शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
3
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
4
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
5
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
6
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
7
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
8
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
9
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
10
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
11
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
12
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
13
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
14
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
15
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
16
आधी केस गळाले, नंतर नख; आता लोकांच्या हाताला पडताहेत भेगा; बुलढाणा जिल्ह्यातील गावात भीतीचे वातावरण
17
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
18
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
19
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
20
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."

अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर ‘सीईटी सेल’चे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 00:33 IST

अंगातून घामाच्या धारा निघत असतानादेखील अभियांत्रिकी प्रवेशासाठी कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी तासन्तास रांगामध्ये उभे राहणाऱ्या विद्यार्थी व पालकांना ‘सीईटी सेल’ने मोठा धक्का दिला आहे. ‘सर्व्हर’वर ताण आल्याचे कारण देत अर्ज भरण्यापासून सर्व प्रवेशप्रक्रिया आता परत राबविण्यात येणार आहे. २४ जूनपासून ही प्रक्रिया सुरू होणार असून अद्यापपर्यंत ‘सीईटी सेल’ने नवीन वेळापत्रक जाहीर केलेले नाही. दरम्यान, या गलथान कारभारामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे.

ठळक मुद्देगलथान कारभाराचा विद्यार्थ्यांना फटका२४ पासून अभियांत्रिकीसह व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी परत भरावे लागणार अर्ज

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अंगातून घामाच्या धारा निघत असतानादेखील अभियांत्रिकी प्रवेशासाठी कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी तासन्तास रांगामध्ये उभे राहणाऱ्या विद्यार्थी व पालकांना ‘सीईटी सेल’ने मोठा धक्का दिला आहे. ‘सर्व्हर’वर ताण आल्याचे कारण देत अर्ज भरण्यापासून सर्व प्रवेशप्रक्रिया आता परत राबविण्यात येणार आहे. २४ जूनपासून ही प्रक्रिया सुरू होणार असून अद्यापपर्यंत ‘सीईटी सेल’ने नवीन वेळापत्रक जाहीर केलेले नाही. दरम्यान, या गलथान कारभारामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे.अभियांत्रिकीच्या प्रवेशप्रक्रियेला सुरुवात झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी ‘ऑनलाईन’ अर्ज भरले व त्यानंतर आवश्यक कागदपत्र अपलोड करण्यासाठी २१ जूनपर्यंत कालावधी देण्यात आला होता. ‘एसएएआर’ या संकेतस्थळावर नोंदणी करायची होती व प्रवेश प्रक्रिया अर्ज भरायचा होता. या प्रक्रियेसाठी काही कॉलेजमध्ये सेतू सुविधा केंद्र सुरू करण्यात आले. मात्र ‘सर्व्हर डाऊन’ असल्यामुळे विद्यार्थ्यांची कागदपत्रांच्या पडताळणीसाठी अक्षरश: परीक्षाच झाली.राज्यभरातून तक्रारी येत असल्याने ‘सीईटी सेल’ने तातडीची बैठक बोलविली. विद्यार्थ्यांनी भरलेली माहिती एकत्रितपणे संकलित करताना तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. सदोष माहितीच्या आधारे अंतरिम गुणवत्ता यादी घोषित करणे धोकादायक असल्याचे मत तज्ज्ञ समितीने व्यक्त केले. त्यामुळे संपूर्ण प्रक्रियाच रद्दबातल करण्यात आली. आता २४ जूनपासून प्रक्रिया परत सुरू करण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अगोदर अर्ज भरले होते किंवा कागदपत्रांची पडताळणी केली होती त्यांना परत अर्ज भरावा लागणार आहे.विद्यार्थी, पालक संतप्तसीईटीला बसलेल्या हजारो विद्यार्थ्यांनी गुरुवारपर्यंत अभियांत्रिकी, फार्मसी, वास्तुशास्त्र, हॉटेल व्यवस्थापन अशा विविध अभ्यासक्रमांसाठी तासन्तास सेतू केंद्रावर बसून नोंदणी केली होती. मात्र वेळ फुकट गेल्याने पालक आणि विद्यार्थी संताप व्यक्त करीत आहेत. जर ‘सीईटी सेल’ची अगोदरपासून तयारी नव्हती मग प्रक्रिया राबवलीच का, असा संतप्त सवाल पालकांकडून करण्यात येत आहे.तंत्रज्ञानात इतके माघारलेले का ?‘सीईटी सेल’ने संकेतस्थळाच्या ‘सर्व्हर’चे कारण समोर करुन प्रक्रिया रद्द केली आहे. मात्र प्रवेशप्रक्रियेचे ‘सर्व्हर डाऊन’ होऊ नये याची काळजी अगोदर का घेण्यात आली नाही. मुंबई, पुणे यासह देशात मोठमोठ्या आयटी कंपन्या आहेत. त्यांची यात मदत का घेण्यात आली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सबकुछ ऑनलाईनचे दावे करणाऱ्या प्रशासनाचे दावे या गलथान कारभारामुळे उघडे पडले आहे.

 

टॅग्स :Studentविद्यार्थीnagpurनागपूर