शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

निधीअभावी ‘एनटीसी’ घरकूल याेजना अधांतरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:06 IST

बाबा टेकाडे लाेकमत न्यूज नेटवर्क सावनेर : धनगर समाजबांधवांना हक्काची घरे मिळावी म्हणून शासनाच्या वतीने ‘एनटीसी’ घरकूल याेजना राबविली ...

बाबा टेकाडे

लाेकमत न्यूज नेटवर्क

सावनेर : धनगर समाजबांधवांना हक्काची घरे मिळावी म्हणून शासनाच्या वतीने ‘एनटीसी’ घरकूल याेजना राबविली जाते. शासनाने या याेजनेसाठी दाेन वर्षांपासून निधीच उपलब्ध करून दिला नाही. त्यामुळे सलग दुसऱ्या वर्षीही धनगर समाजबांधवांना या याेजनेचा लाभ मिळाला नाही. ही समस्या साेडविण्यासाठी अधिकाऱ्यांना देण्यात आलेली निवेदने व स्थानिक नेत्यांनी दिलेली आश्वासनेे फाेल ठरली आहेत.

या याेजनेंतर्गत नागपूर जिल्ह्यात एक हजार घरकुलांचे बांधकाम करण्याचा शासनाने निर्णय घेतला. मात्र, प्रशासनाने या याेजनेचा फारसा प्रचार, प्रसार न केल्याने याबाबत समाजबांधवांना फारसी माहिती मिळाली नाही. त्यामुळे प्रशासनाकडे उद्दिष्टापेक्षा कमी म्हणजेच ९६१ अर्ज प्राप्त झाले. प्रशासनाने पहिल्या टप्प्यात ९६१ पैकी ६४४ आणि नंतर ३१७ अर्जांना मंजुरी दिली हाेती. यातील केवळ २८ अर्जांना मंजुरी देण्यात आली असून, त्या लाभार्थ्यांना घरकुलांचे बांधकाम करण्यासाठी निधीच देण्यात आला नाही.

या याेजनेचे अर्ज समाज कल्याण व जिल्हा ग्रामीण विकास याेजना कार्यालयात धूळ खात पडले आहेत. ते निकाली काढण्याची सवड कुणालाही नाही. दुसरीकडे, त्रुटी असलेले अर्ज कर्मचारी व अधिकाऱ्यांनी स्वीकारले कसे, असा प्रश्नही काहींनी उपस्थित केला आहे. हे अर्ज ग्रामपंचायत, पंचायत समिती कार्यालयामार्फत समाज कल्याण व जिल्हा ग्रामीण विकास याेजना कार्यालयात सादर करण्यात आले. त्या अर्जांची ग्रामपंचायत अथवा पंचायत समिती कार्यालयात छाननी का करण्यात आली नाही, तेव्हाच त्रुटींची पूर्तता करण्याची सूचना का दिली नाही, असा प्रश्नही पुरुषाेत्तम डाखाेळे यांच्यासह जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी उपस्थित केला आहे.

ही समस्या साेडविण्यासाठी तसेच याेजनेला निधी उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अल्पसंख्याकमंत्री विजय वडेट्टीवार, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, विभागीय आयुक्त डाॅ. संजीवकुमार यांना निवेदने देऊन पाठपुरावा करण्यात आला; परंतु कुणीही ही समस्या निकाली काढली नाही, असा आराेपही पुरुषाेत्तम डाखाेळे यांनी केला असून, धनगर समाजबांधवांना घरकूल याेजनेचा लाभ न मिळाल्यास तीव्र आंदाेलन करण्याचा इशाराही त्यांच्यासह समाजबांधवांनी दिला आहे.

...

अंमलबजावणीविना अध्यादेश

राज्य शासनाने या याेजनेसंदर्भात ६ सप्टेंबर २०१९ राेजी एक अध्यादेश काढला हाेता. धनगर समाजातील गरीब नागरिकांना राहायला हक्काची घरे मिळावीत, हा त्या अध्यादेशामागचा उद्देश हाेता. वास्तवात, दाेन वर्षांपासून या अध्यादेशाची प्रशासनाने अंमलबजावणी केली नाही. समाजबांधवांनी ही बाब मागणी व निवेदनाद्वारे अनेकदा अधिकारी व स्थानिक नेत्यांच्या निदर्शनास आणून दिली. ही समस्या साेडविण्यात येणार असल्याचेही त्यांना वेळाेवेळी सांगण्यात आले; परंतु या याेजनेला पुरेसा निधी उपलब्ध व्हावा म्हणून एकाही नेत्याने पुढाकार घेतला नाही.

....

प्राप्त अर्ज ९६१, पात्र २८

या याेजनेंतर्गत नागपूर जिल्ह्यात वर्षभरात एक हजार घरकुलांना मंजुरी व बांधकामाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले हाेते. त्याअनुषंगाने समाजबांधवांनी प्रशासनाकडे एकूण ९६१ अर्ज सादर केले. यातील केवळ २८ अर्ज पात्र ठरवण्यात आले असून, ९३३ अर्जांमध्ये त्रुटी असल्याचे सांगण्यात आले. पात्र ठरवण्यात आलेल्या २८ लाभार्थ्यांनाही या याेजनेचा लाभ देण्यात आला नाही. अपात्र ठरवण्यात आलेल्या ९३३ अर्जांमध्ये नेमक्या काेणत्या त्रुटी आहेत, त्या दूर कशा करायच्या, याबाबत कुणीही लाभार्थ्यांना मार्गदर्शन केले नाही.