठी १० हजार घरकुलांचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. यात महापालिकेतर्फे १११४, म्हाडा ५५७ व नासुप्र ४३४५ घरकुलांचे काम करीत आहे. आर्थिक दुर्बल घटकांसाठी नासुप्रतर्फे ४३४५ घरे उभारली आहेत. परंतु यातील फक्त ९५ लोकांना घरकुलांचे वाटप करण्यात आले आहे. अनेक प्रकारच्या तांत्रिक अडचणी असल्याने वाटप रखडले आहे.नासुप्रतर्फे मौजा वाठोडा येथे २६४, मौजा तरोडी २३७४, मौजा वांजरी ७६५, मौजा तरोडी खूर्द येथे ९४२ अशा प्रकारे एकूण ४३४५ घरांचे बांधकाम केले आहे. यातील वाठोडा येथील ९५ घरांचे वाटप करण्यात आले आहे. उर्वरित घरे बांधून तयार असून ती वाटपाच्या कार्यवाहीत असल्याची माहिती नासुप्रने युवा संस्थेचे नितीन मेश्राम यांना माहितीच्या अधिकारात दिली आहे.वांजरी येथील ७६५ घरांचे बांधकाम झाले आहे. परंतु पाण्याची लाईन टाकावयाची आहे. महापालिकेकडे हे काम देण्यात आले आहे. परंतु सहा महिन्यापासून काम रखडले आहे. अशीच परिस्थिती तरोडी येथील २३७४ घरकुलांची आहे. मनपा पाणी पुरवठा करणार आहे. जलकुंभाचे काम रखडले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडून पाणी घेताना दराबाबत वाटाघाटी सुरू होत्या. तसेच महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाकडून वीज पुरवठ्याला विलंब होत असल्याची माहिती आहे.क्षमता नसलेल्या भागात घरांचे बुकींगनासुप्रतर्फे राबविण्यात येणाऱ्या योजनेतील घरकुलांच्या किमती वेगवेगळया आहेत. दुर्बल घटकातील नागरिकांनी घरकुलांसाठी अर्ज करताना अधिक रकमेच्या घरकुलांसाठी अर्ज केला आहे. त्यामुळे परतफेड करण्याची क्षमता नसल्याने बँकाकडून कर्ज मिळण्याला अडचणी येत आहेत. तसेच अनेक अर्जधारक आधीच थकबाकीदार आहेत. यामुळेही घरकुल वाटपात अडचणी येत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.लाभार्थीकडून हप्ते न घेता बांधकामघरकुलांचे बांधकाम करताना लाभार्थींनी तीन टप्प्यात घरकुलांची रक्कम जमा करणे अपेक्षित आहे. यात घरांचे बांधमाला सुरूवात करताना, स्लॅब टाकताना व घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर पैसे जमा करणे अपेक्षित आहे. मात्र दुर्बल घटकांतील लाभार्थीकडून ही रक्कम आधीच घेतली असती तर घरकुलाचा ताबा मिळण्यापूर्वीच त्यांना बँकेच्या कजार्चे हप्ते भरावे लागले असते. याचा विचार करता नासुप्रने याची प्रतीक्षा न करता बांधकाम केले आहे.

टॅग्स :Homeघर