शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
2
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
3
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
4
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
5
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
6
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
7
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
8
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
9
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
10
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
11
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
12
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
13
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
14
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
15
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
16
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
17
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
18
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
19
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरण दिन विशेष; २० वर्षांत उपराजधानीतील हिरवळ ३३ टक्क्याने घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 10:08 IST

शहर ते महानगर व आता मेट्रो सिटी म्हणून बिरुद मिळविणाऱ्या नागपूर शहराने मिलेनियम इयर २००० पासून २० वर्षांत पर्यावरणाच्या दृष्टीने बरेच काही गमावले आहे. २० वर्षांत शहर क्षेत्राची हिरवळ (ग्रीन कव्हर) तब्बल ३३ टक्क्याने घटली आहे.

ठळक मुद्देतापमानात २-३ डिग्रीने वाढ भूजल स्तर व प्रदूषण स्थिर

निशांत वानखेडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहर ते महानगर व आता मेट्रो सिटी म्हणून बिरुद मिळविणाऱ्या नागपूर शहराने मिलेनियम इयर २००० पासून २० वर्षांत पर्यावरणाच्या दृष्टीने बरेच काही गमावले आहे. २० वर्षांत शहर क्षेत्राची हिरवळ (ग्रीन कव्हर) तब्बल ३३ टक्क्याने घटली आहे. या काळात शहरातील १६ तलावांमधून मोठे म्हणावे असे केवळ चार तलाव शिल्लक राहिले आहेत. नद्यांचे नाल्यात रूपांतर झाले आहे आणि तापमान २ ते ३ डिग्री सेल्सिअसने वाढले आहे. २० वर्षांत प्रदूषण आणि भूजलस्तर स्थिर असल्याचा सकारात्मक दावा केला जात असला तरी परिस्थिती त्याहून विपरीत आहे.२००० हे वर्ष जगभरात मिलेनियम इयर म्हणून साजरे झाले होते. त्यावेळी नवे स्वप्न, नव्या वाटा स्वीकारण्याचा संकल्प प्रत्येकाने केला असेल. मात्र या नव्या वाटावर चालताना पर्यावरणाचा प्रचंड ºहास मानवाने केला आहे. त्यामुळे जगाला अनेक संकटांना तोंड द्यावे लागत असून त्याचा अनुभव आपण घेत आहोतच. या २० वर्षांत नागपूर शहरात अनेक बदल घडले आहेत. मात्र पर्यावरणाच्या दृष्टीने आपण बरेच काही गमावलेही आहे. या काळात पर्यावरणाच्या घटकांमध्ये कशी स्थित्यंतरे घडली, याविषयीचा आढावा आम्ही या निमित्ताने घेतला. एका सर्वेक्षणानुसार शहराच्या केंद्रस्थानावरून ३० किलोमीटर म्हणजे ३७२ चौ.किमी.च्या परिघातील हिरवळ ३३ टक्क्याने घटली आहे. १९९९ साली या परिघात ११६ चौ.किमी.चे वनक्षेत्र होते जे २०१३ मध्ये ९१ चौ.किमी व २०१८-१९ मध्ये ७६ चौ.किमी.पर्यंत घसरले आहे. म्हणजे कधी ३१ टक्के असलेले ग्रीन कव्हर २१ वर आले आहे. हीच अवस्था तलावांची झाली आहे. २० वर्षांपूर्वी १६ तलाव शहरात अस्तित्वात होते. त्यातील अंबाझरी, फुटाळा व गोरेवाडा तलाव सुस्थितीत आहेत तर शुक्रवारी तलाव, सोनेगाव तलाव अस्तित्वाची लढाई लढत आहेत. त्यातही या तलावातील आॅक्सिजनचे प्रमाण घटले आहे.

शहराची हिरवळ कमी झाली. उद्योग, बांधकामात वाढ झाली असून वाहनांचीही संख्या वाढली आहे. त्यामुळे प्रदूषण आणि तापमानात वाढ झाली आहे. अशात आधीच औष्णिक विद्युत केंद्र असताना आणखी विद्युत केंद्र उभारण्याचा प्रस्ताव धोकादायक आहे.- जयदीप दास, पर्यावरणतज्ज्ञ

कार्बन, सल्फर आदी प्रदूषण मर्यादेच्या वर गेले नाही ही समाधानकारक बाब आहे पण धूलिकणांचे वाढते प्रमाण आरोग्याच्या दृष्टीने चिंता वाढविणारे आहे. याशिवाय अत्यल्प असलेल्या तलावांचे वाढलेले प्रदूषण जैवविविधतेला हानी पोहचविणारे आहे.- कौस्तुभ चॅटर्जी, पर्यावरणतज्ज्ञ 

टॅग्स :environmentपर्यावरण