शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर ‘सीईटी सेल’चे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 00:33 IST

अंगातून घामाच्या धारा निघत असतानादेखील अभियांत्रिकी प्रवेशासाठी कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी तासन्तास रांगामध्ये उभे राहणाऱ्या विद्यार्थी व पालकांना ‘सीईटी सेल’ने मोठा धक्का दिला आहे. ‘सर्व्हर’वर ताण आल्याचे कारण देत अर्ज भरण्यापासून सर्व प्रवेशप्रक्रिया आता परत राबविण्यात येणार आहे. २४ जूनपासून ही प्रक्रिया सुरू होणार असून अद्यापपर्यंत ‘सीईटी सेल’ने नवीन वेळापत्रक जाहीर केलेले नाही. दरम्यान, या गलथान कारभारामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे.

ठळक मुद्देगलथान कारभाराचा विद्यार्थ्यांना फटका२४ पासून अभियांत्रिकीसह व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी परत भरावे लागणार अर्ज

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अंगातून घामाच्या धारा निघत असतानादेखील अभियांत्रिकी प्रवेशासाठी कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी तासन्तास रांगामध्ये उभे राहणाऱ्या विद्यार्थी व पालकांना ‘सीईटी सेल’ने मोठा धक्का दिला आहे. ‘सर्व्हर’वर ताण आल्याचे कारण देत अर्ज भरण्यापासून सर्व प्रवेशप्रक्रिया आता परत राबविण्यात येणार आहे. २४ जूनपासून ही प्रक्रिया सुरू होणार असून अद्यापपर्यंत ‘सीईटी सेल’ने नवीन वेळापत्रक जाहीर केलेले नाही. दरम्यान, या गलथान कारभारामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे.अभियांत्रिकीच्या प्रवेशप्रक्रियेला सुरुवात झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी ‘ऑनलाईन’ अर्ज भरले व त्यानंतर आवश्यक कागदपत्र अपलोड करण्यासाठी २१ जूनपर्यंत कालावधी देण्यात आला होता. ‘एसएएआर’ या संकेतस्थळावर नोंदणी करायची होती व प्रवेश प्रक्रिया अर्ज भरायचा होता. या प्रक्रियेसाठी काही कॉलेजमध्ये सेतू सुविधा केंद्र सुरू करण्यात आले. मात्र ‘सर्व्हर डाऊन’ असल्यामुळे विद्यार्थ्यांची कागदपत्रांच्या पडताळणीसाठी अक्षरश: परीक्षाच झाली.राज्यभरातून तक्रारी येत असल्याने ‘सीईटी सेल’ने तातडीची बैठक बोलविली. विद्यार्थ्यांनी भरलेली माहिती एकत्रितपणे संकलित करताना तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. सदोष माहितीच्या आधारे अंतरिम गुणवत्ता यादी घोषित करणे धोकादायक असल्याचे मत तज्ज्ञ समितीने व्यक्त केले. त्यामुळे संपूर्ण प्रक्रियाच रद्दबातल करण्यात आली. आता २४ जूनपासून प्रक्रिया परत सुरू करण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अगोदर अर्ज भरले होते किंवा कागदपत्रांची पडताळणी केली होती त्यांना परत अर्ज भरावा लागणार आहे.विद्यार्थी, पालक संतप्तसीईटीला बसलेल्या हजारो विद्यार्थ्यांनी गुरुवारपर्यंत अभियांत्रिकी, फार्मसी, वास्तुशास्त्र, हॉटेल व्यवस्थापन अशा विविध अभ्यासक्रमांसाठी तासन्तास सेतू केंद्रावर बसून नोंदणी केली होती. मात्र वेळ फुकट गेल्याने पालक आणि विद्यार्थी संताप व्यक्त करीत आहेत. जर ‘सीईटी सेल’ची अगोदरपासून तयारी नव्हती मग प्रक्रिया राबवलीच का, असा संतप्त सवाल पालकांकडून करण्यात येत आहे.तंत्रज्ञानात इतके माघारलेले का ?‘सीईटी सेल’ने संकेतस्थळाच्या ‘सर्व्हर’चे कारण समोर करुन प्रक्रिया रद्द केली आहे. मात्र प्रवेशप्रक्रियेचे ‘सर्व्हर डाऊन’ होऊ नये याची काळजी अगोदर का घेण्यात आली नाही. मुंबई, पुणे यासह देशात मोठमोठ्या आयटी कंपन्या आहेत. त्यांची यात मदत का घेण्यात आली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सबकुछ ऑनलाईनचे दावे करणाऱ्या प्रशासनाचे दावे या गलथान कारभारामुळे उघडे पडले आहे.

 

टॅग्स :Studentविद्यार्थीnagpurनागपूर