शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यात पावसाचे थैमान, दोन नद्यांना पूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 19:50 IST

दोन दिवसांपासून नागपूर जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसाचा सर्वाधिक फटका मौदा तालुक्याला बसला आहे. सूर आणि सांड नदीच्या पुराने तालुक्यात थैमान घातले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. तारसा, बाबदेव, कोराड, धामणगाव, कुंभारी, बोरगाव परिसरात सांड नदीचे पाणी धोक्याच्या पातळीवर वाहत आहे. पुरामुळे धान, सोयाबीन, कपाशी आणि भाजीपाला पिकाला सर्वाधिक फटका बसला आहे.

ठळक मुद्देमौदा तालुक्यात २३९.७ मि.मि.पावसाची नोंदसूर, सांड नदीला पूर, एसडीआरएफचे मदतकार्यजवानांनी अनेकांना सुखरूप काढलेपेंच कालव्यात बाबदेवजवळ भगदाड पडलेजनता विद्यालयात २१ विद्यार्थ्यांना फटकापारशिवनीत एक जण वाहून गेला.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दोन दिवसांपासून नागपूर जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसाचा सर्वाधिक फटका मौदा तालुक्याला बसला आहे. सूर आणि सांड नदीच्या पुराने तालुक्यात थैमान घातले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. तारसा, बाबदेव, कोराड, धामणगाव, कुंभारी, बोरगाव परिसरात सांड नदीचे पाणी धोक्याच्या पातळीवर वाहत आहे. पुरामुळे धान, सोयाबीन, कपाशी आणि भाजीपाला पिकाला सर्वाधिक फटका बसला आहे.कुंभारी-धामणगाव परिसरात एनटीपीसीच्या तलावाजवळ ६ मजूर पुरात अडकल्याचे निदर्शनास येताच मौद्याचे उपविभागीय अधिकारी अविनाश कातडे यांच्या सूचनेनुसार तहसीलदार दिनेश निंबाळकर यांनी एसडीआरएफच्या चमूला पाचारण केले. चमूने तात्काळ कारवाई करीत पुरात अडलेले बाबूलाल सिंग, संपत सिंग, अंबेलाल सिंग, छोटेलाल सिंग, रामलखन सिंग (रा.एन.टी.पी.सी.कॉलनी) आणि अंजीराम मेश्राम (रा.विरशी) यांना सुखरूप बाहेर काढले. याच चमूने संजय गोविंदराव वानखेडे रा.कोराड यांच्या मालकीची चार जनावरे दोर सोडून मुक्त केली. मात्र महालगाव येथील बाबू उके यांच्या गाईचे वासरु पुरात वाहून गेले.पेंच प्रकल्पाच्या कालव्याला बाबदेव परिसरात भगदाड पडल्याने शेतकऱ्यांचे पीक वाहून गेले. पावसाचे पाणी आणि पेंच प्रकल्पातील पाणी एकत्र आल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.पारशिवनी तालुक्यात आमडी नाल्याच्या पुरात एक जण वाहून गेला. सुरेश सदाशिव सातपैसे (४२) असे या व्यक्तीचे नाव असून प्रशासनाच्यावतीने शोधकार्य सुरू आहे.शिवाडौली,सावंगी व भांडेवाडी येथील २० घरांमधे दोन ते तीन फुटावर पाणी जमा झाले,यात मोठे आर्थिक नुकसान झाले. रामटेक तालुक्यातील नगरधन विभागात २४५.४ मि.मी व मुसेवाडी विभागात १५६.२ मि.मि. पावसाची नोंद झाली. या परिसरात पावसामुळे पिकांचे नुकसान झाले.असा पडला पाऊसतालुक्यातील मौदा, धानला, निमखेडा, चाचेर, खात व कोदामेंढी मंडळात अनुक्रमे २६२.८, १७६.२, २९१.०,२८०.८,२५४.४ व १८२.२ अशी एकूण २३९.७ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली.वाहतुकीला फटकाअतिवृष्टी व पुरामुळे १) तारासा-अरोली मार्ग, २) लापका-धामणगाव-आजनगाव-मांगली (तेली) मार्ग, ३) चिचोली-दहेगाव-खात मार्ग ४) तांडा-सिरसोली-पिंपळगाव ५) बोरगाव-मोहाडी-गोवरी मार्ग ६) भोवरी-चिखलाबोडी ७) पार्डी(कला) राजोली-नांदगाव मार्गावरील बंद पडले होते.२९७ लोकांना सुरक्षित स्थळी हलविलेपुराचा फटका बसलेल्या २९७ लोकांना प्रशासनाच्या वतीने सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. यात बाबदेव येथील ४५, नेरला-१६, तारसा-३५, धानला-५०, बोरगाव-२५, दहेगाव-५, कोराड - ५, गोवरी - २५, निमखेडा-५, मोहाडी-२५, इजनी-१५, वाकेश्वर-८, आष्टी बारशी-१४, अरोली-४ व नरसाळा येथील २० अशा २९७ लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.विद्यार्थी शाळेत अडकलेसांड नदीला आलेल्या पुरामुळे मांगली (तेली) सुंदरगाव येथे राहणारे जनता विद्यालयाचे २१ विद्यार्थी घरी पोहचू शकले नाही. याबाबतची माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना मिळताच त्यांनी भाजपचे तालुका अध्यक्ष मोरेश्वर सोरते, नगरपंचायतचे गटनेता राजू सोमनाथे यांच्या मार्फत विद्यार्थी व प्रवाशांच्या जेवणाची व राहण्याची व्यवस्था करून दिली.सूर नदीच्या पुलावर पाणीकोदामेंढी मंडळात १८२.०२ मि.मी. पावसाची नोंद झाली. त्यात सूर नदीलाही पूर आला. नदीच्या पुलावरून तीन फूट वर पाणी वाहत होते. संरक्षण कठड्यात पुरात वाहून आलेला कचरा लटकल्याने गावात पाण्याची पातळी वाढली होती. मात्र गावकऱ्यांनी, ग्रा.पं. पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन सकाळीच सफाई अभियान राबविले त्यामुळे पाण्याचा निचरा होण्यास मदत झाली.तारशात २०१५ ची पुनरावृत्तीतारसा शिवारा झालेल्या मुसळधार पावसामुळे या परिसरातून वाहणाऱ्या सांड नदीच्या पुराने धोक्याची पातळी ओलांडली होती. त्यामुळे सोमवारच्या रात्री तारसा गावात नदीचे पाणी शिरले. गावातील ३५ पेक्षा जास्त घरात पाणी शिरले तर १० हून अधिक घरांची पडझड आली. ज्यांच्या घरात पाणी शिरले होते अशा नागरिकांची राहण्याची व्यवस्था गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आली होती. नदीच्या पुरामुळे परिसरातील धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.कारल्याची बाग उद्ध्वस्ततारसा निमखेडा रोडवर असलेली कारल्याची बाग सोमवारपासून सुरू असलेल्या पावसाने उद्ध्वस्त झाली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहेचिचाळ्यात घर पडलेचिचाळा परिसरात संततधार पाऊस चालू आहे. सतत दोन दिवस पाऊस पडत असल्यामुळे चिचाळा येथील मारोती तुळशीराम अरतपायरे यांचे घर पडले. अत्यंत हालाखीची परिस्थिती असलेले मारोती अरतपायरे यांना निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांना तात्काळ घरकुल यादीत सहभागी करून घरकुल उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. तलाठी तिजारे, कोतवाल बंडू कांडारकर यांनी मोक्काचौकशी करून शासनातर्फे मदत मंजूर करून देण्याचे आश्वासन दिले.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर