शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
3
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
4
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
5
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
6
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
7
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
8
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
9
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
10
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
11
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
12
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
13
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
14
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
15
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
16
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
17
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
18
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
19
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
20
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का

अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर ‘सीईटी सेल’चे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 00:33 IST

अंगातून घामाच्या धारा निघत असतानादेखील अभियांत्रिकी प्रवेशासाठी कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी तासन्तास रांगामध्ये उभे राहणाऱ्या विद्यार्थी व पालकांना ‘सीईटी सेल’ने मोठा धक्का दिला आहे. ‘सर्व्हर’वर ताण आल्याचे कारण देत अर्ज भरण्यापासून सर्व प्रवेशप्रक्रिया आता परत राबविण्यात येणार आहे. २४ जूनपासून ही प्रक्रिया सुरू होणार असून अद्यापपर्यंत ‘सीईटी सेल’ने नवीन वेळापत्रक जाहीर केलेले नाही. दरम्यान, या गलथान कारभारामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे.

ठळक मुद्देगलथान कारभाराचा विद्यार्थ्यांना फटका२४ पासून अभियांत्रिकीसह व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी परत भरावे लागणार अर्ज

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अंगातून घामाच्या धारा निघत असतानादेखील अभियांत्रिकी प्रवेशासाठी कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी तासन्तास रांगामध्ये उभे राहणाऱ्या विद्यार्थी व पालकांना ‘सीईटी सेल’ने मोठा धक्का दिला आहे. ‘सर्व्हर’वर ताण आल्याचे कारण देत अर्ज भरण्यापासून सर्व प्रवेशप्रक्रिया आता परत राबविण्यात येणार आहे. २४ जूनपासून ही प्रक्रिया सुरू होणार असून अद्यापपर्यंत ‘सीईटी सेल’ने नवीन वेळापत्रक जाहीर केलेले नाही. दरम्यान, या गलथान कारभारामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे.अभियांत्रिकीच्या प्रवेशप्रक्रियेला सुरुवात झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी ‘ऑनलाईन’ अर्ज भरले व त्यानंतर आवश्यक कागदपत्र अपलोड करण्यासाठी २१ जूनपर्यंत कालावधी देण्यात आला होता. ‘एसएएआर’ या संकेतस्थळावर नोंदणी करायची होती व प्रवेश प्रक्रिया अर्ज भरायचा होता. या प्रक्रियेसाठी काही कॉलेजमध्ये सेतू सुविधा केंद्र सुरू करण्यात आले. मात्र ‘सर्व्हर डाऊन’ असल्यामुळे विद्यार्थ्यांची कागदपत्रांच्या पडताळणीसाठी अक्षरश: परीक्षाच झाली.राज्यभरातून तक्रारी येत असल्याने ‘सीईटी सेल’ने तातडीची बैठक बोलविली. विद्यार्थ्यांनी भरलेली माहिती एकत्रितपणे संकलित करताना तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. सदोष माहितीच्या आधारे अंतरिम गुणवत्ता यादी घोषित करणे धोकादायक असल्याचे मत तज्ज्ञ समितीने व्यक्त केले. त्यामुळे संपूर्ण प्रक्रियाच रद्दबातल करण्यात आली. आता २४ जूनपासून प्रक्रिया परत सुरू करण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अगोदर अर्ज भरले होते किंवा कागदपत्रांची पडताळणी केली होती त्यांना परत अर्ज भरावा लागणार आहे.विद्यार्थी, पालक संतप्तसीईटीला बसलेल्या हजारो विद्यार्थ्यांनी गुरुवारपर्यंत अभियांत्रिकी, फार्मसी, वास्तुशास्त्र, हॉटेल व्यवस्थापन अशा विविध अभ्यासक्रमांसाठी तासन्तास सेतू केंद्रावर बसून नोंदणी केली होती. मात्र वेळ फुकट गेल्याने पालक आणि विद्यार्थी संताप व्यक्त करीत आहेत. जर ‘सीईटी सेल’ची अगोदरपासून तयारी नव्हती मग प्रक्रिया राबवलीच का, असा संतप्त सवाल पालकांकडून करण्यात येत आहे.तंत्रज्ञानात इतके माघारलेले का ?‘सीईटी सेल’ने संकेतस्थळाच्या ‘सर्व्हर’चे कारण समोर करुन प्रक्रिया रद्द केली आहे. मात्र प्रवेशप्रक्रियेचे ‘सर्व्हर डाऊन’ होऊ नये याची काळजी अगोदर का घेण्यात आली नाही. मुंबई, पुणे यासह देशात मोठमोठ्या आयटी कंपन्या आहेत. त्यांची यात मदत का घेण्यात आली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सबकुछ ऑनलाईनचे दावे करणाऱ्या प्रशासनाचे दावे या गलथान कारभारामुळे उघडे पडले आहे.

 

टॅग्स :Studentविद्यार्थीnagpurनागपूर