शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

सर्वांसाठी घरे योजना; उद्दिष्ट १० हजारांचे; वाटप मात्र ९५ घरांचे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 13:16 IST

Housing scheme, Nagpur newsआर्थिक दुर्बल घटकांसाठी नासुप्रतर्फे ४३४५ घरे उभारली आहेत. परंतु यातील फक्त ९५ लोकांना घरकुलांचे वाटप करण्यात आले आहे.

ठळक मुद्देतांत्रिक कारणामुळे वाटपाला विलंबनासुप्रने ४३४५ घरे उभारली 

गणेश हूडलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सर्वांसाठी २०२२ पर्यंत घरे ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी योजना जून २०१५ मध्ये सुरू करण्यात आली. नागपूर शहरासाठी १० हजार घरकुलांचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. यात महापालिकेतर्फे १११४, म्हाडा ५५७ व नासुप्र ४३४५ घरकुलांचे काम करीत आहे. आर्थिक दुर्बल घटकांसाठी नासुप्रतर्फे ४३४५ घरे उभारली आहेत. परंतु यातील फक्त ९५ लोकांना घरकुलांचे वाटप करण्यात आले आहे. अनेक प्रकारच्या तांत्रिक अडचणी असल्याने वाटप रखडले आहे.नासुप्रतर्फे मौजा वाठोडा येथे २६४, मौजा तरोडी २३७४, मौजा वांजरी ७६५, मौजा तरोडी खूर्द येथे ९४२ अशा प्रकारे एकूण ४३४५ घरांचे बांधकाम केले आहे. यातील वाठोडा येथील ९५ घरांचे वाटप करण्यात आले आहे. उर्वरित घरे बांधून तयार असून ती वाटपाच्या कार्यवाहीत असल्याची माहिती नासुप्रने युवा संस्थेचे नितीन मेश्राम यांना माहितीच्या अधिकारात दिली आहे.वांजरी येथील ७६५ घरांचे बांधकाम झाले आहे. परंतु पाण्याची लाईन टाकावयाची आहे. महापालिकेकडे हे काम देण्यात आले आहे. परंतु सहा महिन्यापासून काम रखडले आहे. अशीच परिस्थिती तरोडी येथील २३७४ घरकुलांची आहे. मनपा पाणी पुरवठा करणार आहे. जलकुंभाचे काम रखडले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडून पाणी घेताना दराबाबत वाटाघाटी सुरू होत्या. तसेच महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाकडून वीज पुरवठ्याला विलंब होत असल्याची माहिती आहे.क्षमता नसलेल्या भागात घरांचे बुकींगनासुप्रतर्फे राबविण्यात येणाऱ्या योजनेतील घरकुलांच्या किमती वेगवेगळया आहेत. दुर्बल घटकातील नागरिकांनी घरकुलांसाठी अर्ज करताना अधिक रकमेच्या घरकुलांसाठी अर्ज केला आहे. त्यामुळे परतफेड करण्याची क्षमता नसल्याने बँकाकडून कर्ज मिळण्याला अडचणी येत आहेत. तसेच अनेक अर्जधारक आधीच थकबाकीदार आहेत. यामुळेही घरकुल वाटपात अडचणी येत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.लाभार्थीकडून हप्ते न घेता बांधकामघरकुलांचे बांधकाम करताना लाभार्थींनी तीन टप्प्यात घरकुलांची रक्कम जमा करणे अपेक्षित आहे. यात घरांचे बांधमाला सुरूवात करताना, स्लॅब टाकताना व घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर पैसे जमा करणे अपेक्षित आहे. मात्र दुर्बल घटकांतील लाभार्थीकडून ही रक्कम आधीच घेतली असती तर घरकुलाचा ताबा मिळण्यापूर्वीच त्यांना बँकेच्या कजार्चे हप्ते भरावे लागले असते. याचा विचार करता नासुप्रने याची प्रतीक्षा न करता बांधकाम केले आहे.

टॅग्स :Homeघर