शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

सर्वांसाठी घरे योजना; उद्दिष्ट १० हजारांचे; वाटप मात्र ९५ घरांचे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 13:16 IST

Housing scheme, Nagpur newsआर्थिक दुर्बल घटकांसाठी नासुप्रतर्फे ४३४५ घरे उभारली आहेत. परंतु यातील फक्त ९५ लोकांना घरकुलांचे वाटप करण्यात आले आहे.

ठळक मुद्देतांत्रिक कारणामुळे वाटपाला विलंबनासुप्रने ४३४५ घरे उभारली 

गणेश हूडलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सर्वांसाठी २०२२ पर्यंत घरे ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी योजना जून २०१५ मध्ये सुरू करण्यात आली. नागपूर शहरासाठी १० हजार घरकुलांचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. यात महापालिकेतर्फे १११४, म्हाडा ५५७ व नासुप्र ४३४५ घरकुलांचे काम करीत आहे. आर्थिक दुर्बल घटकांसाठी नासुप्रतर्फे ४३४५ घरे उभारली आहेत. परंतु यातील फक्त ९५ लोकांना घरकुलांचे वाटप करण्यात आले आहे. अनेक प्रकारच्या तांत्रिक अडचणी असल्याने वाटप रखडले आहे.नासुप्रतर्फे मौजा वाठोडा येथे २६४, मौजा तरोडी २३७४, मौजा वांजरी ७६५, मौजा तरोडी खूर्द येथे ९४२ अशा प्रकारे एकूण ४३४५ घरांचे बांधकाम केले आहे. यातील वाठोडा येथील ९५ घरांचे वाटप करण्यात आले आहे. उर्वरित घरे बांधून तयार असून ती वाटपाच्या कार्यवाहीत असल्याची माहिती नासुप्रने युवा संस्थेचे नितीन मेश्राम यांना माहितीच्या अधिकारात दिली आहे.वांजरी येथील ७६५ घरांचे बांधकाम झाले आहे. परंतु पाण्याची लाईन टाकावयाची आहे. महापालिकेकडे हे काम देण्यात आले आहे. परंतु सहा महिन्यापासून काम रखडले आहे. अशीच परिस्थिती तरोडी येथील २३७४ घरकुलांची आहे. मनपा पाणी पुरवठा करणार आहे. जलकुंभाचे काम रखडले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडून पाणी घेताना दराबाबत वाटाघाटी सुरू होत्या. तसेच महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाकडून वीज पुरवठ्याला विलंब होत असल्याची माहिती आहे.क्षमता नसलेल्या भागात घरांचे बुकींगनासुप्रतर्फे राबविण्यात येणाऱ्या योजनेतील घरकुलांच्या किमती वेगवेगळया आहेत. दुर्बल घटकातील नागरिकांनी घरकुलांसाठी अर्ज करताना अधिक रकमेच्या घरकुलांसाठी अर्ज केला आहे. त्यामुळे परतफेड करण्याची क्षमता नसल्याने बँकाकडून कर्ज मिळण्याला अडचणी येत आहेत. तसेच अनेक अर्जधारक आधीच थकबाकीदार आहेत. यामुळेही घरकुल वाटपात अडचणी येत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.लाभार्थीकडून हप्ते न घेता बांधकामघरकुलांचे बांधकाम करताना लाभार्थींनी तीन टप्प्यात घरकुलांची रक्कम जमा करणे अपेक्षित आहे. यात घरांचे बांधमाला सुरूवात करताना, स्लॅब टाकताना व घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर पैसे जमा करणे अपेक्षित आहे. मात्र दुर्बल घटकांतील लाभार्थीकडून ही रक्कम आधीच घेतली असती तर घरकुलाचा ताबा मिळण्यापूर्वीच त्यांना बँकेच्या कजार्चे हप्ते भरावे लागले असते. याचा विचार करता नासुप्रने याची प्रतीक्षा न करता बांधकाम केले आहे.

टॅग्स :Homeघर