शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
3
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
4
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
5
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
6
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
7
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
8
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
9
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
10
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
11
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
12
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
13
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
14
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
15
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
16
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
17
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
18
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
19
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
20
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे

भीषण पाणीटंचाई : धरणांमध्ये केवळ १० टक्के साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 9:54 PM

नागपूर विभागातील मोठ्या धरणांमध्ये केवळ १० टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. नागपूर जिल्ह्यातील तोतलाडोह तलाव तर कोरडा पडला आहे.

ठळक मुद्देगोसेखुर्द-दिना, तोतलाडोह कोरडे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर विभागातील मोठ्या धरणांमध्ये केवळ १० टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. नागपूर जिल्ह्यातील तोतलाडोह तलाव तर कोरडा पडला आहे.नागपूर विभागात एकूण १८ मोठे प्रकल्प (धरण) आहेत. या धरणांची एकूण पाणीसाठा क्षमता ३५५३ दलघमी इतकी आहे. त्यात १८ तारखेपर्यंत केवळ ३४४ दलघमी (१० टक्के) इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. प्रकल्पनिहाय विचार केला असता नागपूर जिल्ह्यातील कामठी खैरीची क्षमता १४२ दलघमी इतकी आहे. त्यात केवळ ३२ टक्के पाणीसाठा आहे. रामटेक खिंडसीमध्ये १० टक्के, लोअर नांद ६० टक्के, वडगाव प्रकल्पात एक टक्का साठा आहे. गोंदिया जिल्ह्यातील इटियाडोह प्रकल्पात २५ टक्के, सिरपूर २३ टक्के, पुजारीटोला ३७ टक्के, कालीसरार ५१ टक्के आणि धापेवाडा बॅरेज टप्पा २ मध्ये १९ टक्के साठा आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील असोलामेंढा प्रकल्पात ३४ टक्के साठा आहे. गडचिरोलीतील दिना प्रकल्पात ० टक्के साठा, वर्धा जिल्ह्यातील बोरमध्ये १४ टक्के, धाममध्ये १२ टक्के, पोथरामध्ये २ टक्के तर लोअर वर्धा टप्पा १ मध्ये ८ टक्के साठा आहे. भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द टप्पा २ मध्ये ० टक्के पाणीसाठा आहे.गोसेखुर्द-दिना, तोतलाडोह कोरडेनागपूर विभगातील सर्वात मोठ्या प्रकल्पांपैकी एक असलेल्या तोतलाडोह प्रकल्पाची एकूण क्षमता १०१६.९ दलघमी इतकी आहे. यात केवळ २२ दरघमी म्हणजेच २ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. गोसेखुर्द प्रकल्प टप्पा दोनची क्षमता ७४० इतकी आहे. ते पूर्णत: कोरडा पडला आहे. त्यात आजच्याघडीला ० टक्के इतका पाणीसाठा आहे. नागपूर जिल्ह्यातील वडगाव धरणात केवळ १ टक्के इतके पाणी आहे. तर गडचिरोलीतील दिना प्रकल्पही कोरडा पडला आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईDamधरण