शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
3
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
4
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
5
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
6
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
7
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
8
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
9
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
10
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
11
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
12
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
13
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
14
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
15
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
16
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
17
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
18
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
19
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
20
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
Daily Top 2Weekly Top 5

नवीन बोअरवेलपेक्षा 'फ्लशिंग'वर देणार भर; ३७ कोटींचा आराखडा तयार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2025 18:22 IST

Nagpur : पाणी-टंचाईग्रस्त गावांसाठी हजारांहून अधिक उपाययोजनाः जिल्हा परिषद प्रशासन झाले सज्ज

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मार्च महिन्यातच पारा चढला आहे. त्यात पावसाळ्यात पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदाच्या उन्हाळ्यात जिल्ह्यात निर्माण होणारी पाणीटंचाई दूर करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने आराखडा तयार केला आहे. यंदा नवीन बोअरवेलपेक्षा 'फ्लशिंग'वर भर देण्यात आला आहे. उपयायोजनेसाठी ३७ कोटी ४९ लाख रुपयांच्या खर्चाला जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे. 

आराखड्यात ४०० हून अधिक गावांत १ हजार ४६ उपाययोजना केल्या जाणार आहेत. यावर्षी नवीन बोअरवेल न घेता जुन्या बोअरवेलच्या फ्लशिंगवर पाणीपुरवठा विभागाचा अधिक भर राहणार आहे. तसेच यामध्ये नळयोजना विशेष दुरुस्ती, विंधन विहीर विशेष दुरुस्ती, टँकर, खासगी विहीर अधिग्रहण, गाळ काढणे, विहिरींचे खोलीकरण आदी उपाययोजनांची कामे होणार आहेत. 

पाणीपुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या जिल्ह्यात एकाही गावात पाण्यासाठी टँकर सुरू करण्यात आलेले नाही. परंतु गेल्यापावसाळ्यात काही भागात पुरेसा पाऊस झाला नसल्याने टँकरची गरज भासू शकते. मागणीनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन पाणीपुरवठा विभागाने केले आहे. मागील वर्षी जिल्ह्यात ११ टँकरने टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्यात आला होता. यात प्रामुख्याने हिंगणा तालुक्यांतील गावांचा समावेश होता.

'फ्लशिंग'च्या ८७५ कामांना मंजुरीटंचाई आराखड्याअंतर्गत ८७५ विंधन विहिरींच्या 'फ्लशिंग' कामांना मंजुरी देण्यात आली आहे. तसेच सार्वजनिक १७१ विंधन विहिरीची कामे केली जाणार आहे. मागणीनुसार टैंकर व गरजेनुसार विहीर अधिग्रहण करणार असल्याची माहिती जि. प.च्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता उमल चांदेकर यांनी दिली.

बोअरवेल पुनरुज्जीवित करण्यावर भरबोअरवेल पुनरुज्जीवित करण्यावर भर दिला जाणार आहे. त्यामुळे पाण्याचा उपसा मर्यादित राहतो व नव्याने बोअरवेल करण्याची गरजही भासत नाही. सोबतच बोअरवेलवर होणारा अतिरिक्त खर्च टाळता येतो.

टॅग्स :nagpurनागपूर