शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

शिंदे-पवार ‘एक म्यान में दो तलवार’, सरकार पुन्हा अस्थीर होणार; विजय वडेट्टीवार यांचे भाकित

By कमलेश वानखेडे | Updated: July 3, 2023 14:06 IST

शिंदे यांचे हे शेवटचे अधिवेशन

नागपूर : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपशी हात मिळणी करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये सामील होणे ही एक अनैसर्गिक तडजोड आहे. शिंदे व पवार हे दोन्ही नेते आपले लक्ष्य साधताना कुणाचाही पर्वा करणारे नाहीत. हे सरकार आधीच अस्थीर होते. आता ‘एक म्यान मे दो तलवार’ अशी परिस्थीत झाल्यामुळे म्यानच फुटण्याची वेळ येईल व सरकार पुन्हा अस्थीर होईल, असे मत काँग्रेसचे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले.

कालची फूट ही अनपेक्षित होती, असं म्हणणं चुकीच आहे. ते अपेक्षीतच होतं. शरद पवारांचे प्रयत्न सुरू होते, अजित पवारांना समजवण्याचा प्रयत्न झाला. पण त्यांना थांबायचं नव्हतं. अजित पवारांना जाण्याचं काही एक कारण नव्हतं. गेली अनेक वर्षे त्यांच्याकडे सत्ता होती. सत्ता गेल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते राहू शकत नाही. सत्ता गेली त्या दिवसापासून धुसफुस वाढली होती. अजित पवार यांचा कल सत्तेकडे होता, हे शरद पवार यांच्याही लक्षात आले होते. शरद पवारांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. पण ते मानले नाहीत. ९० टक्के लोकांनी या घाणेरड्या राजकारणावर चीड व्यक्त केली आहे. सोशल मीडियावरून सामान्य जनतेने चीड व्यक्त केली. आता जनताच यांना धडा शिकवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादीत फूट, काँग्रेसनं केला विरोधी पक्षनेतेपदावर दावा, बाळासाहेब थोरात म्हणाले…

विधानसभा अध्यक्षांनी अपात्रतेवर वेळेत निर्णय घ्यावा, यासाठी शिवसेनेने दाखल केलेल्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अपात्र ठरवल्यानंतर काय, याची तजवीज भाजपने करून ठेवली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्री म्हणून आगामी अधिवेशन हे अखेरचे अधिवेशन ठरेल, असा दावाही वडेट्टीवार यांनी केला. वापरा व फेका हे भाजपचे धोरण आहे. त्याचा अनुभव शिंदे गटालाही लवकरच येईल, असा चिमटाही त्यांनी काढला.

अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांना ५ जुलैपर्यंत अल्टीमेटम? आव्हाडांनी शरद पवारांशी 'वैर' स्पष्ट केले

ज्याची संख्या जास्त त्याचा विरोधी पक्षनेता

काँग्रेसची मंगळवारी मुंबईत बैठक आहे. संख्याबळावर विरोधी पक्षनेता ठरतो. राष्ट्रवादीकडे किती आमदार आहे, हे लवकरच स्पष्ट होईल. लहान भाऊ, मोठा भाऊ हा आताचा विषय नाही. सर्व नेत्यांच्या समन्वयातून मार्ग निघेल, असेही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारcongressकाँग्रेसVijay Vadettiwarविजय वडेट्टीवार