शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या लुटारुंना लोकसभा निवडणुकीत जागा दाखवू; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
‘आधी बूथ कॅप्चर व्हायचं, आता उमेदवारच पळवले जाताहेत’, इंदूरमधील घटनेवरून काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
3
Delhi DPS Bomb Threat : दिल्लीतील शाळेला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी, पोलीस घटनास्थळी दाखल
4
काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण...; शरद पवारांचा भाजपाला इशारा
5
आरक्षण, घटनेवर खोटा प्रचार सुरू; ४०० हून अधिक जागा जिंकणार : गृहमंत्री शाह
6
Success Story : स्कूल ड्रॉपआऊट, जे बनले देशातील सर्वात श्रीमंत ज्वेलर; देश-विदेशात पसरलाय व्यवसाय
7
भाजप राज्यघटना फाडूनच फेकेल; घटनेची प्रत हाती धरून राहुल गांधी यांचा दावा
8
निवडणुकीच्या रणधुमाळीत एलपीजी सिलेंडर पुन्हा स्वस्त, किमतीमध्ये एवढी झाली घट
9
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
10
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
11
मुख्यमंत्री महिलांच्या कपड्यांकडेच बघत असतात, कारण काय? माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांचा नितीश कुमारांवर पलटवार
12
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
13
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
14
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
15
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
16
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
17
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
18
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
19
लालूंच्या कन्येकडे १५.८२ कोटींची संपत्ती; कोणतेही कर्ज नाही
20
किळस अन् कलंक; विद्यमान खासदाराचे वासनाकांड चव्हाट्यावर आल्याने देश नखशिखांत हादरला

नागपूर विभागातील १७०० गावात दुष्काळी परिस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2020 12:09 AM

नागपूर विभागातील १७१६ गावांची पैसेवारी ५० पेक्षा कमी आल्याने, येथे दुष्काळसदृश परिस्थिती असल्याचे स्पष्ट झाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वाधिक ११७९ गावांची पैसेवारी कमी आहे.

ठळक मुद्देपरतीच्या पावसाचा फटका : ६,४५२ गावांची पैसेवारी ५० पेक्षा जास्त

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : एकीकडे पिकांचे चांगले उत्पादन झाल्याच्या सुरुवातीच्या अहवालावर परतीच्या पावसाने पाणी फेरले. पूर व अतिवृष्टीचा फटका पिकांना बसल्याने मोठे नुकसान झाले आहे. याचा परिणाम पिकांच्या उत्पादनावर झाला. नागपूर विभागातील १७१६ गावांची पैसेवारी ५० पेक्षा कमी आल्याने, येथे दुष्काळसदृश परिस्थिती असल्याचे स्पष्ट झाले आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वाधिक ११७९ गावांची पैसेवारी कमी आहे.यंदा पावसाने उशिरा हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी सुरुवातीपासून चिंतित होता, नंतर मात्र पावसाने दमदार हजेरी लावली. यामुळे शेतकरी सुखावला होता. गेल्या काही वर्षांचा अनुभव पाहता यंदा उत्पादन चांगले होण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. नजरअंदाज आणि सुधारित पैसेवारीत नागपूर विभागातील सर्वच गावांची पीक परिस्थिती उत्तम दर्शविण्यात आली होती. परंतु ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. अतिवृष्टीही झाली. यामुळे पिकांना मोठा फटका बसला. शेतकऱ्यांचे हाती आलेले पीक गेले. यावर आता महसूल प्रशासनाकडून शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. नागपूर विभागात ८,४४२ गावांमध्ये खरीप पीक घेतल्या जाते. यातील १७६८ गावांची अंतिम पैसेवारी ही ५० पैशापेक्षा कमी दर्शविण्यात आली आहे, तर ६,४५२ गावांची पैसेवारी ही ५० पेक्षा जास्त दर्शविण्यात आली आहे. यात चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वाधिक ११७९ गावांचा समावेश आहे. नागपूर जिल्ह्यातील ३४३ तर गडचिरोली जिल्ह्यातील १९४ गावांची पैसेवारी ५० पेक्षा जास्त आहे. भंडारा, गोंदिया व चंद्रपूर येथील सर्वच गावाची पैसेवारी ५० पेक्षा जास्त दर्शविण्यात आली आहे.

टॅग्स :droughtदुष्काळVidarbhaविदर्भ