शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB च्या वाट्याला यंदाही 'ई साला कप नामदे' नाहीच! राजस्थान रॉयल्सकडून 'विराट' स्वप्नांचा चुराडा 
2
चित्त्यापेक्षा चपळ! विराट कोहलीचा भन्नाट थ्रो, ध्रुव जुरेल रन आऊट; Janhvi Kapoor चं सेलिब्रेशन
3
पुणे अपघात प्रकरणी बाल हक्क न्यायालयाचा मोठा निर्णय; १७ वर्षांच्या 'बाळा'ची बालसुधारगृहात रवानगी
4
२२ खून, अनेक गुन्हे, वेशांतर करून रामललांच्या दर्शनाला गेला असताना पोलिसांनी आवळल्या मुसक्या
5
हे आहेत लोकसभा निवडणूक लढवत असलेले सर्वात श्रीमंत उमेदवार, संपत्तीचा आकडा वाचून विस्फारतील डोळे  
6
"मद्य घोटाळा असो किंवा नॅशनल हेराल्ड घोटाळा...", PM मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
7
RCB चे तारे ज़मीन पर! महत्त्वाच्या सामन्यात शरणागती, राजस्थान रॉयल्सची सुरेख गोलंदाजी
8
फुल राडा! RR चा कोच कुमार संगकारा तिसऱ्या अम्पायरला जाब विचारायला गेला अन्... Video
9
रोव्हमन पॉवेलचा Stunner कॅच; फॅफ ड्यू प्लेसिस माघारी, पण विराट कोहलीने रचला विक्रम भारी
10
विराट कोहलीला 'फसव्या' चेंडूवर युझवेंद्र चहलने गंडवले; विक्रमवीराला तंबूत पाठवले, Video 
11
भाजप किती जागा जिंकेल? अमेरिकेतील प्रसिद्ध राजकीय तज्ञाने केली भविष्यवाणी, म्हणाले...
12
Fact Check: राष्ट्रपती मुर्मू यांच्या रंगावर भाष्य करतानाचा पंतप्रधान मोदींचा 'तो' Video एडिटेड
13
PHOTOS: ब्यूटी विद ब्रेन! सर्वात तरूण IAS अधिकारी; सौंदर्याच्या बाबतीत जणू काही अभिनेत्रीच
14
पुण्यातील अपघाताबाबत राहुल गांधींचा तो दावा गैरसमजातून, असीम सरोदेंनी सांगितली कायद्यातील तरतूद
15
उच्च न्यायालयाचा ममता सरकारला दणका; 2010 नंतर दिलेली सर्व OBC प्रमाणपत्रे रद्द
16
आला उन्हाळा, तब्येत सांभाळा; उष्णतेमुळे 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
17
धार्मिक वक्तव्ये टाळा, सैन्याचे राजकारण करू नका; भाजप-काँग्रेसला निवडणूक आयोगाचे निर्देश
18
इंडिया आघाडीतून पंतप्रधान कोण होणार? जयराम रमेश म्हणाले- "सर्वात मोठ्या पक्षाचा उमेदवार..."
19
वर्ल्ड कपच्या तोंडावर अमेरिकेकडून बांगलादेशचा धुव्वा; भारताच्या शिलेदारानं सामना गाजवला
20
राज ठाकरेंचं विधान अन् सभागृहात हशा; मुलांमधील लठ्ठपणाबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

मतमोजणीमुळे कळमन्यात १०० कोटींच्या व्यवसायाला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 8:14 PM

लोकसभा निवडणुकीची मतमोजणी कळमन्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डमध्ये २३ मे रोजी होणार आहे. त्यामुळे कळमन्यातील बाजारपेठा २१ मे रोजी सायंकाळी ७ पासून २४ मे दिवसभर बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. मालाची आवक २० मेपासून बंद झाली आहे. बंदीच्या तारखेपासून आवक येण्यास आणखी दोन दिवस लागणार आहे. एकूण सात दिवसांत सर्व बाजारपेठांमध्ये १०० कोटींच्या व्यवसायाला फटका बसणार असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी लोकमतशी बोलताना दिली.

ठळक मुद्देमतमोजणी इतरत्र करण्याची मागणी : आवक दोन दिवसांपूर्वीच बंद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी कळमन्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डमध्ये २३ मे रोजी होणार आहे. त्यामुळे कळमन्यातील बाजारपेठा २१ मे रोजी सायंकाळी ७ पासून २४ मे दिवसभर बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. मालाची आवक २० मेपासून बंद झाली आहे. बंदीच्या तारखेपासून आवक येण्यास आणखी दोन दिवस लागणार आहे. एकूण सात दिवसांत सर्व बाजारपेठांमध्ये १०० कोटींच्या व्यवसायाला फटका बसणार असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी लोकमतशी बोलताना दिली.व्यवसाय बंद राहिल्यामुळे बाजार समितीला महसूल मिळणार नाही. व्यापारी, अडतिये, शेतकरी, मजूर, हमाल यांच्या दररोजच्या मिळकतीवर परिणाम होणारा निर्णय शासनाने घेऊ नये. विधानसभा वा लोकसभेची मतमोजणी कळमना बाजारात न करता शहरात इतरत्र करण्याची मागणी विविध असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.भाज्या आणि कांदे-बटाट्याचे दर वाढणारकळमन्यातील मुख्य भाजीपाला बाजारात दररोज ३०० पेक्षा जास्त ट्रकची आवक होते. स्थानिक आणि अन्य राज्यातून उत्पादक आणि व्यापारी कळमन्यात भाजीपाला विक्रीसाठी आणतात. बाजार बंद असल्यामुळे सर्वांनी आवक पूर्वीच बंद केली आहे. सात दिवसांत या बाजारात जवळपास १५ कोटींचा व्यवसाय ठप्प होणार आहे. याशिवाय कांदे-बटाटे बाजारात दररोज ५० ते ६० ट्रकची आवक होते. मतमोजणीच्या काळात जवळपास ३०० ट्रक येणार नाहीत. याशिवाय लसूण आणि अद्रक या कृषी उत्पादनाची आवक बंद राहील. त्यामुळे या दिवसांत स्वयंपाकघरात आवश्यक भाज्यांचे भाव वाढतील, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.फळे बाजारावर परिणामआंब्याच्या सिझनमध्ये स्थानिकांकडून आणि अन्य राज्यातील शेतकऱ्यांकडून आंब्याची आवक वाढली आहे. पण मतमोजणीमुळे शेतकऱ्यांनी आवक थांबविली आहे. आवक वाढल्यामुळे आंबे किरकोळ बाजारात ५० ते ६० रुपये किलो होते. पण जवळपास सात दिवस आवक बंद राहिल्याने भाव १०० रुपयांवर जाण्याची शक्यता फ्रूट मार्केट अडतिया असोसिएशनचे माजी अध्यक्ष आनंद डोंगरे यांनी व्यक्त केली.धान्य बाजारात १५ कोटींचा व्यवसाय ठप्प होणारसंपूर्ण शहराला धान्य आणि कडधान्याचा पुरवठा करणाऱ्या धान्य बाजारात सहा ते सात दिवस शेतकरी माल आणणार नाही. या दिवसांत जवळपास १५ कोटींचा व्यवसाय ठप्प होणार आहे. शासनाने मतमोजणी मानकापूर येथील इंडोर स्टेडियममध्ये घेण्याची मागणी धान्य बाजार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अतुल सेनाड यांनी केली.

मतमोजणी न करण्याचे हायकोर्टात दिले होते आश्वासनकळमना बाजारात धान्य, मिरची, आलू-कांदे, फळे, भाजीपाला, न्यू ग्रेन मार्केट अशा सहा प्रमुख बाजारपेठा आहेत. या बाजारपेठांमध्ये दररोज कोट्यवधींचा व्यवसाय होतो. मतमोजणीमुळे व्यवसाय प्रभावित होत असल्याच्या कारणांवरून सर्वच असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीच्या काळात कळमन्यात मतमोजणी घेऊ नये, या आशयाची याचिका हायकोर्टात दाखल केली होती. तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी पुढील मतमोजणी कळमना बाजारात घेण्यात येणार नाही, असे हायकोर्टात लिहून दिले होते. त्यानंतरही होणारी मतमोजणी ही व्यापारी, अडतिये आणि शेतकऱ्यांची फसवणूक असल्याचे मत फ्रूट मार्केट असोसिएशनचे अध्यक्ष राजेश छाब्रानी यांनी लोकमतशी बोलताना दिली. सर्वच बाजारपेठा २४ मेपर्यंत बंद राहणार आहेत. बाजारात व्यवसाय सुरळीत होण्यासाठी बंदीनंतर तीन ते चार दिवस लागणार आहे. व्यवसायात होणाऱ्या तोट्याची शासनाने भरपाई करावी, अशी मागणी छाब्रानी यांनी केली. 

टॅग्स :Electionनिवडणूकbusinessव्यवसाय