शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

हायकोर्ट : चुकीच्या वीज बिलाविरुद्ध जनहित याचिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 1:43 AM

राज्यभरातील असंख्य नागरिकांना चुकीची वीज बिले पाठविण्यात आल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते जनार्दन मून यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे.

ठळक मुद्देअचूक बिले पाठविण्याची मागणी

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : राज्यभरातील असंख्य नागरिकांना चुकीची वीजबिले पाठविण्यात आल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते जनार्दन मून यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. नागरिकांना अचूक बिले पाठविण्यात यावी व ही प्रक्रिया पूर्ण होतपर्यंत नागरिकांवर सक्तीची कारवाई करण्यात येऊ नये अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली आहे.याचिकेत राज्याच्या ऊर्जा विभागाचे सचिव व महावितरण कंपनीला प्रतिवादी करण्यात आले आहे. महावितरण कंपनीने कोरोना संक्रमणामुळे फेब्रुवारीपासून मीटर रिडिंग घेणे बंद केले होते. त्यानंतर थेट जूनमध्ये रिडिंग घेण्यात आले. परिणामी, नागरिकांना वीज बिले पाठविण्यात मोठा घोळ झाला आहे. अनेकांना अवास्तव वीज बिले पाठविण्यात आली आहेत. बिले निर्धारित करताना महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या निर्देशांचे पालन करण्यात आले नाही असे मून यांचे म्हणणे आहे. त्यांनी याचिकेमध्ये संध्या मून यांच्या वीज बिलाचे उदाहरण दिले आहे. संध्या मून यांना १४७२ युनिटकरिता १८ हजार ७२० रुपयाचे बिल पाठविण्यात आले आहे. हे बिल चुकीचे असल्यामुळे १० जुलै रोजी महावितरणकडे तक्रार करण्यात आली होती. परंतु, त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे उच्च न्यायालयात याचिका दाखल करावी लागली असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. अश्विन इंगोले कामकाज पाहणार आहेत.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयelectricityवीजbillबिल