शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
2
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
3
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
4
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
5
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
6
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
7
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
8
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
9
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
10
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
11
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
12
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
13
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
14
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
15
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
16
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
17
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
18
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
19
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
20
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव

नागपूर जिल्ह्यात ‘ऑनर किलिंग’;  बुटीबोरीत झालेल्या डबल मर्डरमागचे कारण उलगडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2022 9:35 PM

Nagpur News बुटीबोरीत हत्या करून वेणा नदीत फेकण्यात आलेल्या महिला-पुरुषाच्या हत्येच्या सूत्रधारांचा शोध २४ तासांत लावण्यात पोलिसांना यश आले आहे.

ठळक मुद्देसख्ख्या भावांनीच केला ‘गेम’ २४ तासांत पोलिसांकडून गुन्ह्याची उकल

नागपूर : बुटीबोरीत हत्या करून वेणा नदीत फेकण्यात आलेल्या महिला-पुरुषाच्या हत्येच्या सूत्रधारांचा शोध २४ तासांत लावण्यात पोलिसांना यश आले आहे. स्वत:ची पत्नी सोडून अगोदरच लग्न झालेल्या दुसऱ्या महिलेसोबत राहणाऱ्या भावामुळे समाजात बदनामी होत असल्याच्या कारणावरून सख्ख्या भावांनीच त्याचा काटा काढल्याची धक्कादायक बाब समोर आली. शेतीच्या कारणावरून अगोदरच भावांमध्ये वाद सुरू होता व त्यातच बदनामीमुळे आगीत तेल ओतल्या गेले.

उत्तम सुरेश बोडखे (३१ वर्षे, बिहाडी, ता. कारंजा घाडगे) आणि सविता गोवर्धन परमार (३८ वर्षे, सोनेगाव मुस्तफा) अशी मृतांची नावे आहेत. आरोपींमध्ये उत्तमचा भाऊ राहुल सुरेश बोडखे (२७), खुशाल सुरेश बोडखे (२९), विजय वसंतराव बोडखे (३०, तिघेही बिहाडी) आणि आकाश अशोक राऊत (२४, कारंजा घाडगे) यांचा समावेश आहे.

वेणा नदीच्या पुलाखाली गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता उत्तम आणि सविता यांचे मृतदेह आढळून आले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन बुटीबोरी पोलिसांसह जिल्हा ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने (एलसीबी) तपास सुरू केला. एकूण पाच पथके तयार करण्यात आली. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज स्कॅन करण्यात आले. मृतांचे फोटो सोशल मीडिया आणि माहितीच्या माध्यमातून व्हायरल करण्यात आले. त्यामुळे मृतांची ओळख पटण्यास मदत झाली.

अटक आरोपींना शनिवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, अपर अधीक्षक राहुल माकणीकर, उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा गायकवाड, एलसीबीचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, बुरीबोरीचे एसएचओ भीमाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे एपीआय अनिल राऊत, राजीव कर्मलवार, जितेंद्र वैरागडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

आरोपी भावांचे जमत नव्हते लग्न

सविता परमार विवाहित असून, तिला दोन मुले होती. मात्र, ती पतीपासून वेगळी राहू लागली. उत्तमचेही लग्न झाले होते आणि तोही आपल्या पत्नीला सोडून गेला होता. उत्तम आणि सविता हे बांधकाम कामगार म्हणून काम करत होते आणि बरेच दिवस इसासनी (ता. हिंगणा) येथील भीमनगर झोपडपट्टीत एकत्र राहत होते. त्यामुळे गावात कुटुंबाची बदनामी झाल्याने दोन्ही भाऊ उत्तमवर रागावले होते. सवितापासून दूर होण्याबाबत ते वारंवार उत्तमला सांगत होते.

दोघाही भावांचे लग्नदेखील जमत नव्हते. याशिवाय शेतीच्या वाटणीवरूनदेखील वाद सुरू होता. त्यामुळे दोन्ही भावांनी उत्तमचा काटा काढण्याचे ठरविले होते.

अशी केली हत्या

शेतीचा वाद मिटविण्यासाठी दोन्ही भावांनी उत्तमला ६ जुलै रोजी बिहाडी येथे येण्यास सांगितले. त्याच दिवशी आरोपींनी उत्तमला बाजारगाव येथे गाठले. सोबत आणलेल्या वाहनातच त्यांनी दोघांची हत्या केली. त्यानंतर बुटीबोरी येथे वेणा नदीच्या पुलावर आले व दोघांचे मृतदेह नदीच्या पाण्यात फेकून दिले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHonor Killingऑनर किलिंग