शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २० वर्षांनी राज ठाकरे शिवसेना भवनात जाणार; मनसे स्थापनेनंतर पहिल्यांदाच 'असं' घडणार
2
Gold Silver Price Today: २०२६ मध्येही सोन्या-चांदीची चमक कायम; चांदी ५६५६ रुपयांनी महागली, सोन्यातही जोरदार तेजी
3
'पाकिस्तानला उखडून टाका, आम्ही भारताबरोबर'; 'पाक'मधून कोणत्या नेत्याने लिहिले परराष्ट्र मंत्री जयशंकर यांना ओपन लेटर?
4
"ज्यांच्यामुळे श्वास गुदमरत होता, ते आता च्यवनप्राश देताहेत का?" आशिष शेलारांचा राज ठाकरेंना सवाल
5
भाजपा नगरसेवकाच्या मुलाची गुंडगिरी; पोलिसाला मारली कानाखाली, संतप्त जमावाने दिला चोप
6
वंचित, एमआयएमने काँग्रेसची वाट केली 'बिकट'! महापालिका निवडणुकीत आमदाराचा लागणार 'कस'
7
व्होडाफोन-आयडियाला मोठा झटका! नोव्हेंबरमध्ये १० लाखांहून अधिक ग्राहकांनी सोडली साथ...
8
काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठे खिंडार; अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडला, शिवसेना शिंदे गटात प्रवेश
9
कॉमेडी क्वीन श्रेया बुगडेचा कधीही न पाहिलेला बोल्ड लूक, दिसतेय इतकी हॉट की फोटोंवरुन नजरच हटणार नाही
10
“आता मोदींचा फोन आला तरी माघार नाही, अपक्ष लढणारच”; तिकीट नाकारताच भाजपा नेत्याचा एल्गार
11
Virat Kohli जगातील सर्वात हँडसम क्रिकेटर, त्याचा लूक...; युवा Vaishnavi Sharma किंगवर फिदा
12
समुद्राची गाज आणि पक्ष्यांचा किलबिलाट! नवीन वर्षात भारताच्या 'या' ५ हिडन समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या
13
MCX च्या शेअरमध्ये ८० टक्क्यांची घसरण? घाबरू नका, गुंतवणूकदारांसाठी आहे का मोठी संधी?
14
नागपुरात भाजपाच्या बंडखोर उमेदवाराला समर्थकांनीच घरात कोंडलं, गावंडे म्हणाले, "पाया पडतो, मला..."
15
Vastu Tips: आर्थिक चणचण असो नाहीतर वास्तू दोष; तुरटीचा छोटा तुकडा बदलेल तुमचे नशीब 
16
“मोहन भागवत हिंदीत बोलतात, मराठीत बोलताना कधी ऐकले आहे का?”; संजय राऊतांची RSSवर टीका
17
Nashik Municipal Election 2026: नाशिकमध्ये उद्धवसह राज यांची संयुक्त सभा! ठाकरे ब्रँडच्या जादूसाठी प्रयत्न
18
भाजपच्या आणखी दोन जागा बिनविरोध; प्रभाग 19 मधून दर्शना भोईर तर प्रभाग 20 मधून अजय बहिरा बिनविरोध
19
मूळ पाकिस्तानी असलेला 'हा' वादग्रस्त क्रिकेटर निवृत्त; ऑस्ट्रेलिया टीममध्ये केले होते मोठे कांड
20
धक्कादायक! भारतात महिला कैद्यांच्या संख्येत विक्रमी १६२% वाढ; पुरुष कैद्यांच्या वाढीच्या तुलनेत वेग दुप्पट!
Daily Top 2Weekly Top 5

शेतात कामाला जाणे, अंगणात चिमुकल्यांना खेळू देणेही जीवाला बेतणारे.. पूर्व विदर्भातील 'या' जिल्ह्यात वाघांची दहशत संपेना

By राजेश शेगोकार | Updated: September 29, 2025 13:22 IST

Nagpur : आज विदर्भातील शेतकऱ्याचा चेहरा बघा. तो फक्त पावसाने भिजलेला नाही; तो निराशेने, संतापाने, भीतीने भरलेला आहे. एका बाजूला वाघाच्या दहशतीनं घराबाहेर पडणं अवघड झालंय, तर दुसऱ्या बाजूला पिकं उद्ध्वस्त होऊन उद्याचं पोट उपाशी राहणार आहे ही चिंता आहे.

नागपूर : भय इथले संपत नाही, असे म्हणण्यासारखी स्थिती सध्या पूर्व विदर्भातील चार जिल्ह्यांत आहे. चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया हा संपूर्ण पूर्व विदर्भ सध्या एका भीषण प्रश्नांशी झुंजतो आहे. सकाळी शेतात कामाला जाणे, अंगणात चिमुकल्यांना खेळू देणे, जनावरांना चरण्यासाठी नेणे हा साधासोपा दैनंदिन व्यवहारही त्यांच्या जिवावर बेतू लागला आहे.

जंगलालगतच्या गावांत राहणारे गावकरी प्रत्येक दिवस वाघ व बिबट्याच्या दहशतीत घालवत आहेत. वाघ संवर्धनाच्या यशस्वी मोहिमेची आपण छातीठोकपणे दाद देतो, पण त्या यशामागे ग्रामीण भागातील सामान्य माणसांची किंमत किती मोठी आहे हे मात्र कुणी बोलत नाही.

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सीमेवरील जिल्ह्यातील मूल तालुक्यातील बाबा आमटे प्रकल्पाच्या वसाहतीत अन्नपूर्णा बिलोणे ही पन्नाशीची महिला अंगणात भांडी घासत असताना वाघाने तिच्यावर झडप घातली. यातच तिचा बळी गेला. चंद्रपूरच्या सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी गावातील शुभम बबन मानकर या दुसऱ्या वर्गातील चिमुकल्याला वाघाने वडिलांच्या डोळ्यांसमोरून उचलून नेले. गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील संजयनगर येथे अंश प्रकाश मंडल हा पाच वर्षाचा चिमुकला लघुशंका करत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने चिमुकल्या अंशच्या नरडीचा घोट घेतला. अशा घटना रोजच्या झाल्या आहेत. अवघ्या ९ महिन्यांत चंद्रपूर जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यांत ३१ बळी गेले आहेत. गोंदियात वाघाच्या हल्ल्यात या वर्षात दोन ठार, तर चार जखमी झाले आहेत. 

गडचिरोली जिल्ह्यातही दोन बळी गेले आहेत. एकंदर वाघ व बिबट्याच्या दहशतीने येथील गावकरी बेहाल झाले आहेत. नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या पारशिवनी, रामटेक व सावनेर तालुक्यातील काही भागात वाघांच्या हल्ल्यांमध्ये शेतकरी व गुराख्यांचा मृत्यू झाला आहे. उमरेड कहांडला अभयारण्यालगतच्या कुही व भिवापूर तालुक्यात वाघांचे शेतकऱ्यांवरील हल्ले वाढत आहेत.

हा सगळा प्रश्न फक्त वनविभागाच्या कामकाजाचा नाही, तर विकासाच्या एकूण धोरणाचा आहे. रस्त्यांचे रुंदीकरण, खाणकाम, जंगलातील सततची मानवी घुसखोरी यामुळे वाघांचा अधिवास विस्कळीत झाला आहे. वाघांना अन्नासाठी मानवी वस्तीच्या जवळ यावं लागल्याने हा जीवघेणा संघर्ष सुरू झाला आहे. वाघाच्या वाढत्या संख्येला आपण संवर्धनाचं यश मानतो; पण त्या संख्येला जगण्यासाठी पुरेसा सुरक्षित अधिवास दिलाच नाही, ही खरी शोकांतिका आहे.

वाघाचं रक्षण करण्यासाठी मोहिमा चालतात, आंतरराष्ट्रीय पातळीवर कौतुक होतं. पण माणसाचा जीव गेला, तर त्याचं काय? जंगल वाचलं पाहिजे, वाघ वाचला पाहिजे हे खरं; पण शेतकरी जर जिवंत राहिला नाही, तर या सगळ्या संवर्धनाला अर्थ काय? 'वाघाचं भविष्य उज्ज्वल, पण माणूस वाचेल का?' हा प्रश्न विदर्भातील प्रत्येक गावकऱ्यांच्या डोक्यात भुंगा घालत आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे ही केवळ शासनाची जबाबदारी नाही, तर आपल्या संपूर्ण समाजाचे नैतिक कर्तव्य आहे.

वाघांचे रक्षण महत्त्वाचेच, पण त्याहून मोठं काम म्हणजे शेतकऱ्याचा हात धरून त्याला जगण्यासाठी आधार देणं. कारण वाघांशिवाय जंगल नाही, पण शेतकऱ्यांशिवाय जीवनच नाही. 

English
हिंदी सारांश
Web Title : Tiger Terror Grips East Vidarbha: Villagers Live in Constant Fear

Web Summary : East Vidarbha villagers face deadly tiger attacks. Daily life is threatened as tiger-human conflict escalates due to habitat loss. Conservation efforts prioritize tigers, but human lives are at risk. Support for farmers is crucial.
टॅग्स :Vidarbhaविदर्भnagpurनागपूरwildlifeवन्यजीव