शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
2
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
3
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
4
विमानांच्या इंजिन फ्यूल स्विचची तात्काळ तपासणी करावी; DGCA चा सर्व कंपन्यांना आदेश
5
याला म्हणतात ढासू शेअर...! 1 लाखाचे केले 3.7 कोटी, 5 वर्षांत दिला 36900% चा बंपर परतावा; करतोय मालामाल
6
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
7
IND vs ENG: लॉर्ड्सवर अक्षय कुमारसोबत मॅच बघायला आली 'ही' अभिनेत्री, एकेकाळी गाजवलंय बॉलिवूड
8
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
9
हिंदी-मराठी वादामुळे वाढलेला तणाव कमी करण्यासाठी काँग्रेसकडून आम्ही मराठी, आम्ही भारतीय भाषा, कार्यक्रमाचं मिरारोड येथे आयोजन
10
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
11
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
12
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
13
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
14
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
15
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
16
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
17
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
18
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
19
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
20
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले

शिंदे-पवार ‘एक म्यान में दो तलवार’, सरकार पुन्हा अस्थीर होणार; विजय वडेट्टीवार यांचे भाकित

By कमलेश वानखेडे | Updated: July 3, 2023 14:06 IST

शिंदे यांचे हे शेवटचे अधिवेशन

नागपूर : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपशी हात मिळणी करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये सामील होणे ही एक अनैसर्गिक तडजोड आहे. शिंदे व पवार हे दोन्ही नेते आपले लक्ष्य साधताना कुणाचाही पर्वा करणारे नाहीत. हे सरकार आधीच अस्थीर होते. आता ‘एक म्यान मे दो तलवार’ अशी परिस्थीत झाल्यामुळे म्यानच फुटण्याची वेळ येईल व सरकार पुन्हा अस्थीर होईल, असे मत काँग्रेसचे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले.

कालची फूट ही अनपेक्षित होती, असं म्हणणं चुकीच आहे. ते अपेक्षीतच होतं. शरद पवारांचे प्रयत्न सुरू होते, अजित पवारांना समजवण्याचा प्रयत्न झाला. पण त्यांना थांबायचं नव्हतं. अजित पवारांना जाण्याचं काही एक कारण नव्हतं. गेली अनेक वर्षे त्यांच्याकडे सत्ता होती. सत्ता गेल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते राहू शकत नाही. सत्ता गेली त्या दिवसापासून धुसफुस वाढली होती. अजित पवार यांचा कल सत्तेकडे होता, हे शरद पवार यांच्याही लक्षात आले होते. शरद पवारांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. पण ते मानले नाहीत. ९० टक्के लोकांनी या घाणेरड्या राजकारणावर चीड व्यक्त केली आहे. सोशल मीडियावरून सामान्य जनतेने चीड व्यक्त केली. आता जनताच यांना धडा शिकवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादीत फूट, काँग्रेसनं केला विरोधी पक्षनेतेपदावर दावा, बाळासाहेब थोरात म्हणाले…

विधानसभा अध्यक्षांनी अपात्रतेवर वेळेत निर्णय घ्यावा, यासाठी शिवसेनेने दाखल केलेल्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अपात्र ठरवल्यानंतर काय, याची तजवीज भाजपने करून ठेवली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्री म्हणून आगामी अधिवेशन हे अखेरचे अधिवेशन ठरेल, असा दावाही वडेट्टीवार यांनी केला. वापरा व फेका हे भाजपचे धोरण आहे. त्याचा अनुभव शिंदे गटालाही लवकरच येईल, असा चिमटाही त्यांनी काढला.

अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांना ५ जुलैपर्यंत अल्टीमेटम? आव्हाडांनी शरद पवारांशी 'वैर' स्पष्ट केले

ज्याची संख्या जास्त त्याचा विरोधी पक्षनेता

काँग्रेसची मंगळवारी मुंबईत बैठक आहे. संख्याबळावर विरोधी पक्षनेता ठरतो. राष्ट्रवादीकडे किती आमदार आहे, हे लवकरच स्पष्ट होईल. लहान भाऊ, मोठा भाऊ हा आताचा विषय नाही. सर्व नेत्यांच्या समन्वयातून मार्ग निघेल, असेही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारcongressकाँग्रेसVijay Vadettiwarविजय वडेट्टीवार