शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

महामार्ग बनले मृत्यूचे सापळे; अपघातांमध्ये ६३ टक्क्यांनी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2022 21:33 IST

Nagpur News महामार्ग पोलिसांच्या नागपूर विभागांतर्गत राज्य व राष्ट्रीय महामार्ग अक्षरश: मृत्यूचे सापळे बनले आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा सहा महिन्यांत महामार्गांवरील अपघातांमध्ये ६३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

ठळक मुद्देसहा महिन्यांत सुमारे हजार अपघात सव्वापाचशेहून अधिक नागरिकांचा मृत्यू

नागपूर : महामार्ग पोलिसांच्या नागपूर विभागांतर्गत राज्य व राष्ट्रीय महामार्ग अक्षरश: मृत्यूचे सापळे बनले आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा सहा महिन्यांत महामार्गांवरील अपघातांमध्ये ६३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर मृत्यूच्या आकड्यांमध्येदेखील २५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी नागपूर महामार्ग पोलीस प्रादेशिक विभागाकडे माहितीच्या अधिकारांतर्गत विचारणा केली होती. २०१९ सालापासून ते जून २०२२ या कालावधीत विभागाच्या हद्दीत किती अपघात झाले, किती लोकांचा अपघातात मृत्यू झाला, यात पोलिसांची संख्या किती होती आदी प्रश्न त्यांची विचारले होते. प्राप्त झालेल्या माहितीनुसार २०२१ साली महामार्गांवर १ हजार २१७ अपघात झाले. त्यात ८६४ लोकांचा मृत्यू झाला व ६३३ नागरिक जखमी झाले. परंतु यावर्षी सहा महिन्यांतच अपघातांचे प्रमाण वाढले. जानेवारी ते जून या कालावधीत ९९४ अपघात झाले व त्यात ५४४ जणांचे बळी गेले असून, ४६४ नागरिक जखमी झाले.

या कारणांमुळे होतात अपघात

-वाहनचालकांचा हलगर्जीपणा

-भरधाव वेग

-ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न

-नशा करून वाहन चालविणे

- नियमांचा भंग करणे

साडेतीन वर्षांत दर महिन्याला १३१ अपघात

२०१८ पासूनची आकडेवारी पाहिली तर साडेतीन वर्षांत नागपूर विभागातील महामार्गांवर ५ हजार ५२६ अपघात झाले. त्यात ३ हजार २४९ नागरिक मरण पावले व २ हजार ३५२ नागरिक गंभीर जखमी झाले. दर महिन्याला सरासरी १३१ अपघात झाले व सरासरी ७७ जणांचा जीव गेला.

 

टॅग्स :highwayमहामार्गAccidentअपघात